शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

कस्तुरी एव्हरेस्टपासून दोन टप्पे दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:24 IST

तिने गेल्या दाेन दिवसांपासून एव्हरेस्टच्या अंतिम चढाईस सुरुवात केली आहे. तिने या दोन दिवसांच्या कालावधीत एक व दोन क्रमांकाचे ...

तिने गेल्या दाेन दिवसांपासून एव्हरेस्टच्या अंतिम चढाईस सुरुवात केली आहे. तिने या दोन दिवसांच्या कालावधीत एक व दोन क्रमांकाचे महत्त्वाचे कॅम्प पूर्ण केले आहेत. अत्यंत खडतर असे हे टप्पे तिने पार केले आहेत. तिच्या या मोहिमेत एकूण १२ जण सहभागी झाले आहेत. ते सर्वजण सुखरूप आहेत. या मोहिमेसाठी भारतासह परदेशातील २५० जणांची जगभरातून निवड झाली आहे. त्यापैकी १०० जणांनी रविवारी हा स्वप्नवत ठरणारा एव्हरेस्ट सर केला. आज, सोमवारी व उद्या, मंगळवारी रात्रीपर्यंत ती तिसऱ्या क्रमांकाचा कॅम्प ती पूर्ण करणार आहे, तर मंगळवारी रात्री पुन्हा शेवटच्या कॅम्पकडे ती रवाना होणार असून सकाळी ६ ते ८ या काळात ती एव्हरेस्टचा माथा चढून भारतीय तिरंगा तेथे फडकविणार आहे. अत्यंत खडतर अशा मोहीमेदरम्यान तिला अनंत अडचणी येत आहेत. त्यात तिच्यासाठी निसर्गानेही चांगली संधी आणली आहे. या दोन ते तीन दिवसांच्या काळात छोटी वेदर विन्डो अर्थात पोषक वातावरण तिच्यासाठी तयार केले आहे. त्यामुळे बुधवारी सकाळपर्यंत ती हे स्वप्नवत वाटणारे आणि गिर्यारोहकांचे स्वप्न असणारे माऊंट एव्हरेस्ट सर करेल, असा विश्वास करवीरवासीयांसह संपूर्ण महाराष्ट्राला आहे.

मालोजीराजे यांच्याकडून ५० हजारांची मदत

मालोजीराजे यांना कस्तुरीला तिथे आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत असल्याचे समजले. त्यांनी तत्काळ रविवारी सकाळी तिचे वडील दीपक सावेकर यांच्याकडे पन्नास हजार रुपये देत तिच्या या मोहिमेला पाठबळ दिले. यावेळी मधुरिमाराजे, यशराजराजे, उद्योगपती तेज घाटगे, जयप्रसाद कामत उपस्थित होते.

फोटो : २३०५२०२१-कोल-सावेकर

फोटो : २३०५२०२१-कोल-कस्तुरी सावेकर

सोमवारी पहाटे ती कॅम्प तीनकडे चढाई करणार आहे. तिथे मुक्काम करून ती चौथ्या व अंतिम कॅम्पकडे मंगळवारी रात्री कूच करणार आहे. बुधवारी सकाळी ६ ते ८ या काळात ती अंतिम शिखर सर करून भारताचा तिरंगा फडकविणार आहे.