शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

पुढील वर्षी राज्यासाठी वृक्ष लागवडीचे तीन कोटी उद्दिष्ट

By admin | Updated: June 30, 2016 01:04 IST

वनमंत्र्यांचा ‘व्हीसी’द्वारे आढावा : कोल्हापुरातील तयारीबाबत समाधान व्यक्त; ८ व ९ जुलैला पुण्यात आढावा बैठक

कोल्हापूर : पुढील वर्षी राज्यासाठी तीन कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शासकीय यंत्रणेला दिली. यावर्षी उद्या, शुक्रवारी राबविण्यात येणाऱ्या वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत जिल्ह्णातील तयारीचा आढावाही त्यांनी संबंधित यंत्रणेकडून यावेळी घेतला. कोल्हापूर जिल्ह्णाने आपले उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत राज्यासाठी यंदा दोन कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यातील जिल्ह्णासाठी सहा लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. उद्या, शुक्रवारी राज्यात एकाच वेळी हा वृक्षलागवडीचा कार्यक्रम होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोल्हापूर जिल्ह्णाच्या तयारीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक तानाजी पाटील, वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एम. के. राव, उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुले, तहसीलदार तेजस्विनी पाटील, आदींसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी वनमंत्र्यांना जिल्ह्णातील वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत तयारीबाबत माहिती दिली.तानाजी पाटील म्हणाले, या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी सहा लाखांचे उद्दिष्ट होते. ते पूर्ण करून आठ लाख आठ हजार वृक्षलागवडीसाठी खड्डे खणण्यात आले आहेत. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.एम. के. राव म्हणाले, वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. उद्या, शुक्रवारचा मुख्य कार्यक्रम हा शिवाजी विद्यापीठ येथे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे; तर दुसरा कार्यक्रम कणेरी मठ येथे होणार असून, यावेळी जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश व संबंधित यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.रंगनाथ नाईकडे म्हणाले, या उपक्रमात सहभागी होणाऱ्या लोकांना ‘वृक्षमित्र’ बॅज दिले जाणार आहेत. वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाकडून राबविण्यात आलेल्या ‘वृक्षदान पुण्यसंचय’ योजनेला जिल्ह्णात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेत ११ हजार रोपे जमा झाली आहेत.वनमंत्री मुनगंटीवार यांनी हा उपक्रम पाच वर्षे कायम सुरू राहणार असून, या काळात ५५ कोटी वृक्षलागवडीचे राज्यासाठी उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यातील पुढील वर्षाकरिता राज्यासाठी तीन कोटी उद्दिष्ट असून, जिल्ह्णाचे उद्दिष्ट काही दिवसांत कळविले जाईल असे त्यांनी सांगितले. पुढील वर्षीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ऐनवेळी गोंधळ होऊ नये यासाठी वन विभाग व सामाजिक वनीकरणने शनिवार (दि. २)पासून नर्सरीतून रोपे तयार करण्याचे काम सुरू करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. (प्रतिनिधी)८ व ९ जुलैलापुण्यात बैठकयावर्षी राबविण्यात आलेल्या वृक्षलागवड कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ८ व ९ जुलैला राज्यातील सर्व अधिकाऱ्यांची पुण्यात आढावा बैठक घेतली जाईल. यामध्ये हा कार्यक्रम राबविताना आलेल्या अडचणी, त्रुटी जाणून घेतल्या जातील. तसेच ज्यांनी काही नावीन्यपूर्ण योजना राबविल्या असतील, त्यांवर चर्चा करून त्याचा राज्यासाठी काही उपयोग करून घेता येईल का? याबाबत विचार केला जाईल, असे वनमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.