शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

जीवनासाठी प्रयोजनाची गरज

By admin | Updated: August 4, 2015 00:10 IST

अभय बंग : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार प्रदान

विटा : व्यसनांचे व्यापारी नव्या पिढीला बरबाद करण्यासाठी सरसावले आहेत; पण नव्या पिढीने व्यसनांच्या आहारी जाऊ नये. शिक्षण व करिअर यांचे आयोजन करून चालणार नाही, तर जीवन कसे व कशासाठी जगावे, याचे प्रयोजन करण्याची खरी गरज असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले.विटा येथे क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्यावतीने डॉ. बंग यांना यावर्षीचा क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, क्रांतिवीरांगना श्रीमती हौसाताई पाटील, भाई संपतराव पवार, आशाताई बोले, अ‍ॅड. सुभाष पाटील, अध्यक्ष सुभाष पवार उपस्थित होते.प्रारंभी डॉ. बंग यांना भाई वैद्य, श्रीमती हौसाताई पाटील यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आला.डॉ. बंग म्हणाले, लहान-लहान राजकीय पुढाऱ्यांची मोठी-मोठी पोस्टर्स लागतात, तेव्हा भारतीय समाजाचा सूर्य अस्ताला आला आहे का? असा प्रश्न पडतो. व्यसनांचे व्यापारी वाढल्याने तंबाखू, मावा, गुटखा, दारूचा रोग समाजात वाढू लागला आहे. गडचिरोली जिल्'ाचे वार्षिक बजेट १५७ कोटीचे असताना, व्यसनांसाठी तेथील लोक २६० कोटी रूपयांचा चुराडा करतात. ही गंभीर बाब आहे. दारूबंदी, व्यसनमुक्ती हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जवळचे विषय होते. त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा जपत असताना तरुण पिढीसह समाजाने व्यसनांच्या आहारी जाऊ नये. महात्मा गांधीजींच्या आश्रमात आम्ही शिकलो. त्यामुळे गांधीजींची समाजकार्याची प्रेरणा आम्हाला मिळाल्याने आम्हा दोघा भावांना गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात अदिवासी लोकांची सेवा करण्याचे भाग्य मिळाले.यावेळी भाई वैद्य म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या अंगात देशाला स्वातंत्र्य देण्याचे काम भिनले होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान आज प्रेरणादायी आहे. त्यांची प्रेरणा घेऊन अनेकांचे आयुष्य उजाळले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मुलांच्यात जी प्रेरणा, जो आवेश होता, तो मात्र आज दुर्दैवाने पाहावयास मिळत नाही. यावेळी अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. (वार्ताहर)