शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

‘राष्ट्रवादी’चे विरोधक एकत्र?

By admin | Updated: February 1, 2017 00:14 IST

हालचालींना वेग : शिंदे, गड्यान्नावर, चव्हाण, अप्पी, हत्तरकींची बैठक

राम मगदूम -- गडहिंग्लज --राष्ट्रवादीचा वारू रोखण्यासाठी गडहिंग्लज तालुक्यातील सर्व विरोधक एकत्र येण्याच्या हालचालींना दोन दिवसांत वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर जनता दल, स्वाभिमानी, भाजप आणि अप्पी पाटील व हत्तरकी गटाची संयुक्त बैठक सोमवारी रात्री गडहिंग्लजमध्ये झाली.राष्ट्रवादीच्या विरोधात गेल्यावेळीही जनता दल-जनसुराज्य व काँगे्रसची आघाडी रिंगणात होती. मात्र, बाबासाहेब कुपेकर यांनी या आघाडीवर एकतर्फी मात केली होती. मात्र, त्यांच्या पश्चात होणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची व्युहरचना विरोधकांत सुरू आहे. किंंबहुना, ‘राष्ट्रवादी हटाव’ या मुद्द्यावर ही मंडळी एकत्र येण्याची शक्यता आहे.गेल्यावेळी राष्ट्रवादीने तालुक्यातील पाचही जि. प. आणि दहांपैकी आठ जागा जिंकून पंचायत समितीची सत्ता अबाधित राखण्यात यश मिळविले होते. मात्र, कुपेकरांच्या पश्चात अंतर्गत मतभेदांमुळेच तालुक्यात प्रबळ असूनही पक्षासमोरील ‘कटकटी’ वाढल्या. बड्याचीवाडी आणि भडगाव गटातील उमेदवार निवडीचा गुंता अधिक जटील झाला आहे.गडहिंग्लज कारखान्याप्रमाणेच या निवडणुकीतही एकत्र येण्याच्या हालचाली राष्ट्रवादी व जनता दलात सुरू आहेत. मात्र, जि. प.च्या नूल जागेचा प्रश्न प्रलंबित आहे. दरम्यान, हत्तरकी गटाशी युती करून बेरजेत बाजी मारलेल्या स्वाभिमानीच्या राजेंद्र गड्यान्नावर यांनी श्रीपतराव शिंदे यांच्यासह जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील, भाजपचे प्रकाश चव्हाण या तिघांनाही चर्चेसाठी सोमवारी एकत्र आणले.मात्र, त्याचदिवशी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये गिजवणे व नेसरी या महत्त्वाच्या गटांतील उमेदवारांचा समावेश आहे. हे दोन गट सोडून चर्चा व्हावी, अशी भाजपची अपेक्षा आहे. त्यामुळेच सांगोपांग चर्चा होऊ शकली नाही. मात्र, एकत्र येण्याबरोबर सर्वांनीच अनुकूलता दाखविली. त्यामुळेच सर्वसमावेशक विरोधी आघाडीची शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाले तर ‘प्रबळ राष्ट्रवादी’ला गडहिंग्लजमध्ये अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागेल, एवढे मात्र निश्चित.काय झाली चर्चा !भाजपने नेसरीतून हेमंत कोलेकर व गिजवणेसाठी संजय बटकडली यांची उमेदवारी जाहीर केली आहे. हे दोन गट सोडून उर्वरित भडगाव, हलकर्णी व नूल या तीन गटांच्या जागावाटपाबाबत चर्चा व्हावी, असे भाजपचे म्हणणे आहे. मात्र, त्यास इतरांची तयारी नाही.पाचही गटांतील जागावाटपाबाबत मतदारसंघनिहाय प्रत्येकाची ताकद आणि निवडून येण्याची क्षमता यासंदर्भात विचारविनियम होऊन जागा वाटप आणि उमेदवारांच्या निवडीवर बैठकीत एकमत झाल्याचे समजते. त्यामुळेच विरोधकांच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.