शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या लुटीविरोधात महावितरणवर मोर्चा ‌‌- धनाजी चुडमुंगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:16 IST

उदगाव : महावितरणकडून महापुराच्या काळात सुमारे पाच ते सहा महिने नदीवरील विद्युत मोटारी बंद असताना त्या काळातील वीजबिले शेतकऱ्यांना ...

उदगाव : महावितरणकडून महापुराच्या काळात सुमारे पाच ते सहा महिने नदीवरील विद्युत मोटारी बंद असताना त्या काळातील वीजबिले शेतकऱ्यांना देण्यात आली आहेत. तसेच गेल्या वर्षभरात विद्युत मीटरचे रिडींग न घेताच शेतकऱ्यांना बिले अदा केली जात आहेत. त्यामुळे २ ऑगस्टला महावितरण कंपनीवर आंदोलन अंकुशच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी केले आहे.

चिंचवाड (ता. शिरोळ) येथे कृषिपंपधारकांचा मेळावा झाला. यावेळी चुडमुंगे म्हणाले, आंदोलन अंकुशतर्फे गेल्या वर्षभरापासून महावितरणविरूद्ध लढा सुरू आहे. महावितरण कंपनी शेतकऱ्यांना लुटण्याचे काम करत आहे. या लुटीला बळी न पडता शेतकऱ्यांनी जागरूक राहावे, असे आवाहन त्यांनी केले. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सचिन पाटोळे होते.

यावेळी आप्पासो कदम, राकेश जगदाळे, भूषण गंगावणे, योगेश जाधव, अमर गावडे, शशिकांत काळे, कृष्णा देशमुख, सुरगोंडा पाटील, सुरेश चौगुले, मयूर काळे, पोपट पाटोळे, कलगोंडा पाटील, सचिन मिरजे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.