शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तनवादी विचारांच्या हस्तक्षेपाची गरज

By admin | Updated: May 31, 2017 03:39 IST

गेल्या तीन वर्षांत भाजपने आपल्या सोईने खोटा इतिहास तयार केला. माणसाला लौकिक आमिषे दाखवून सत्ता स्थापन केली. संभ्रमतेचे

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेल्या तीन वर्षांत भाजपने आपल्या सोईने खोटा इतिहास तयार केला. माणसाला लौकिक आमिषे दाखवून सत्ता स्थापन केली. संभ्रमतेचे शस्त्र वापरून बदल आणि परिवर्तनाबद्दल गोंधळ निर्माण केला. शालेय शिक्षणापासूनच हिंदुत्वाच्या उतरंडीचे विष पेरले जात आहे. प्रश्न विचारणारा थेट देशद्रोही ठरविण्यात आला. अशा वातावरणात मूल्यभान असलेल्या परिवर्तनवादी विचारांनी हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे, असे परखड मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांनी मंगळवारी व्यक्त केले. येथील भाई माधवरावजी बागल विद्यापीठातर्फे त्यांना ‘भाई माधवराव बागल पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. यावेळी सत्काराल उत्तर देताना त्या बोलत होत्या. शाहू स्मारक भवनमध्ये हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील होते. पुष्पा भावे म्हणाल्या, ‘उजव्या दृष्टिकोनाच्या या सरकारने राजकारणासाठी भाषेचा गोड वापर केला. गांधीवधापासून त्याची सुरुवात झाली आणि आता ‘मन की बात’ सुरू आहे. दुसऱ्यावर टीका करीत स्वत: केलेल्या पापांवर पांघरूण घातले गेले. गुजरातमधील बलात्कार, अन्याय, दंगली, प्रतिष्ठेसाठी खून हा त्यांचा इतिहास आहे. आम्ही देशप्रेमी आणि विरोधात बोललेला देशद्रोही, त्याचा थेट शिरच्छेदच करा, असे आदेश दिले जात आहेत. मी उच्च आणि तो डागाळलेला या वंशीय जातीय व्यवस्था पक्क्या केल्या जात आहेत. या असहिष्णूतेच्या विरोधात कलाकारांनी पुरस्कार परत केले तर त्यांची कुचेष्टा करण्यात आली. ‘एफटीआय’सारख्या शिक्षणाच्या उच्चतम जागा ताब्यात घेतल्या जात आहेत. या परिस्थितीत परिवर्तनाचा विचार आणि कृती कार्यक्रम करण्याची आणि हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे.’बारसं स्पेशालिस्ट भावे म्हणाल्या, हे सरकार ‘बारसं स्पेशालिस्ट’ आहे. जुन्या योजनांना नवीन नाव दिले जात आहे. एकीकडे शेतकऱ्यांची दुर्दशा होत असताना दुसरीकडे त्यांच्याभोवती ‘अच्छे दिन’चे आभास निर्माण केले आहे.