शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

अजून निरोप नाही, निरोप आल्यानंतर पाहू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:25 IST

कोल्हापूर : ‘गोकुळ’ची सत्ता हस्तगत केल्यानंतर आता जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी बदलाचे वेध इच्छुकांना लागले आहेत. परंतु, सत्तेत सहभागी असलेल्या ...

कोल्हापूर : ‘गोकुळ’ची सत्ता हस्तगत केल्यानंतर आता जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी बदलाचे वेध इच्छुकांना लागले आहेत. परंतु, सत्तेत सहभागी असलेल्या नेत्यांना अजूनही निरोप दिले गेले नसल्याने ‘निरोप आल्यानंतर पाहू’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

जिल्हा परिषदेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांना दिलेली वर्षभराची मुदत जानेवारीतच संपली आहे; परंतु ‘गोकुळ’साठी थांबलेल्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक शशिकांत खोत आणि अमर पाटील यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे. या दोघांनी शुक्रवारी पालकमंत्री सतेज पाटील यांची आणि शनिवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांना ४२ सदस्य आपल्यासोबत ठाम असल्याचे सांगितले.

आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील, माजी खासदार राजू शेट्टी हे ‘गोकुळ’च्या निवडणुकीत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्याविरोधी आघाडीत एकत्र होते. त्यामुळे त्यांची भूमिका काय राहणार याबाबत तिघांशीही संपर्क साधल्यानंतर ‘अजून याबाबत कोणाचाही निरोप आलेला नाही. निरोप आल्यानंतर पाहू’, अशी भूमिका जाहीर केली आहे.

आमदार पी. एन. पाटील म्हणाले, सहकारामध्ये पक्ष म्हणून निवडणूक लढवली जात नाही; परंतु आम्ही पक्षाच्या विरोधात कधी काम केले नाही. गेल्यावर्षीही बहुमताअभावी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेसकडून जाईल, असा निरोप सतेज पाटील यांनी दिल्यानंतर आमचे सर्व सदस्य उपस्थित राहिले. त्यामुळे जेव्हा याबाबत निरोप येईल त्यावेळी बघू.

माजी आमदार सत्यजित पाटील म्हणाले, आमची शिवसेनेची बैठक अजून झालेली नाही. बैठकीबाबत अजून ठरलेले नाही. ती ठरल्यानंतर आम्ही सर्व शिवसेना नेते बसून निर्णय घेऊ.

चौकट

वेट अँड वॉच

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, आम्हाला निरोप आलेला नाही. तो आल्यानंतर पाहू. तोपर्यंत ‘वेट अँड वॉच’ या भूमिकेत आम्ही आहोत, असे त्यांनी सांगितले.