शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
6
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
7
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
8
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
9
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
10
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
11
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
12
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
13
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
14
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
15
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
16
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
17
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
18
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
19
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
20
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   

नेसरी-कोवाड वाहतूक आता बारमाही

By admin | Updated: March 4, 2015 23:39 IST

‘लोकमत’चा पाठपुरावा : तारेवाडी पर्यायी पुलास मिळाला निधी

राम मगदूम - गडहिंग्लज -‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने घटप्रभा नदीवरील तारेवाडी बंधाऱ्यानजीक प्रस्तावित पर्यायी पुलास तीन कोटी ७७ लाख ४० हजारांचा निधी मंजूर केला. ९० लाख ५८ हजारांच्या टोकण बजेटसह नवीन पुलास मंजुरी दिल्यामुळे नेसरी-कोवाड मार्गावरील वाहतूक आता बारमाही ‘सुरळीत’ व ‘सुरक्षित’ राहणार आहे. त्यामुळे नेसरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.१९७२ मध्ये नेसरी-कोवाड मार्गावर तारेवाडी-हडलगे दरम्यान कोल्हापूर पद्धतीचा पूलवजा बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यामुळे हडलगे, तारेवाडी, डोणेवाडी, तावरेवाडी व नेसरी या पाच गावांच्या शेतीच्या पाण्याची व्यवस्था झाली. तसेच वाहतुकीसाठीही या बंधाऱ्याचा वापर सुरू झाला.तारेवाडीनजीक ‘एस’ आणि ‘यू’ आकारातील धोक्याच्या वळणावर सखल भागात सध्याचा बंधारा आहे. त्याचे संरक्षक कठडेही निकामी झाले आहेत. बंधाऱ्यावरून ये-जा करणाऱ्यांना, वाहनचालकांना समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. गेल्या सात-आठ वर्षांत याठिकाणी झालेल्या अपघातात चारजणांचा, तसेच चार बैलांचाही मृत्यू झाला आहे.सध्याचा बंधारा रस्त्याच्या पातळीपेक्षाही सखल भागात आहे. दरवर्षी पावसाळ्यात तो पाण्याखाली जाऊन या मार्गावरील वाहतूक ८-१५ दिवस खंडित व्हायची. त्यामुळे पर्यायी पूल बांधण्यात यावा, अशी जनतेची मागणी होती. स्व. बाबासाहेब कुपेकर यांनीही त्याचा पाठपुरावा केला. पायाभूत सुविधांतर्गत नाबार्डच्या मंजूर कामांच्या यादीत या पुलाचा समावेश होता. प्राथमिक पाहणी व स्थळ पाहणीअंती सार्वजनिक बांधकाम खात्याने पर्यायी पुलाचा प्रारूप आराखडा तयार केला. संकल्पचित्र मंडळाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव नाबार्डकडे दाखल केला. नाबार्डने त्यास हिरवा कंदील दाखविला. परंतु, आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या प्रयत्नामुळे निधी मिळाला असून, पर्यायी पुलाचा मार्ग मोकळा झाला आहे.महापुरातही सुरळीत वाहतूकनवीन पूल उच्चतम पूरपातळीपेक्षाही अधिक उंचीवर बांधण्यात येणार आहे. त्यामुळे महापुराच्या काळातही या मार्गावरील वाहतूक सुरळीतपणे चालू राहणार आहे. धोकादायक वळण निघणारसध्याच्या बंधाऱ्याच्या पश्चिमेकडील बाजूच्या बैलगाडी मार्गास जोडणाऱ्या आणि काटकोनात बांधल्या जाणाऱ्या नवीन पुलावरील दोन पदरी रस्त्यामुळे सध्याचे धोकादायक वळण निघण्यास मदत होणार आहे.