शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

न्यायव्यवस्था टिकणे गरजेचे : सिरपूरकर

By admin | Updated: November 30, 2014 23:57 IST

तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमाला

कोल्हापूर : स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या न्यायव्यवस्थेत फार आमूलाग्र बदल झाले आहेत. आजच्या काळात प्रत्येकजण हुकूमशाही पद्धतीने वागला आणि ज्या दिवशी असा प्रकार घडेल तो दिवस काळा असेल, असे मत आज, रविवारी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व नागपूर येथील विकास सिरपूरकर यांनी व्यक्त करून न्यायव्यवस्था टिकणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.ते ब्राह्मण सभा करवीर, मंगलधाम आणि अमृतमहोत्सवी श्री महालक्ष्मी को-आॅप बँक यांच्या संयुक्त विद्यमाने तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत ते ‘न्यायव्यवस्था-कथा आणि व्यथा’ या विषयावर बोलत होते. मंगळवार पेठेतील प्रायव्हेट हायस्कूलच्या पटांगणावर हे व्याख्यान झाले.विकास सिरपूरकर म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात न्यायव्यवस्थेत बदल होते. ही व्यवस्था अधिकारावर चालायची. कोलकात्यामधील नंदकुमार घोष या संस्थानिकाला फसवणूकप्रकरणी फाशीची शिक्षा देणारे हे इंग्रज त्या काळात होते. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे, आपण घटना किशी लिहिली त्यापेक्षा ती घटना चालवणारे कसे आहेत, याचा विचार प्रथम व्हायला पाहिजे तरच आपण त्याची अंमलबजावणी करू शकलो, असे म्हणेन. प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे तसेच समाजातील शोषित घटकांना न्याय मिळालाच पाहिजे, असे न्यायाधीशांचे मत असते. सध्या ज्यांच्याकडे पैसे आहेत, अशांनाच न्याय मिळत आहे, यावर त्यांनी खंत व्यक्त केली. घटस्फोट असो अथवा कुळ-मालक वाद असो, त्यामध्ये न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पक्षकारांना न्याय लवकर द्यावा, हीच अपेक्षा न्यायाधीशांची असते. न्यायव्यवस्था कोसळेल त्या दिवशी जंगलराज व ठोकशाहीचे राज्य येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.