शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

नागदेववाडी, वडणगेला मलेरियाचा विळखा

By admin | Updated: September 18, 2015 00:33 IST

आरोग्य विभाग हतबल : तीन महिन्यांपासून फैलाव, सध्या १६५ रुग्ण

कोल्हापूर : शहरालगत असलेल्या करवीर तालुक्यातील नागदेववाडी, वडणगे ही दोन गावे गेल्या तीन महिन्यांपासून मलेरियाच्या विळख्यात आहेत. साथ पूर्णपणे आटोक्यात येत नसल्यामुळे आरोग्य विभाग हतबल झाला आहे. परिणामी, हा आजार हद्दपार करणे हे आरोग्य विभागासमोर आव्हान आहे. शहरापासून पाच किलोमीटरच्या आत ही गावे आहेत. वडणगेची लोकसंख्या ११ हजार ९९८, तर नागदेववाडीची लोकसंख्या १८९० आहे. दोन्ही गावांत सेंट्रिंग व्यवसाय व बांधकाम कामगार यांची संख्या अधिक आहे. जूनपासून या दोन्ही गावांत हिवताप, मलेरियाचे रुग्ण मोठ्या संख्येने मिळत आहेत. शासनाचे आरोग्य पथक सक्रिय आहे. वेळीच उपाययोजनाही सुरू केल्या; परंतु रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढत आहे. परिणामी, आरोग्य यंत्रणा चक्रावून गेली आहे. साथ पूर्णपणे आटोक्यात आणणे आव्हानात्मक बनले आहे. प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन त्वरित उपचारांची सेवा दिली जात आहे. गावात पिण्याच्या पाण्याचा अनियमित पुरवठा होत असतो. यामुळे बहुतांश कुटुंबांचा पाणी साठवून ठेवण्याकडे कल आहे. साठविलेल्या पाण्यात डासांची निर्मिती होत आहे. डासांच्या माध्यमातून हिवताप, मलेरिया फैलावत आहे. ग्रामस्थांना, साठविलेले पाणी झाकून ठेवा, कोरडा दिवस पाळा, डासांपासून वैयक्तिक संरक्षण करा, घराशेजारी पडलेल्या वाहनांच्या विनावापराच्या टायरची विल्हेवाट लावा, स्वच्छता ठेवा, असे आवाहन आरोग्य पथक करीत आहे. १६५ रुग्णदोन्ही गावांत सध्या मलेरियाचे १६५ रुग्ण आहेत. थंडी, ताप ही लक्षणे आहेत. सात दिवसांपेक्षा अधिक काळ ही लक्षणे राहिल्यास रुग्णांची प्रकृती खालावते. त्यामुळे पहिल्या टप्प्यातच संबंधित रुग्णांनी रुग्णालयात उपचारासाठी जावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे केले जात आहे. परंतु, दोन्ही गावांतील मलेरियाच्या रुग्णांची मानसिकता त्वरित उपचार न घेण्याची झाल्याचे आरोग्य प्रशासनाने निष्कर्ष काढला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वडणगे, नागदेववाडी गावांत मलेरियाचे रुग्ण आहेत. आरोग्य पथकांद्वारे प्रत्येक घरांचा सर्व्हे केला आहे. जागृतीही केली आहे, तरीही या दोन गावांतील मलेरिया पूर्णपणे आटोक्यात येत नाही. आजार आटोक्यात येण्यासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य करावे.- संतोष तावशी,जिल्हा साथरोग नियंत्रण वैद्यकीय अधिकारी