शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या सुविधांचा पर्यटकांना मन:स्ताप

By admin | Updated: May 23, 2015 00:42 IST

आंबा परिसर विकासासाठी निधी हवा : पर्यटन केंद्रासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज

आंबा : कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवरील आंबा हे निसर्गरम्य व थंड हवेचे पर्यटनस्थळ. जंगलातील गाव म्हणून शहरातील भांडवलदारांनी प्लॉटिंगच्या व्यवसायात येथे मोठी गुंतवणूक केली आहे. पर्यटक व प्लॉटधारकांच्या वाढत्या संख्येत येथे मूलभूत सुविधा अपु-या तर काही कुचकामी ठरल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून बीएसएनएल सुविधेचा येथे बोजवारा उडाला आहे. वीज गेली की रेंज गायब असे चित्र असल्याने पंचक्रोशीने खासगी कंपनीचे टॉवर उभे करण्याची मागणी केली आहे. तालुक्याचे शेवटचे टोक म्हणून वीजदाब नियमित नसल्याने वीजेची साधने जळण्याचे प्रकार घडतात. शिवाय पुरेशा विद्युत जनित्राअभावी ग्राहकांच्या मागणीनुसार वीज कनेक्शन मिळत नाही. लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्या आणि गंजलेले डांब ही दुरवस्था कोण सुधारणार हा प्रश्न आहे. मानोली, आंब्यासह दहा गावांना एकच वायरमन कार्यरत आहे. सार्वजनिक सुलभ शौचालयाअभावी विशाळगड भाविकांची मोठी कुचंबणा होते. बसस्थानक, विशाळगड फाटा परिसर गलिच्छ बनला आहे. सुलभ शौचालयाची, स्वच्छता व पाणपोईची येथे गरज आहे.आंबा-विशाळगडासह डोंगरातील चाळीस गावांसाठी आरोग्य उपकेंद्राची इमारत पूर्ण आहे. मात्र, इमारत गळती दुरूस्तीसह कर्मचारी निवासव्यवस्था, शवविच्छेदनगृह व शस्त्रक्रिया थिएटरची साधनसामग्री यासाठी निधी नाही. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यिका व सेविका आदी पदे दीड वर्षांपासून रिक्त आहेत. वाढते अपघात पाहता येथे आरोग्य सुविधा परिपूर्ण असाव्यात, असा आग्रह आहे. येथील पाणीपुरवठा योजना मानोली गावास सलग्न आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात हे पाणी अपुरे पडते. चार तास वीज खंडित झाली की टाकीत पुरेसे पाणी साठवता येत नाही. पाणी गळती व वाटपातील शिस्त दूर करून मानोलीसाठीची योजना पूर्ण करण्याची गरज आहे. चाळणवाडी व धनगरवाड्याला जोडणारा रस्ता चार दशकांपासून धुळखात आहे. प्राथमिक शाळेसह अंगणवाडीची नूतन इमारत गळत आहे. येत्या पावसाळ्यात मुले शाळेत बसविणे धोक्याचे आहे. दुरूस्ती न झाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे. ग्रामदैवत अंबेश्वर मंदिराची गळती दुरूस्ती लांबणीवर पडली आहे. गावातील रस्त्याचे बांधकाम दर्जेदार नसल्याची तक्रार तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी केली.पर्यटक व भाविकांच्या सुविधांसाठी व येथील निसर्ग रक्षणासाठी प्रस्तावित पर्यटन आराखडा मंजूर झाल्यास येथील प्रेक्षणीय ठिकाणांच्या विकासाबरोबर रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन, खेळ व मनोरंजनाच्या साधनांची उपलब्धता होईल. पावनखिंड, विशाळगड पाठोपाठ आंबा, मानोली, केर्ले, तळवडे या परिसरातील निसर्ग ठिकाणांच्या विकासाला निधी उपलब्ध करावा, अशी मागणी आहे.