शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

सांगलीच्या तीर्थक्षेत्र विकासाची नवी वारी

By admin | Updated: August 18, 2016 23:34 IST

फेरप्रस्तावांची शक्यता : राज्य शासनाच्या परिपत्रकामुळे बदल होणार

अविनाश कोळी- सांगली -भक्तांची तीर्थक्षेत्र वारी अधिक सुलभ व सेवा-सुविधांनीयुक्त व्हावी, यासाठी जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकासाचे प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित होते. शासनाने नवे बदल करून फेरप्रस्तावांची सूचना केल्यामुळे तीर्थक्षेत्रांना आता शासनदरबारी एक वारी करावी लागणार आहे. सांगली जिल्ह्यात तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळांची संख्या २८६ इतकी आहे. यामध्ये तालुकानिहाय याद्याही तयार आहेत. मंदिरे, दर्गा, मठ अशा अनेक ठिकाणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांचा व तीर्थक्षेत्रांना दरवर्षी हजारो भाविक भेट देत असतात. यात्रा, उरूस व अन्य कार्यक्रमांवेळी अशाठिकाणी हजारो, लाखो भाविकही गोळा होतात. त्यामुळे अशा महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासाचे प्रस्ताव यापूर्वी पाठविण्यात आले होते. शासनाने १९ जुलैरोजी नवे परिपत्रक काढून तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमात मोजके बदल केले. यापूर्वी तीर्थक्षेत्र विकासात क्षेत्राची मर्यादा नव्हती. आता संबंधित तीर्थक्षेत्राच्या २०० मीटर परिसरातच विकासाची योजना आखण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे प्रस्तावाचे रंगरुप बदलणार आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक तीर्थक्षेत्रांना या अटीचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. जागांची उपलब्धता हा प्रमुख अडथळा यामुळे निर्माण होणार आहे. रस्ते, पाणीपुरवठा, गटारी, शौचालये यासह भक्तनिवास व अन्य सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर जागेची उपलब्धता असणे गरजेचे आहे. जागेच्या अडचणीमुळे तीर्थक्षेत्रांच्या प्रस्तावांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी तीर्थक्षेत्राच्या निमित्ताने संबंधित गावाचा, शहराचा विकास करण्याची संधी होती. आता ती संधी मिळणार नाही. शासनाने याबाबत स्पष्ट सूचना केल्यामुळे अनेक प्रस्तावांची गोची झाली आहे. तीर्थक्षेत्राच्या विकासाचे २५ कोटी रुपयांपर्यंतचे प्रस्ताव शासन मंजूर करू शकते. निधीची उपलब्धता अधिक असल्याने ती एक जमेची बाजू ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांसाठी राहणार आहे. कवठेमहांकाळ व तासगाव तालुक्यातील काही तीर्थक्षेत्रांचे प्रस्ताव आम्ही यापूर्वी पाठविले आहेत. ते प्रलंबित आहेत. नव्या सूचनांप्रमाणे आता नवे प्रस्ताव पाठवून जास्तीत-जास्त निधी आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. लवकरच याबाबतचा आढावा आम्ही घेऊ. - संजयकाका पाटील, खासदार, सांगलीवाळवा तालुक्यात सर्वाधिक ठिकाणेवाळवा तालुक्यात सर्वाधिक ४१ तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांची नोंद आहे. सर्वात कमी ठिकाणे आटपाडी तालुक्यात आहेत. अ, ब आणि क अशा तीन वर्गात तालुकानिहाय तीर्थक्षेत्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. तीर्थक्षेत्रापर्यंत जाणारे रस्ते, पाणीपुरवठा, शौचालये, वाहनतळ, भक्तनिवास, संरक्षण भिंत, विद्युतदिवे अशा कामांचा समावेश आहे.