शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
2
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
3
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
4
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
5
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
6
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
7
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
8
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
9
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
10
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
11
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
12
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
13
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
14
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
15
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
16
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
17
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
18
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
19
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
20
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 

मुरगूडचे रुग्णालय सलाईनवर

By admin | Updated: December 21, 2015 00:38 IST

अधीक्षकासह तीन पदे रिक्त : रुग्णांची हेळसांड; प्रशासकीय खेळखंडोबा

अनिल पाटील-- मुरगूड -येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून वैद्यकीय अधीक्षक व दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्तच असल्याने उपलब्ध डॉक्टरांवर रुग्ण तपासणीचा अतिरिक्त ताण पडत आहे. रुग्णांना दिवसभर तिष्ठत बसावे लागत आहे. पुरेशा डॉक्टरांविना हे रुग्णालयच सध्या सलाईनवर आहे.या ग्रामीण रुग्णालयात दररोज दोनशे ते अडीचशे बाह्यरुग्णांची नोंद, रक्त चाचण्या, प्रसूती आदींसाठीही झुंबड उडालेली असते. कागल, भुदरगड व राधानगरी तालुक्यांतील रुग्णांची संख्या मोठी आहे. मोफत उपचारामुळे या ग्रामीण रुग्णालयाकडे रुग्णांचा ओढा जास्त आहे; पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यातच काही डॉक्टर मुद्दामच गैरहजर राहत असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ. एम. बी. थोरात यांची बदली होऊन वर्ष सरत आले. ही जागा अद्याप रिक्त आहे. अधीक्षक नसल्याने प्रशासन व आरोग्यसेवेवर विपरित परिणाम झाला आहे. अधीक्षक पदाचा कार्यभार डॉ. पी. वाय. तारळेकर यांच्याकडे सोपविला आहे. प्रशासकीय काम, दररोज दोनशे ते अडीचशे रुग्णांना सामोरे जाणे त्यांना अशक्य आहे. मध्यंतरी स्थानिकचे डॉ. स्वप्निल माळवदे यांची नियुक्ती झाली होती. त्यामुळे जादा वेळ देऊन ते रुग्णांना सेवा देत होते; पण त्यांचीही गगनबावडा येथे बदली झाल्याने तेही पद रिकामेच आहे. अधीक्षक पदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या डॉ. तारळेकर यांच्यावरच सर्वस्वी जबाबदारी येत आहे. प्रशासन चालवायचे, आरोग्यसेवेकडे लक्ष द्यावयाचे की रुग्णांना सामोरे जायचे, अशा अनेक प्रश्नांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. अपघातातील गंभीर रुग्ण दाखल झाला, तर बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांना वाऱ्यावर सोडून डॉक्टरांना गंभीर रुग्णांवर उपचार करावे लागतात. दरम्यान, बालरोगतज्ज्ञ डॉ. शामसुंदर सागर यांची बदली झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून या विभागातील सेवाही कोलमडली आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून डॉ. अमर पाटील दाखल झाले असले तरी येथील आरोग्यसेविकांची संख्या अपुरी आहे. शासनाने या रुग्णालयातील रिक्त पदांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे. याबरोबरच येथील निवासस्थान, क्ष किरण विद्युत पुरवठा, आदी समस्यांबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे क्रमप्राप्त आहे. मुरगूड ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांमुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. चालढकलपणा करण्यामध्येच अधिकारी धन्यता मानत आहेत. आपणही रिक्त पदांबाबत वेळोवेळी चर्चा केली आहे. आश्वासन दिले आहे. पाहू कधी अधिकारी रूजू होतात. - रणजित सूर्यवंशी, सल्लागार समिती सदस्य, ग्रामीण रुग्णालय, मुरगूड