शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जेवढे नुकसान, त्यापटीत कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पूरग्रस्त टपरीधारक, दुकानदार, व्यावसायिक यांना त्यांचे व्यवसाय पुन्हा नव्याने उभे करण्याच्या हेतूने राज्य सरकारने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पूरग्रस्त टपरीधारक, दुकानदार, व्यावसायिक यांना त्यांचे व्यवसाय पुन्हा नव्याने उभे करण्याच्या हेतूने राज्य सरकारने जिल्हा मध्यवर्ती बँकांमार्फत ५ ते ६ टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, सरकारने निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि जेवढे नुकसान झाले आहे, त्याच्या पटीत कर्ज मिळावे, अशी अपेक्षा व्यावसायिकांतून व्यक्त होत आहे. आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यानुसार महानगरपालिका हद्दीत ३३७० टपरीधारक, दुकानदार व व्यावसायिकांना राज्य सरकारच्या निर्णयाचा लाभ मिळू शकतो.

कोल्हापूर जिल्ह्यात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे टपरीधारक, दुकानदार, व्यावसायिक यांचे मोठे नुकसान झाले. आधी कोरोनाने नुकसान, तर आता महापुरामुळे नुकसान सहन करण्यापलीकडे आहे. पूरग्रस्तांच्या या वेदनांचा विचार करून बुधवारी राज्य सरकारने पूरग्रस्त व्यावसायिकांना जिल्हा बँकांच्या माध्यमातून पाच ते सहा टक्के दराने कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला.

सध्या कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. जिल्ह्याच्या अनेक भागांतून पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयाचा किती व्यावसायिकांना लाभ मिळणार हे पाहण्यासाठी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिवाय अजून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचेही कर्ज देण्याबाबतचे धोरण ठरलेले नाही. लवकरच याबाबतची स्पष्टता होईल, अशी अपेक्षा आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील नुकसानग्रस्तांचे पंचनामे सुरू झाले आहेत, अजूनही काही माहिती मिळाली तर पंचनामे करण्याची महापालिका प्रशासनाची तयारी आहे. करवीर तहसील कार्यालय व महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत ३३७० टपरीधारक, दुकानदार, व्यावसायिक यांच्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत.

राज्य सरकारच्या निर्णयाचे व्यावसायिकांनी स्वागत केले आहे. परंतु, सरकारने नुसते अध्यादेश काढून थांबू नये, त्याची अंमलबजावणी करावी. नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असल्यामुळे जर व्यवसाय पुन्हा उभा करायचा असेल, तर नुकसानीच्या प्रमाणात कर्ज दिले पाहिजे, जास्तीत जास्त गरजू व्यावसायिकांना कर्जाचा लाभ मिळाला पाहिजे, अशा अपेक्षाही व्यावसायिकांनी व्यक्त केल्या आहेत.

---------

जिल्हा बँकेमार्फत पूरग्रस्तांना पाच ते सहा टक्क्यांनी कर्ज दिले जाणार आहे, परंतु कर्जाची मर्यादा व मुदत किती असावी, निकष याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला जाईल. लवकरच बैठक घेतली जाईल.

हसन मुश्रीफ,

ग्रामविकास मंत्री तथा अध्यक्ष, जिल्हा बँक

जिल्ह्यातील व्यावसायिक जिल्हा बँकेचे सभासद नाहीत. त्यामुळे कर्ज मिळणार का आणि कशा पद्धतीने मिळणार याचे स्पष्टीकरण व्हावे. खरोखरच व्यावसायिकांना उभे करायचे असेल तर त्यांचे जेवढे नुकसान झाले, तेवढे तरी किमान कर्ज मिळावे.

संजय शेटे, अध्यक्ष

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स.

- महापालिका हद्दीतील पंचनामे असे -

१. कुटुंबाना सानुग्रह अनुदान - १० हजार ३५१

२. कुटुंबीयांना निर्वाह भत्ता अनुदान - ४३६४

३. घरांची पडझड - १२२

४. गोठा पडझड - १०८

५. व्यावसायिक - ३३७०

६. हस्तकला / कारागीर - ४१०