शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

जीवनासाठी प्रयोजनाची गरज

By admin | Updated: August 4, 2015 00:10 IST

अभय बंग : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार प्रदान

विटा : व्यसनांचे व्यापारी नव्या पिढीला बरबाद करण्यासाठी सरसावले आहेत; पण नव्या पिढीने व्यसनांच्या आहारी जाऊ नये. शिक्षण व करिअर यांचे आयोजन करून चालणार नाही, तर जीवन कसे व कशासाठी जगावे, याचे प्रयोजन करण्याची खरी गरज असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले.विटा येथे क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्यावतीने डॉ. बंग यांना यावर्षीचा क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, क्रांतिवीरांगना श्रीमती हौसाताई पाटील, भाई संपतराव पवार, आशाताई बोले, अ‍ॅड. सुभाष पाटील, अध्यक्ष सुभाष पवार उपस्थित होते.प्रारंभी डॉ. बंग यांना भाई वैद्य, श्रीमती हौसाताई पाटील यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आला.डॉ. बंग म्हणाले, लहान-लहान राजकीय पुढाऱ्यांची मोठी-मोठी पोस्टर्स लागतात, तेव्हा भारतीय समाजाचा सूर्य अस्ताला आला आहे का? असा प्रश्न पडतो. व्यसनांचे व्यापारी वाढल्याने तंबाखू, मावा, गुटखा, दारूचा रोग समाजात वाढू लागला आहे. गडचिरोली जिल्'ाचे वार्षिक बजेट १५७ कोटीचे असताना, व्यसनांसाठी तेथील लोक २६० कोटी रूपयांचा चुराडा करतात. ही गंभीर बाब आहे. दारूबंदी, व्यसनमुक्ती हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जवळचे विषय होते. त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा जपत असताना तरुण पिढीसह समाजाने व्यसनांच्या आहारी जाऊ नये. महात्मा गांधीजींच्या आश्रमात आम्ही शिकलो. त्यामुळे गांधीजींची समाजकार्याची प्रेरणा आम्हाला मिळाल्याने आम्हा दोघा भावांना गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात अदिवासी लोकांची सेवा करण्याचे भाग्य मिळाले.यावेळी भाई वैद्य म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या अंगात देशाला स्वातंत्र्य देण्याचे काम भिनले होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान आज प्रेरणादायी आहे. त्यांची प्रेरणा घेऊन अनेकांचे आयुष्य उजाळले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मुलांच्यात जी प्रेरणा, जो आवेश होता, तो मात्र आज दुर्दैवाने पाहावयास मिळत नाही. यावेळी अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. (वार्ताहर)