शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

नवे कृषी कायदे पारतंत्र्यात घेऊन जाणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:52 IST

शिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंबानी, अदानीसारख्या धनदांडग्यांना शेतकऱ्यांचे शोषण करण्यासाठी खुली सूट देत असून, केंद्र शासनाने ...

शिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंबानी, अदानीसारख्या धनदांडग्यांना शेतकऱ्यांचे शोषण करण्यासाठी खुली सूट देत असून, केंद्र शासनाने पास केलेले तीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांना ईस्ट इंडिया कंपनीसारख्या व्यवस्थेतील पारतंत्र्यात घेऊन जातील, अशी भीती माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. शिरोली येथील छत्रपती संभाजीराजे चौकात आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती हातकणंगले यांच्यावतीने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शेट्टी म्हणाले, अत्यावश्यक वस्तू कायद्यातील सुधारणा, कंत्राटी शेती, शेतमालाला हमीभाव नाकारणे अशा शेती धोरणातून सहकार व्यवस्थेत दोष निर्माण झाले आहेत. ते दोष काढणे गरजेचे असताना त्याऐवजी पर्याय म्हणून खासगीकरण करणे आत्मघातकी आहे.

यावेळी आमदार राजूबाबा आवळे म्हणाले, शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे. नरेंद्र मोदी नोटबंदी व जीएसटी सारखे आत्मघातकी धोरणे शेती क्षेत्रात राबवू इच्छित आहेत. कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे शोषण वाढून भांडवलदारांची मक्तेदारी निर्माण होईल. शेतकरी त्यांचे मनसुबे उधळून लावतील.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सह सेक्रेटरी गिरीश फोंडे म्हणाले, दिल्लीमध्ये शेतकरी कडाक्याच्या थंडीत आपली प्राणांची बाजी लावून ऐतिहासिक आंदोलन करत आहेत. हा केवळ शेतकऱ्यांचा लढा नसून शेतमालाचा साठा करणाऱ्या भांडवलदारांकडून ग्राहकांची शोषणातून मुक्तता करण्याचा लढा आहे.

स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष वैभव कांबळे यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या सोबत महाराष्ट्रातील शेतकरी खांद्याला खांदा लावून लढतील, असे सांगितले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, माजी उपसरपंच बाजीराव सातपुते, वैभव कांबळे, कृष्णात खवरे, श्रीकांत खटाळे, निशिकांत पद्माई, उत्तम पाटील, विशाल माने (हालोंडी), सुनंदा शिंदे, आर. आर. पाटील, उदय पाटील, जयश्री नाईक, शौकत देसाई, सूरज लंबे (नागाव), तात्याभाऊ पाटील, बाजीराव पाटील, राम बुडकर, प्रकाश परमाज यासह कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१० राजू शेट्टी शिरोली