शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

गुटखा तस्करीच्या मुळाशी जाण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:27 IST

संदीप बावचे जयसिंगपूर : महाराष्ट्रात आठ वर्षांपासून गुटखाबंदी असतानाही कायद्याचे नियम तोडून अवैधरीत्या गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूची राजरोसपणे ...

संदीप बावचे

जयसिंगपूर : महाराष्ट्रात आठ वर्षांपासून गुटखाबंदी असतानाही कायद्याचे नियम तोडून अवैधरीत्या गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूची राजरोसपणे विक्री सुरू असल्याचे कारवाईवरून स्पष्ट होते. त्यामुळे खरोखरच गुटखाबंदी आहे का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. गुटख्याचे कनेक्शन कसे आहे, त्याच्या मुळाशी जाऊन कारवाई झाली तरच खऱ्या अर्थाने गुटखाबंदी यशस्वी होणार आहे.

गुटखा तयार करणे, विकणे, साठवणे आणि त्याची वाहतूक करणे यावर कायद्याने बंदी घातली आहे. सन २०१२ साली हा कायदा अमलात आणण्यात आला. बंदी असतानाही अवैधरीत्या गुटख्याची राजरोसपणे विक्री सुरूच असल्याचे वास्तव आहे. तालुक्यातील अनेक पानटपऱ्यांवर राजरोसपणे गुटखा विकला जात असताना त्याला आशीर्वाद कोणाचा, असा प्रश्न सामान्य नागरिकांना आहे.

जिल्ह्यात अगदी सहजपणे गुटख्याची तस्करी सुरू आहे. पूर्वी १८८ कलमाद्वारे गुटखाविरोधी कारवाई केली जात होती. अलीकडच्या काळात ३२८ कलम लागू करण्यात आले आहे. यामध्ये सात ते दहा वर्षांची शिक्षा आहे. असे असतानाही गुटख्याची राजरोसपणे सर्रास विक्री सुरू असून त्यातून लाखो रुपयांची उलाढाल सुरू आहे. अवैध व्यवसायावर कठोर कारवाईची सूचना जिल्हा पोलीस प्रमुखांची असताना स्थानिक पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून कारवाई केली जात आहे. जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलीकडील काळात तीन वेळा गुटखा साठ्यावर कारवाई झाली. त्यामुळे गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

..............

शिक्षेची तरतूद

शिरोळ तालुक्यात येणारा गुटखा हा इचलकरंजी मार्गे येतो. कारवाई होते, मात्र त्याच्या मुळाशी जाऊन तपास होत नाही. खरोखरच गुटखाबंदी गंभीरपणे राबवायची असेल तर यावर कारवाई करणारी यंत्रणा आणि आणखी कडक शिक्षेची तरतूद करणे गरजेचे आहे. तरच गुटखाबंदी शक्य आहे.

............

कोट - गुटखा सापडल्यानंतर वाहतूक किंवा साठाधारकांवरच कारवाई होते. गुटखा कोठून आला, कोणत्या कंपनीचा गुटखा आहे. त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई होत नाही. त्यामुळे याच्या मुळाशी जाऊन पाळेमुळे खणून काढली पाहिजेत. तरच खऱ्या अर्थाने गुटखाबंदी होणार आहे.

- डॉ. महावीर अक्कोळे