शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

लॉनच्या नावाखाली ३२ लाखांचा चुराडा

By admin | Updated: March 29, 2017 00:33 IST

जिल्हा परिषदेचा कारभार : नावीन्यपूर्ण योजनेतील कामाचे भीषण वास्तव

समीर देशपांडे ---कोल्हापूर --कुणीतरी एखादी योजना मांडायची, ती किती महत्त्वाची आहे, हे अधिकारी आणि सहकाऱ्यांना पटवून द्यायचे. अधिकाऱ्यांनाही नावीन्यपूर्ण योजनांचा मोह पडलेलाच असतो आणि मग बेकायदेशीरपणे शासनाच्याच पैशांचा कसा चुराडा केला जातो, याचे उत्तम उदाहरण म्हणून जिल्हा परिषदेच्या शेजारीच असलेल्या लॉनच्या उपक्रमाकडे पाहावे लागेल. तब्बल ३२ लाख रुपये खर्चून केलेल्या या प्रकल्पाच्या ठिकाणी हिरवळीऐवजी चक्क आता कमरेपर्यंत गवत उगवले आहे! नागाळा पार्कमधील जिल्हा परिषदेशेजारीच नागोबा मंदिरासमोर पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. त्यासमोर ३४,३५० चौरस फूट रिकामी जागा होती. या रिकाम्या जागेवरील लॉन विकसित करून, ५३६ चौरस फुटांचे स्टेज बांधून सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी किंवा विवाह व तत्सम कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्याची कल्पना मांडण्यात आली. यातून जिल्हा परिषदेला चांगले उत्पन्न मिळेल, असे गणित कागदोपत्री दाखविण्यात आले. हिशेब घातला गेला आणि मग वर्षातून १०० दिवस जरी लॉनसाठी भाडे मिळाले तरी ते उत्पन्नवाढीसाठी योग्य असल्याचा सर्वांनाच साक्षात्कार झाला. स्थायी समितीमध्ये १३७ क्रमांकाच्या ठरावाने २६ डिसेंबर २०१२ रोजी या नावीन्यपूर्ण योजनेला मान्यता देण्यात आली. सर्वसाधारण सभेच्या आधीच ७ फेबु्रवारी २०१३ रोजी महानगरपालिकेकडे यासाठी परवानगी मागण्यात आली. या कामासाठी बांधकाम परवाना देण्यासाठी ५५ लाख ६३ हजार ६५६ रुपये भरावेत, असे पत्र महापालिकेने जिल्हा परिषदेला पाठविल्याने पदाधिकारी गडबडले. मग २२ जानेवारी २०१४ रोजी याबाबत दोन्हीकडील अधिकाऱ्यांची चर्चा झाली. जिल्हा परिषद ही शासनाअंतर्गतची स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने ही रक्कम कमी करावी, असा ठराव ६ आॅगस्ट २०१४ रोजीच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. यानंतर ९ जानेवारी २०१५ रोजी तत्कालीन आयुक्तांना भेटण्यासाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार हे महापालिकेत गेले. यानंतर २३ जून २०१६ रोजी महापालिकेने बांधकाम परवाना देताना मूळची रक्कम कमी करून १ लाख ७३ हजार रुपये भरावेत, असे पत्र महापालिकेकडून जिल्हा परिषदेला पाठविण्यात आले; परंतु हे पत्र येईपर्यंत वाट न पाहता त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने काम सुरू करून ३१ लाख ५९ हजार रुपये खर्च करून कंत्राटदारांचीबिलेही अदा करून टाकली आहेत. हेतू चांगला ठेवून जरी योजना आखली असली तरी, जिल्हा परिषदेचाच शिक्षक पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम वगळता एकही कार्यक्रम येथे घेता आलेला नाही. शासनाकडून येणे असलेल्या ८० कोटी रुपयांपेक्षा जास्त थकीत पैसे गेल्या चार वर्षांत जिल्हा परिषदेला मिळाल्याने भरीव कामकाज करण्यापेक्षा अशा पद्धतीने नावीन्यपूर्ण योजनांच्या नावाखाली पैशांचा कसा चुराडा केला जातो, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. स्टेज आणि लॉनसाठी आलेला खर्चअ. न.कामाचे स्वरूपझालेला खर्च१स्टेज बांधकाम ५,००,०००.००/-२दोन खोल्या३,७८,४६१.००/-४,९९,७५३.००/-३चारचाकी वाहनतळ४,९५,५५३.००/-४दुचाकी वाहनतळ३,४१,५९३.००/-५पाण्याची टाकी२,१३,४२४.००/-६पुरुष, महिला (संडास, बाथरूम)४,९९,२२६.००/-७स्टेजसमोर टाइल्स२,३१,६४५.००/-ैएकूण -३१,५९,४३१.००/-