शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मिशन आजरा-०२ : कारखाना चालवायला देण्याचा पहिला प्रयोग ‘आजरा’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:26 IST

विश्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर खासगी कारखान्यास चालवायला देण्याचा महाराष्ट्रातील आणि किंबहुना देशातील पहिला ...

विश्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर खासगी कारखान्यास चालवायला देण्याचा महाराष्ट्रातील आणि किंबहुना देशातील पहिला प्रयोग आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यामध्ये राबविण्यात आला. कारण हे बाळ जन्मापासूनच आजारी होते. त्यावेळी सुरू झालेला अडचणींचा ससेमिरा अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे काही कठोर निर्बंध घालून घेतल्याशिवाय त्यातून कारखाना बाहेर येऊ शकत नाही.

लोकनियुक्त संचालक मंडळाने हा कारखाना १९९७-९८ ते २००३-०४ पर्यंत चालवला. त्यातही कारखान्याचे संस्थापक वसंतराव देसाई यांच्याकडे कारखान्याची सूत्रे २००१ पर्यंत राहिली. त्यानंतर जयवंतराव शिंपी यांच्याकडे नेतृत्व आले. सलग दोन वर्षे कमी झालेला पाऊस, लोकरी मा‌व्यामुळे ऊसाचे नुकसान यामुळे गाळप कमी झाले. गाळप कमी झाले तरी संचालक मंडळाचे खर्च कमी झाले नाहीत, परिणामी कारखाना आर्थिक अडचणीत सापडला म्हणून निविदा मागवून तो पहिल्यांदा २००४-०५ च्या हंगामात विद्या मुरकुंबी यांच्या मालकीच्या रेणुका शुगर्सला भाडेतत्त्वावर देण्यात आला. कारखान्याच्या स्थापनेनंतर पहिल्या गळीत हंगामानंतर पाच वर्षांतच तो भाड्याने चालवायला द्यावा लागलेला हा महाराष्ट्रातील बहुधा पहिलाच कारखाना असावा. त्याची अनेक राजकीय, व्यवस्थापकीय कारणे असली तरी पुरेसे गाळप झाले नाही हे सर्वांत महत्वाचे कारण राहिले.

पाचव्या पंचवार्षिक योजनेतंर्गत या कारखान्यास १० जुलै १९८९ ला केंद्र सरकारचे इरादा पत्र मिळाले. त्यावेळी कारखान्याचे नावही आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना आंबोली, ता. सावंतवाडी असे होते. मुख्यत: आजरा, सावंतवाडी व कुडाळ तालुक्यातील शेतकरी डोळ्यांसमोर ठेवून कारखान्याची स्थापना झाली. कारखान्याच्या मंजुरीपासून सर्वासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मोेठे पाठबळ लाभले. कोकणच्या सीमेवरील दोन तालुके व कोल्हापूर जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेला आजरा तालुका अशी सांगड घातली गेली. या तिन्ही तालुक्यांत विकासाचा एकही प्रकल्प नव्हता. या तालुक्यातील तरुणांना हॉटेलमध्ये वेटरची कामे करण्याशिवाय रोजगारीचे दुसरे साधन नव्हते. म्हणून त्यांच्या भविष्याचा विचार करून या कारखान्याची उभारणी झाली. एक साखर कारखाना चांगला उभा राहिला तर त्या परिसराचे नंदनवन करू शकतो, असाही अनुभव त्यामागे होता. परंतू प्रत्यक्षात घडले नाही. दिवंगत नेते वसंतराव देसाई यांच्या पुढाकाराने कारखान्याची उभारणी झाली. त्यांच्यासह त्यावेळी त्यांच्यासोबत या उभारणीत असलेले नेते ही ध्येयवेडी माणसे होती परंतु मुळातच जन्मापासूनच कारखान्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. सुरुवातीला कारखान्यासाठी गेळे (ता. सावंतवाडी), गवसे व देवर्डे (ता.आजरा) या जागांची पाहणी करण्यात आली. तत्कालीन साखर आयुक्त विश्वासराव धुमाळ यांच्या तज्ज्ञ समितीने गवसे येथील जागेची निवड केली. त्यामुळे कारखान्याचे नाव ७ जानेवारी १९९४ ला बदलून आजरा कारखाना गवसे (ता. आजरा) असे झाले. कारखान्याचा पहिला गळीत हंगाम १० नोव्हेंबर १९९७ ला शरद पवार यांच्या हस्तेच सुरू झाला.

दोन प्रयोग असेही..

रेणूका शुगर्सने पाच वर्षे कारखाना चालवला तरी लोकनियुक्त संचालक मंडळ कार्यरत होते. त्यांच्यासाठी दरमहा सगळ्या गोष्टींची व्यवस्थित पूर्तता केली जात होती. रेणुकानंतर २००९-१० व २०१०-११ ही दोन ‌वर्षे हा कारखाना वारणा समूहाने चालवला. रेणुकाने कारखाना सोडला तेव्हा कारखान्यांवर फक्त ५ कोटींचे कर्ज होते.

जिल्हा बँकेने आजरा कारखान्याला पूर्वहंगामी कर्ज दोन वर्षांपूर्वीच दिले असते तर कारखान्यावर व्याजाचा भुर्दंड वाढला नसता. कारखाना बंद ठेवून जिल्हा बँकेचे कर्ज कसे फिटणार, याचा विचार झाला नाही. कारखान्याच्या अधोगतीला स्थानिक राजकारणाबरोबर जिल्हा बँकेचे आजरा कारखान्याबाबतचे धोरणही कारणीभूत आहे.

राजाराम पोतनीस

सातेवाडी, ता. आजरा व राज्य कार्यकारिणी सदस्य

सरपंच परिषद मुंबई

फोटो- २४०५२०२१-कोल-राजाराम पोतनीस-आजरा

येत्या हंगामात आजरा कारखाना सुरू झालाच पाहिजे. कारखान्याच्या नावावर गरिबांचे कैवारी, उगवते नेतृत्व उपाधी मिळवलेल्या नेत्यांनी आता भानावर यावे. ऊस उत्पादक शेतकरी, कामगारऱ्यांचे उद्‌ध्वस्त होणारे संसार थांबवावेत आणि कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा.

अनिल देसाई

सामाजिक कार्यकर्ते

नेसरी (ता.गडहिंग्लज)

फोटो : २४०५२०२१-कोल-अनिल देसाई-आजरा

सिंगल फोटो : २४०५२०२१-कोल-वसंतराव देसाई-आजरा :

वसंतराव देसाई,

आजरा कारखान्याचे संस्थापक