शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

पर्यावरणपूरक, संवर्धनशील विकासाची गरज

By admin | Updated: January 16, 2016 00:49 IST

कैलाश चंद्रा : विद्यापीठातील ‘जैवविविधता, जैवस्रोतांचे व्यवस्थापन’ परिषदेला प्रारंभ

कोल्हापूर : बदलती जीवनशैली आणि त्या जीवनशैलीच्या मागणीपोटी पर्यावरणाप्रती वाढत चाललेला निष्काळजीपणा त्याला कारणीभूत आहे. त्यासाठी पर्यावरणपूरक, संवर्धनशील विकासाची कास धरणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण संस्थेचे संचालक डॉ. कैलाश चंद्रा यांनी शुक्रवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘जैवविविधता व जैवस्रोतांचे व्यवस्थापन’ या विषयावरील दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठातील वि. स. खांडेकर भाषा भवनातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे होते.डॉ. चंद्रा म्हणाले, जैवविविधता कुठेतरी दूर असते. तिचा आपल्याशी काही संबंध नाही, असे नसते. जैवविविधतेचा आपल्या प्रत्येक कृतीवर परिणाम दिसून येतो. जैवविविधतेच्या ऱ्हासाचे दुष्परिणाम आपल्या दैनंदिन जीवनाच्या दर्जावरही होताना दिसतो. जैवस्रोतांविषयी संशोधन आणि त्यांचे व्यवस्थापन याला आजघडीला कधी नव्हे इतके महत्त्व प्राप्त झाले आहे. प्राणीशास्त्राच्या संशोधकांनी या जैवविविधतेच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावण्याची जबाबदारी उचलावी. जैवस्रोतांचा ऱ्हास मानवाला अजिबात परवडणारा नाही. त्यामुळे केवळ मानवच नव्हे, तर भूतलावरील प्रत्येक प्राणीमात्राच्या अस्तित्वासाठी जैवस्रोतांचे व्यवस्थापन आणि जैवविविधतेचे रक्षण ही अनिवार्य बाब आहे,डॉ. मोरे म्हणाले, वाढत्या लोकसंख्येचा सर्वाधिक चिंताजनक दुष्परिणाम जैवविविधतेवर झालेला आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी जशा उपाययोजना केल्या जातात. तशाच त्या जैवविविधता संवर्धनाच्या बाबतीतही योजणे गरजेचे आहे. यावेळी परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. परिषदेचे समन्वयक डॉ. डी. व्ही. मुळे यांनी प्रास्ताविक केले. परिषदेचे संयोजन सहसचिव डॉ. जी. व्ही. झोडपे यांनी आभार मानले. दरम्यान, उद्घाटनानंतरच्या सत्रात प्रा. जी. एन. वानखेडे, डॉ. पी. एस. भटनागर, डॉ. वरद गिरी यांनी मार्गदर्शन केले. चौथ्या सत्रात उत्कृष्ट शोधनिबंध स्पर्धा व उत्कृष्ट पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा झाली. (प्रतिनिधी)जैवविविधतेच्या ऱ्हासाचे दुष्परिणाम आपल्या दैनंदिन जीवनाच्या दर्जावरही होतात.प्राणीशास्त्राच्या संशोधकांनी या जैवविविधतेच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावण्याची जबाबदारी उचलावी.जैवस्रोतांचा ऱ्हास मानवाला अजिबात परवडणारा नाहीप्राणीमात्राच्या अस्तित्वासाठी जैवस्रोतांचे व्यवस्थापन आणि जैवविविधतेचे रक्षणही अनिवार्य