शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

आर्थिक स्वावलंबन महिला सक्षमीकरणासाठी गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:25 IST

कोल्हापूर : कोणतीही समस्या चांगल्या पद्धतीने सोडविण्याची अंगभूत क्षमताच महिलांना चांगली उद्योजिका बनवू शकते. उद्यमशीलता व त्यासोबत येणारे आर्थिक ...

कोल्हापूर : कोणतीही समस्या चांगल्या पद्धतीने सोडविण्याची अंगभूत क्षमताच महिलांना चांगली उद्योजिका बनवू शकते. उद्यमशीलता व त्यासोबत येणारे आर्थिक स्वावलंबन हीच महिला सक्षमीकरणाची पहिली पायरी आहे, असे प्रतिपादन कृषी विभागाच्या विभागीय उपसंचालक भाग्यश्री पवार-फरांदे यांनी मंगळवारी केले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयात आयोजित ‘फळे व भाजीपाला प्रक्रिया तंत्रज्ञानातील नवीन संधी’ या दोनदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख इंजि. ए. पी. पाटील यांनी फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक उपकरणे व यंत्रे, त्यांची उपलब्धता याविषयी माहिती दिली. याशिवाय विविध फळांपासून जेली व टुटीफ्रुटी बनविण्याचे प्रशिक्षण महाविद्यालयाच्या उद्यानविद्या विभागाचे डॉ. संग्राम धुमाळ यांनी दिले. फळांपासून जॅम निर्मिती तंत्रज्ञान याविषयी डॉ. सीमा सरवदे यांनी प्रशिक्षण दिले. कृत्रिम शीतपेये शरीरास हानिकारक असून फळांपासून आरोग्यानुकूल विविध शीतपेये, स्क्वॅश व रेडी टू सर्व्ह पेय यांची निर्मिती यावर डॉ. यू. एस. शिंदे यांनी प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव शिंदे यांनी महाविद्यालयांच्या उद्यानविद्या विभागामार्फत निर्मित प्रक्रिया केंद्राचा व प्रयोगशाळेचा आढावा घेतला. कार्यक्रमाचा समारोप कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना बक्षीस व प्रमाणपत्र वाटपाने झाला.

फोटो: ०९०३२०२१-कोल-कृषी

फोटो ओळ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोल्हापुरातील कृषी महाविद्यालयात आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात भाग्यश्री पवार यांनी मार्गदर्शन केले.