शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

फसवणुकीमुळे ऊस वाहतूकदार वाहनमालकांची कुचंबणा

By admin | Updated: May 12, 2015 23:42 IST

बुडव्यांना माफी, बुडणाऱ्यांना शिक्षा : शासन उदासीन, तर साखर कारखाने झटकतात हात, कायदेशीर संरक्षण नसल्याने अडचणी

प्रकाश पाटील कोपार्डे -जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर वाहनमालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक मुकादमांकडून झाल्यानंतर फसवणूक झालेल्या वाहनमालकांनी जाब विचारल्यास त्यांच्यावर पोलिसी गुन्हे दाखल झाले आहेत. न्यायालयात खटले दाखल केले, तर हे खटले संबंधित फसवणूक करणारा मुकादमच उपस्थित राहत नसल्याने वर्षानुवर्षे प्रलंबित असून, काही ऊस वाहतूकदार वाहनमालकांनी आपली जीवनयात्राच संपविली असल्याचे सत्य समोर आले आहे. ‘बुडव्यांना माफी, तर बुडणाऱ्यांना शिक्षा’, असा उफराटा न्याय मिळत असल्याची प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष गणपती देसाई यांनी व्यक्त केली.कोल्हापूर जिल्ह्यात असणाऱ्या साखर कारखान्यांना ऊसपुरवठा करणारी एक यंत्रणा आहे. यात शेतकऱ्यांच्या शेतातील ऊसतोडणी व तो कारखान्यांपर्यंत वाहतूक करणे यासाठी साखर कारखाने वाहनमालकांबरोबर ऊसतोड व वाहतुकीचा करार करतात. त्यासाठी ठराविक रक्कम कारखाने अ‍ॅडव्हान्स म्हणून चार जामीन घेऊन देतात. हे वाहनमालक ऊसतोड मजुरांचा पुरवठादार मुकादमाला प्रति कोयता अ‍ॅडव्हान्स देतात. यात प्रति कोयता (एक पुरुष व स्त्री अशी जोडी) ७० ते ८० हजार उचल मागितली जाते. एका ट्रक अथवा ट्रॅक्टरसाठी किमान सात ते आठ लाख रुपये बिगर हंगामात उचल मागितली जाते. मजुरांच्या कमतरतेमुळे वाहनमालक ती देतात. बिगर हंगामातील या रकमेचे व्याज वाहनमालकच सोसतो. हंगाम सुरू होताना मात्र अलीकडे अनेक मुकादमांकडून मजूर देण्यात गुंगारा तर दिलाच जातो; पण सात ते आठ लाख रुपयेही बुडविले जात आहेत. जिल्ह्यात हंगाम २०१४/१५ मध्ये अशी ऊसवाहतूक वाहनमालकांची २५ कोटींच्यावर फसवणूक झाल्याचे सत्य समोर आले आहे. तक्रारी करूनही या बुडव्या मुकादमांवर आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. याउलट या बुडव्या मुकादमांना शोधून फसवणूक झालेल्या वाहनमालकांनी जाब विचारल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे फसवणूक झाल्याने कर्जबाजारी झालेल्या जिल्ह्यातील आजपर्यंत आत्महत्या केलेल्या वाहनमालकांची संख्या आठ ते दहांवर पोहोचली आहे. जिल्ह्यात ऊसतोडीसाठी येणारे बहुतांश मजूर हे बीड, उस्मानाबाद, अकोला, पंढरपूर या भागातून येतात. अलीकडे या ऊसतोड मजूर पुरवठ्यासाठी वाहनमालकांकडून अ‍ॅडव्हान्स उचलून पसार होणाऱ्या मुकादमांची संख्या वाढत आहे. या फसवणूक झालेल्या वाहनमालकांना कोणतेच कायदेशीर संरक्षण नसल्याने त्यांची कुचंबणा झाली आहे.माझीच ऊसतोड मजूर मुकादमाकडून दहा लाखांची फसवणूक झाली आहे. मी न्यायालयात दाद मागितली आहे. गेली चार ते पाच वर्षे हा खटला गारगोटी न्यायालयात आहे. हा मुकादम न्यायालयात एकाही तारखेला हजर नाही. अलीकडे एका वाहनमालकाला बुडव्या मुकादमाला जाब विचारल्याबद्दल कोठडीची हवा खावी लागली आहे. ऊस वाहतूक करणारे सर्व वाहनमालक हे फक्त शेतकरी आहेत. यात एकही उद्योगपती नाही.- गणपती देसाई, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र ऊस वाहतूकदार ट्रक, ट्रॅक्टरमालक.