शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारकडून शेतकरी व उद्योजकांची चेष्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:27 IST

इचलकरंजी : महापुरानंतर राज्य सरकारने जाहीर केलेली नुकसानभरपाई तुटपुंजी आहे. शेतकरी, उद्योजक व व्यापाऱ्यांची सरकारने चेष्टा केली असून, पूरग्रस्तांसाठी ...

इचलकरंजी : महापुरानंतर राज्य सरकारने जाहीर केलेली नुकसानभरपाई तुटपुंजी आहे. शेतकरी, उद्योजक व व्यापाऱ्यांची सरकारने चेष्टा केली असून, पूरग्रस्तांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एल्गार पुकारला आहे. त्यासाठी २३ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

येथील स्वाभिमानी शेतकरी संघटना व सामाजिक विकास सेवा संस्थेच्या वतीने आयोजित तीन दिवसांचे मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

शेट्टी म्हणाले, महापुराला अनेक कारणे आहेत. नद्यांना बांधलेले पूल, रस्त्यासाठी टाकलेले भराव, अलमट्टी धरणापर्यंतचा डहाळ, नद्यांची पाणी धारण क्षमता कारणीभूत आहे. १०३ पुलांवर कमानी बांधून पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवावे. राज्य शासनाने कर्नाटक सरकारशी समन्वय साधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.

संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन दबडे यांनी स्वागत व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष रामदास कोळी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, अरुण पाटील, दत्ता माने, सदा मलाबादे, संजय बेडक्याळे, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अण्णासाहेब शहापुरे यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी अभिषेक पाटील, सतीश मगदूम, हेमंत वणकुंद्रे, निवृत्ती शिरगुरे, विकास चौगुले, आदी परिश्रम घेत आहेत.

फोटो ओळी

१८०८२०२१-आयसीएच-०१

इचलकरंजीत पूरग्रस्तांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, रवी रजपुते, दत्ता माने, राजू आलासे, आदी उपस्थित होते.