शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

जिल्ह्यातील ३२ शहरे, गावांमध्ये ५०हून जास्त कोरोना रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील ३२ शहरे आणि गावांमध्ये ५०हून अधिक तर ७६ गावांमध्ये २५हून अधिक कोरोनाचे रूग्ण सक्रिय आहेत. त्यामुळे ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील ३२ शहरे आणि गावांमध्ये ५०हून अधिक तर ७६ गावांमध्ये २५हून अधिक कोरोनाचे रूग्ण सक्रिय आहेत. त्यामुळे या गावांमध्ये घरोघरी जाऊन स्वॅब संकलन करण्याची मोहीम राबविण्याचा आरोग्य विभागाचा विचार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत कोरोनाच्या चाचण्या वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यातही ग्रामीण भागामध्ये ज्या गावांमध्ये सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या अधिक आहे, अशाठिकाणी अधिक लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ४०० अशी गावे आहेत की, ज्यामध्ये किमान ५ आणि त्याहून अधिक कोरोना रूग्ण सक्रिय आहेत. त्यामुळे याच गावांमधील रूग्णसंख्या वाढू नये, यासाठी आता आरोग्य विभागाने कंबर कसली आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत गतवर्षी राबविण्यात आलेल्या उपाययोजना, ग्राम समित्या आणि प्रभाग समित्यांचे प्रभावी काम आणि यंदा झालेले दुर्लक्ष यावर जोरदार चर्चा झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार सूचना आणि लेखी आदेश काढल्यानंतरही गावपातळीवरील ग्राम समित्या म्हणाव्या तशा सक्रिय झाल्या नाहीत. महापालिकेने कितीही दावा केला तरी अजूनही शहरातील अनेक घरांमधील कोरोना रूग्ण बरे होऊन घराबाहेर पडले तरी गल्लीत माहिती नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे रूग्णसंख्या वाढत गेली आहे.

चौकट

संस्थात्मक विलगीकरणाच्या केवळ सूचना

गेल्यावर्षी गावाबाहेरून आलेली व्यक्ती सक्तीने शाळेत किंवा शहरामध्ये संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवली गेली. शहरांमधील हॉटेलमध्येही तशी व्यवस्था करण्यात आली. परंतु, यंदा महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीचे कुणीच वाईटपणा घ्यायला तयार नसल्याने पुण्या-मुंबईहून आलेले अनेकजण थेट घरातच राहायला गेले. जे पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांचीही बाहेर कुठे नीट सोय होण्याची खात्री नसल्याने ते घरातच राहिले. अशा घरात राहिलेल्या रूग्णांमुळेही कोरोना रग्णसंख्येत वाढ झाल्याचे आरोग्य विभाग आणि प्रशासनाचे म्हणणे आहे.

चौकट

गावे आणि सक्रिय रूग्णसंख्या खालीलप्रमाणे

इचलकरंजी ३७३

जयसिंगपूर १९१

उचगाव १५३

कोडोली १३९

पाचगाव १३७

हातकणंगले १०९

कागल ९५

शिरोली ८०

वडणगे ८०

गडहिंग्लज ७४

कुंभोज ७२

उत्तूर ६५

हेर्ले ६३

कळंबा ६३

वडगाव ६०

वाठार ६०

पारगाव ५६

रूकडी ५५

गणेशवाडी ५५

शिये ५५

कबनूर ५२

शिरोळ ५२

कोरोची ५१

कणेरी ५१

उजळाईवाडी ५१

कोट

जिल्ह्यातील ४०० गावांमध्ये पाच आणि पाचपेक्षा अधिक रूग्ण आहेत. ७६ गावांमध्ये २५हून अधिक रूग्ण आहेत आणि ३२ शहर, गावांमध्ये ५०हून अधिक रूग्ण आहेत. या मोठ्या गावांमध्ये कोरोना रूग्णसंख्या सातत्याने वाढती राहिल्याने आता आरोग्य विभागाने तिकडे पूर्ण लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. घरोघरी जाऊन स्वॅब घेण्याचा प्रयत्न राहणार आहे.

- डॉ. उषादेवी कुंभार, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी