शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारकडून शेतकरी व उद्योजकांची चेष्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:27 IST

इचलकरंजी : महापुरानंतर राज्य सरकारने जाहीर केलेली नुकसानभरपाई तुटपुंजी आहे. शेतकरी, उद्योजक व व्यापाऱ्यांची सरकारने चेष्टा केली असून, पूरग्रस्तांसाठी ...

इचलकरंजी : महापुरानंतर राज्य सरकारने जाहीर केलेली नुकसानभरपाई तुटपुंजी आहे. शेतकरी, उद्योजक व व्यापाऱ्यांची सरकारने चेष्टा केली असून, पूरग्रस्तांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एल्गार पुकारला आहे. त्यासाठी २३ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

येथील स्वाभिमानी शेतकरी संघटना व सामाजिक विकास सेवा संस्थेच्या वतीने आयोजित तीन दिवसांचे मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

शेट्टी म्हणाले, महापुराला अनेक कारणे आहेत. नद्यांना बांधलेले पूल, रस्त्यासाठी टाकलेले भराव, अलमट्टी धरणापर्यंतचा डहाळ, नद्यांची पाणी धारण क्षमता कारणीभूत आहे. १०३ पुलांवर कमानी बांधून पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवावे. राज्य शासनाने कर्नाटक सरकारशी समन्वय साधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.

संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन दबडे यांनी स्वागत व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष रामदास कोळी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, अरुण पाटील, दत्ता माने, सदा मलाबादे, संजय बेडक्याळे, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अण्णासाहेब शहापुरे यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी अभिषेक पाटील, सतीश मगदूम, हेमंत वणकुंद्रे, निवृत्ती शिरगुरे, विकास चौगुले, आदी परिश्रम घेत आहेत.

फोटो ओळी

१८०८२०२१-आयसीएच-०१

इचलकरंजीत पूरग्रस्तांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, रवी रजपुते, दत्ता माने, राजू आलासे, आदी उपस्थित होते.