शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

परिवर्तनवादी विचारांच्या हस्तक्षेपाची गरज

By admin | Updated: May 31, 2017 03:39 IST

गेल्या तीन वर्षांत भाजपने आपल्या सोईने खोटा इतिहास तयार केला. माणसाला लौकिक आमिषे दाखवून सत्ता स्थापन केली. संभ्रमतेचे

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेल्या तीन वर्षांत भाजपने आपल्या सोईने खोटा इतिहास तयार केला. माणसाला लौकिक आमिषे दाखवून सत्ता स्थापन केली. संभ्रमतेचे शस्त्र वापरून बदल आणि परिवर्तनाबद्दल गोंधळ निर्माण केला. शालेय शिक्षणापासूनच हिंदुत्वाच्या उतरंडीचे विष पेरले जात आहे. प्रश्न विचारणारा थेट देशद्रोही ठरविण्यात आला. अशा वातावरणात मूल्यभान असलेल्या परिवर्तनवादी विचारांनी हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे, असे परखड मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांनी मंगळवारी व्यक्त केले. येथील भाई माधवरावजी बागल विद्यापीठातर्फे त्यांना ‘भाई माधवराव बागल पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. यावेळी सत्काराल उत्तर देताना त्या बोलत होत्या. शाहू स्मारक भवनमध्ये हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील होते. पुष्पा भावे म्हणाल्या, ‘उजव्या दृष्टिकोनाच्या या सरकारने राजकारणासाठी भाषेचा गोड वापर केला. गांधीवधापासून त्याची सुरुवात झाली आणि आता ‘मन की बात’ सुरू आहे. दुसऱ्यावर टीका करीत स्वत: केलेल्या पापांवर पांघरूण घातले गेले. गुजरातमधील बलात्कार, अन्याय, दंगली, प्रतिष्ठेसाठी खून हा त्यांचा इतिहास आहे. आम्ही देशप्रेमी आणि विरोधात बोललेला देशद्रोही, त्याचा थेट शिरच्छेदच करा, असे आदेश दिले जात आहेत. मी उच्च आणि तो डागाळलेला या वंशीय जातीय व्यवस्था पक्क्या केल्या जात आहेत. या असहिष्णूतेच्या विरोधात कलाकारांनी पुरस्कार परत केले तर त्यांची कुचेष्टा करण्यात आली. ‘एफटीआय’सारख्या शिक्षणाच्या उच्चतम जागा ताब्यात घेतल्या जात आहेत. या परिस्थितीत परिवर्तनाचा विचार आणि कृती कार्यक्रम करण्याची आणि हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे.’बारसं स्पेशालिस्ट भावे म्हणाल्या, हे सरकार ‘बारसं स्पेशालिस्ट’ आहे. जुन्या योजनांना नवीन नाव दिले जात आहे. एकीकडे शेतकऱ्यांची दुर्दशा होत असताना दुसरीकडे त्यांच्याभोवती ‘अच्छे दिन’चे आभास निर्माण केले आहे.