शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मुत्सद्दी ‘राष्ट्रवादी’मुळे मित्रपक्ष घायाळ

By admin | Updated: July 10, 2014 00:58 IST

आजरा साखर कारखाना : पदाधिकारी निवडीला विधानसभा निवडणुकीची किनार

ज्योतीप्रसाद सावंत - आजरा ,सत्तांतरासाठी सर्वपक्षीयांनी मोट एकत्र बांधायची, सत्ता मिळाल्यानंतर मात्र पद्धतशीररीत्या संस्थेवर आपले वर्चस्व ठेवायचे, असा काहीसा जुनाच फॉर्म्युला ‘राष्ट्रवादी’कडून आजरा साखर कारखाना निवडणुकीत वापरला जात आहे. कारखान्यासारख्या महत्त्वाच्या सहकारी संस्थेची सूत्रे सहजासहजी आणि तेही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मित्रपक्षांकडे सोपविण्याची घोडचूक नेतेमंडळी करतील, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. यामुळे मित्रपक्षांकडे केवळ बघ्याची भूमिका राहिली आहे.सत्तांतरानंतर अध्यक्षपदाचे पहिले दावेदार विष्णुपंत केसरकर होते; पंरतु ऐनवेळी वसंतराव धुरे यांचे नाव पुढे आले. अध्यक्षपदासाठी तीन वर्षे केसरकर ‘वेटिंग’वरच राहिले. यावेळीही केसरकरांना अध्यक्षपदापासून रोखण्यास काही संचालक सक्रिय होते; पंरतु केसरकरांना डावलणे हे तितकेसे सोपे नसल्याने नेतेमंडळींनी अखेर त्यांच्या ‘अध्यक्षपदा’वर शिक्कामोर्तब करून टाकले.अध्यक्षपदाचा निर्णय संपत आला असतानाच उपाध्यक्षपदाचा मुद्दा ऐरणीवर आला. सत्तेतील घटकपक्ष या नात्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपाध्यक्षपदी संधी मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींकडे सुरू केली. संघटनेचे दोन संचालक असताना आनंदराव कुलकर्णी यांचे संघटनेकडून नाव पुढे आणले गेले. मिसाळ व जाधव या दोन्ही पर्यायांना स्वाभिमानीकडून विरोध झाला. उपाध्यक्षपद स्वाभिमानीला द्या, तर मग कुलकर्णी स्वाभिमानीचे आहेतका? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. उपाध्यक्षपद द्या; पण मिसाळ नको, असा ठेका स्वाभिमानीने धरल्याने संघटनेतील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आला. कुलकर्णी यांचा चेहरा पुढे करून चंदगड-गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघात ‘स्वाभिमानी’च्या उमेदवाराला बळकटी देण्याचा संघटनेचा हेतूही स्पष्ट झाला.मुळातच येत्या विधानसभेत या मतदारसंघात राष्ट्रवादीसमोर स्वाभिमानीचे कडवे आव्हान असणार हे सर्वश्रृत आहे, अशावेळी राष्ट्रवादीचे नेते उपाध्यक्षपद स्वाभिमानीकडे देण्याचा मूर्खपणा करणार नाही हेही स्पष्ट झाले.परिणामी स्वाभिमानी हतबल झाली, तर तिकडे प्रा. सुनील शिंत्रे व श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी पदाधिकारी निवडीच्या पद्धतीबद्दल उघड नाराजी व्यक्त करीत सभेकडे पाठ फिरविली. हे देखील राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडले असून, त्यामुळे उपाध्यक्षपदी घोरपडे यांची निवड होण्यात फारशी अडचण आली नाही.