शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
4
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
5
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
6
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
7
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
8
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
9
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
10
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
11
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
12
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
13
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
14
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
15
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
16
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
17
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
18
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
19
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा

नव्या पिढीला घडविणारा दस्तऐवज

By admin | Updated: May 18, 2015 00:57 IST

‘एक संघर्ष यात्रा’ : जी. डी. बापू लाड यांच्या आत्मकथन ग्रंथाचे विश्वास पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

कोल्हापूर : समाजाला क्रांतीचा संस्कार जी. डी. बापू लाड यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी दिला. बापूंचे आत्मकथन असलेला ‘एक संघर्ष यात्रा’ ग्रंथ हा नव्या पिढीला घडविणारा दस्तऐवज आहे. त्याचे प्रत्येकाने वाचन, मनन आणि चिंतन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन साहित्यिक विश्वास पाटील यांनी रविवारी येथे केले. येथील राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात ‘जी. डी. बापू लाड : आत्मकथन एक संघर्ष यात्रा’ ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते. साहित्यिक विश्वास पाटील म्हणाले, आयर्लंडमधील स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणे सातारा क्रांतीमधील क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना घाईला आणले होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबरोबरीने जी. डी. बापू लाड, नागनाथअण्णा नायकवडी कार्यरत होते. नाना पाटील यांच्या प्रत्येक लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी केलेल्या क्रांतीची ज्वाला नव्या पिढीपर्यंत गेली पाहिजे. या पिढीवर क्रांतीचे संस्कार करून त्यांना घडविण्यासाठी बापूंचे आत्मकथन असलेला हा ग्रंथ महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. प्रत्येकाने तो आपल्या घरात अभिमानाने ठेवला पाहिजे. आत्मकथनाचा उत्तरार्ध क्लेशदायक वाटतो. बापूंसारख्या मोठ्या क्रांतिकारकाला दु:ख सोसावे लागले, हे दुर्दैवी आहे. माजी कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, बापूंचे संघर्षमय जीवन आणि त्यांच्या क्रांतीची वैशिष्ट्ये या ग्रंथातून समजतात. बापूंवर नेताजी सुभाषचंद्र बोस, जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी, आदींच्या विचारांचा प्रभाव होता. तेदेखील यातून समजते. तरुणांना प्रेरणादायी ठरणारे हे आत्मकथन आहे. कार्यक्रमास ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, माजी आमदार शिवाजीराव पाटील, पृथ्वीराज देशमुख, संपतराव पवार-पाटील, योगतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे, बापूसाहेब पुजारी, सिने-अभिनेते विलास रकटे, व्ही. बी. सायनाकर, डॉ. अरुण भोसले, प्रकाश पवार, भारती पाटील, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, बापूसाहेब जाधव, जे. के. पाटील, किरण लाड, वसंत लाड, उदय लाड, कुंडलिक एडके, डॉ. ज. रा. दाभोळे, प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे, मेघा पानसरे, आदींसह कोल्हापूर, कुंडल, सांगली, सातारा, बेळगाव येथील कार्यकर्ते उपस्थित होते. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड फाउंडेशनचे अध्यक्ष अरुण लाड यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष डॉ. प्रकाश कुंभार यांनी ग्रंथाचा परिचय करून दिला. प्रा. व्ही. डी. लाड यांनी संदेशवाचन केले. श्रीकांत माने व ताज मुल्लाणी यांनी सूत्रसंचालन केले. व्ही. वाय. पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)