उपाध्यक्ष आनंदा घंटे यांनी स्वागत केले.
आजरा साखर सुरू होणे गरजेचे आहे तर आंबेओहोळ, उचंगी, सर्फनाला प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनही झाले पाहिजे. यासाठी मंत्रालय पातळीवर प्रयत्न केले जातील, असेही जयराज लांडगे यांनी सांगितले. ‘गाव तेथे शाखा व घर तिथे मनसैनिक’ असलेच पाहिजेत. पक्षवाढीसाठी सर्वांनी चांगले काम करूया असे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी सांगितले. चुकीच्या मार्गाने जोरात धावण्यापेक्षा सरळ मार्गाने कासवाच्या गतीने गेल्यास पक्षबांधणी मजबूत होईल, असे जनहित कक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष परशुराम बामणे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रताप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
महिला आघाडी तालुकाध्यक्ष सरिता सावंत, परशुराम बामणे यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीला विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे, आजरा तालुकाध्यक्ष अनिल नेऊंगरे, चंदगड तालुकाध्यक्ष राज सुभेदार, राधानगरी तालुकाध्यक्ष राजू चव्हाण, भुदरगड तालुकाध्यक्ष विक्रम आरडे, कागल तालुकाध्यक्ष संजय पाटील यासह आजऱ्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
चंद्रकांत सांबरेकर यांनी आभार मानले.
---------------------
फोटो ओळी : आजऱ्यातील मेळाव्यात बोलताना जयराज लांडगे. शेजारी नागेश चौगुले, अनिल नेऊंगरे, परशुराम बामणे आदी उपस्थित होते.
क्रमांक : २९०३२०२१-गड-०२