शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘सोयीच्या राजकारणा’ने राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता

By admin | Updated: January 18, 2016 01:02 IST

बगलबच्च्यांनाच पदांचे वाटप : संख्याबळ पाहता सत्तेची नुसती ‘फूग’च

कोल्हापूर : स्थानिक नेत्यांनी प्रत्येक निवडणुकीत ‘सोयीची भूमिका’ घेत आपल्या बगलबच्च्यांना संधी देण्याचा सपाटा लावल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. जिल्हा बँक, बाजार समिती, महापालिकेवरील सत्तेचा दावा जरी नेते करत असले तरी त्यातील तुलनात्मक संख्याबळ पाहता राष्ट्रवादीच्या सत्तेची फूग उघड होते. कोल्हापूर व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाते व प्रेम सर्वश्रुत आहे. जिल्ह्णातील सामान्य जनतेनेही हे प्रेम कधी कमी पडू दिले नाही. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर उभा जिल्हा शरद पवार यांच्या मागे उभा राहिला. जिल्ह्णातील सर्व संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. स्वर्गीय दिग्विजय खानविलकर, सदाशिवराव मंडलिक, बाबासाहेब कुपेकर, निवेदिता माने अशा दिग्गज नेत्यांची फळी पक्षाकडे असल्याने कोणत्याही निवडणुकीचे आव्हान सहज परतवून लावण्याची कसब या नेत्यांकडे होती पण सत्तेची ऊब जास्त काळ राहिली, तसे पक्षातंर्गत कुरघोड्यांनी डोके वर काढले. त्यातूनच एक-एक घराणे, नेते पक्षातून बाजूला गेले. प्रत्येक निवडणुकीत नेत्यांनी ‘सोयीची भूमिका’ घेतल्याने निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची भावना पक्षात आहे. कोल्हापूर शहरासह इतर पदाधिकारी निवडताना आपल्याच बगलबच्च्यांना संधी दिल्याचा थेट आरोप नेत्यांवर होत आहे. त्यातूनच शहर राष्ट्रवादीअंतर्गत खदखद वाढली आहे. चार दिवसांपूर्वी पन्हाळगडावर राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, त्यात तर कार्यकर्त्यांनी नेत्यांवरच हल्ला चढविला. जिल्हा बँकेत दोन ‘स्वीकृत सदस्य’ निवडीत ही ज्या तालुक्यात प्रतिनिधीत्व नाही, तेथील कार्यकर्त्यांना बळ देणे अपेक्षित होते पण तसे न करता जनसुराज्य पक्षाचे प्रा. जयंत पाटील व आसिफ फरास यांना ‘स्वीकृत’ म्हणून संधी दिली. महापालिका ‘स्वीकृत नगरसेवक’ नियुक्त करतानाही आमदार मुश्रीफ यांनी जे करायचे तेच केले. जिल्हा बँकेत स्वीकृत म्हणून घेतलेल्या प्रा. जयंत पाटील यांना महापालिकेतही ‘स्वीकृत नगरसेवक’ म्हणून संधी दिली. त्यामुळे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. एका बाजूला खासदार धनंजय महाडिक पक्षापासून दूर चालले आहेत, त्यात नेतेच जर कार्यकर्त्यांना बळ देणार नसतील तर पक्षात राहून काय उपयोग, अशी भावना प्रामाणिक कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यातूनच पक्षांतर्गत राजीनामा नाट्याचे प्रकार सुरू झाले आहेत. मागील दहा वर्षांत जिल्हा बॅँक, बाजार समितीसह महापालिकेत निर्विवाद बहुमत होते; पण सध्याची जिल्हा बँकेतील बलाबल पाहिले तर पक्षाचे २१ पैकी सातच संचालक आहेत. बाजार समिती १९ पैकी ८ सदस्य तर महापालिकेत ८१ पैकी १५ नगरसेवक आहेत. मागील सभागृहात जिल्हा बँकेत १५, बाजार समितीत ११ सदस्य तर महापालिकेत २५ नगरसेवक होते. तुलनात्मक आकडेवारी पाहिली तर राष्ट्रवादीची सत्तेची फूग दिसून येते. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, हातकणंगले, गगनबावडा, चंदगड या तालुक्यांत राष्ट्रवादीचे अस्तित्व दिसत नाही. नेत्यांनी ‘सोयीची भूमिका’ सोडून कार्यकर्त्यांना बळ दिले नाही तर महापालिकेपेक्षा वेगळा निकाल लागेल असे वाटत नाही.