शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक, संवर्धनशील विकासाची गरज

By admin | Updated: January 16, 2016 00:49 IST

कैलाश चंद्रा : विद्यापीठातील ‘जैवविविधता, जैवस्रोतांचे व्यवस्थापन’ परिषदेला प्रारंभ

कोल्हापूर : बदलती जीवनशैली आणि त्या जीवनशैलीच्या मागणीपोटी पर्यावरणाप्रती वाढत चाललेला निष्काळजीपणा त्याला कारणीभूत आहे. त्यासाठी पर्यावरणपूरक, संवर्धनशील विकासाची कास धरणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण संस्थेचे संचालक डॉ. कैलाश चंद्रा यांनी शुक्रवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘जैवविविधता व जैवस्रोतांचे व्यवस्थापन’ या विषयावरील दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठातील वि. स. खांडेकर भाषा भवनातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे होते.डॉ. चंद्रा म्हणाले, जैवविविधता कुठेतरी दूर असते. तिचा आपल्याशी काही संबंध नाही, असे नसते. जैवविविधतेचा आपल्या प्रत्येक कृतीवर परिणाम दिसून येतो. जैवविविधतेच्या ऱ्हासाचे दुष्परिणाम आपल्या दैनंदिन जीवनाच्या दर्जावरही होताना दिसतो. जैवस्रोतांविषयी संशोधन आणि त्यांचे व्यवस्थापन याला आजघडीला कधी नव्हे इतके महत्त्व प्राप्त झाले आहे. प्राणीशास्त्राच्या संशोधकांनी या जैवविविधतेच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावण्याची जबाबदारी उचलावी. जैवस्रोतांचा ऱ्हास मानवाला अजिबात परवडणारा नाही. त्यामुळे केवळ मानवच नव्हे, तर भूतलावरील प्रत्येक प्राणीमात्राच्या अस्तित्वासाठी जैवस्रोतांचे व्यवस्थापन आणि जैवविविधतेचे रक्षण ही अनिवार्य बाब आहे,डॉ. मोरे म्हणाले, वाढत्या लोकसंख्येचा सर्वाधिक चिंताजनक दुष्परिणाम जैवविविधतेवर झालेला आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी जशा उपाययोजना केल्या जातात. तशाच त्या जैवविविधता संवर्धनाच्या बाबतीतही योजणे गरजेचे आहे. यावेळी परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. परिषदेचे समन्वयक डॉ. डी. व्ही. मुळे यांनी प्रास्ताविक केले. परिषदेचे संयोजन सहसचिव डॉ. जी. व्ही. झोडपे यांनी आभार मानले. दरम्यान, उद्घाटनानंतरच्या सत्रात प्रा. जी. एन. वानखेडे, डॉ. पी. एस. भटनागर, डॉ. वरद गिरी यांनी मार्गदर्शन केले. चौथ्या सत्रात उत्कृष्ट शोधनिबंध स्पर्धा व उत्कृष्ट पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा झाली. (प्रतिनिधी)जैवविविधतेच्या ऱ्हासाचे दुष्परिणाम आपल्या दैनंदिन जीवनाच्या दर्जावरही होतात.प्राणीशास्त्राच्या संशोधकांनी या जैवविविधतेच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावण्याची जबाबदारी उचलावी.जैवस्रोतांचा ऱ्हास मानवाला अजिबात परवडणारा नाहीप्राणीमात्राच्या अस्तित्वासाठी जैवस्रोतांचे व्यवस्थापन आणि जैवविविधतेचे रक्षणही अनिवार्य