शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

चेंबूरजवळ पाच हजार बंदींच्या क्षमतेचे बहुमजली कारागृह उभारणार: सुनील रामानंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : बंदिजनांसाठी राज्यातील कारागृहांची संख्या अपुरी पडू लागल्याने सुमारे पाच हजार बंदिजन क्षमतेचे बहुमजली कारागृह ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : बंदिजनांसाठी राज्यातील कारागृहांची संख्या अपुरी पडू लागल्याने सुमारे पाच हजार बंदिजन क्षमतेचे बहुमजली कारागृह उभारणार आहे. हे कारागृह मुंबईतील चेंबूर-मानखुर्द दरम्यान शासनाच्या महिला व बालकल्याणच्या सुमारे १५ एकर जागेत उभारण्यात येणार आहे, त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील २४ हजार बंदींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित ३० टक्के बंदिजनांचे लसीकरणही लवकरच पूर्ण केले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी कारागृह महानिरीक्षक रामानंद यांनी राज्यातील सर्व कारागृहांची पाहणी व संपर्क दौरा सुरु केला आहे. कोल्हापूर येथील पाहणीनंतर रामानंद म्हणाले, सध्या विदर्भ, मराठवाड्यातील कारागृहांना भेट देऊन पुणे विभागीय दौरा सुरु केला आहे. राज्यातील सर्वच कारागृहांत ३६ हजार बंदिजन असून, वेळीच उपाययोजना केल्याने कारागृहात कोरोनाचा शिरकाव कमी झाला. राज्यात दक्षता म्हणून ४२ ठिकाणी तात्पुरती कारागृह उभारली. कोेरोनामुळे गेल्या दीड वर्षात राज्यात ८० बंदींचा तर कोल्हापुरात तिघांचा मृत्यू झाला. राज्यातील कारागृहात बंदींची क्षमतेपेक्षा अधिक संख्या असल्याने भविष्यात नवे कारागृह उभारावे लागणार आहे, त्या पार्श्वभूमीवर मुंबईत चेंबूरजवळ सुमारे ५ हजार बंदिजन क्षमतेचे बहुमजली कारागृह उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे दिलेला आहे. या बहुमजली कारागृहात तळमजल्यावर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासाची सोय करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

-----------------------------------------

कारागृहात फाशी यार्डची आवश्यकता नाही

रामानंद म्हणाले, फाशीची शिक्षा होण्याच्या घटना दुर्मीळ आहेत. फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर अंमलबजावणीला बराच काळ जातो. फाशी देण्याचा दुर्मीळ प्रसंग असतो. फाशी यार्ड विभाग नाहक खर्चिक असतो. नागपूर, येरवडा, ठाणे येथील फाशी यार्ड मोडकळीला आले आहेत. फाशीची शिक्षा झालेले सुमारे ५० हून अधिक आरोपी सध्या राज्यातील विविध कारागृहांमध्ये अपिलात असल्याचेही त्यांनी सांगितले.

-----------------------------------------

बंदीचा कॅन्टीन खर्च आता महिना ४,५०० रुपये

रामानंद म्हणाले, राज्यातील बंदींना कारागृहातील कॅन्टीनचा खर्च करण्यास यापूर्वी महिना ३,५०० रुपयेपर्यंत मुभा होती, त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तो ४,५०० रुपयेपर्यंत वाढवला आहे. हा खर्च बंदींना आपल्या रोजगारातून अगर नातेवाईकांनी जमा केलेल्या पैशातून केला जाणार आहे.