शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

फसवणुकीमुळे ऊस वाहतूकदार वाहनमालकांची कुचंबणा

By admin | Updated: May 12, 2015 23:42 IST

बुडव्यांना माफी, बुडणाऱ्यांना शिक्षा : शासन उदासीन, तर साखर कारखाने झटकतात हात, कायदेशीर संरक्षण नसल्याने अडचणी

प्रकाश पाटील कोपार्डे -जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर वाहनमालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक मुकादमांकडून झाल्यानंतर फसवणूक झालेल्या वाहनमालकांनी जाब विचारल्यास त्यांच्यावर पोलिसी गुन्हे दाखल झाले आहेत. न्यायालयात खटले दाखल केले, तर हे खटले संबंधित फसवणूक करणारा मुकादमच उपस्थित राहत नसल्याने वर्षानुवर्षे प्रलंबित असून, काही ऊस वाहतूकदार वाहनमालकांनी आपली जीवनयात्राच संपविली असल्याचे सत्य समोर आले आहे. ‘बुडव्यांना माफी, तर बुडणाऱ्यांना शिक्षा’, असा उफराटा न्याय मिळत असल्याची प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष गणपती देसाई यांनी व्यक्त केली.कोल्हापूर जिल्ह्यात असणाऱ्या साखर कारखान्यांना ऊसपुरवठा करणारी एक यंत्रणा आहे. यात शेतकऱ्यांच्या शेतातील ऊसतोडणी व तो कारखान्यांपर्यंत वाहतूक करणे यासाठी साखर कारखाने वाहनमालकांबरोबर ऊसतोड व वाहतुकीचा करार करतात. त्यासाठी ठराविक रक्कम कारखाने अ‍ॅडव्हान्स म्हणून चार जामीन घेऊन देतात. हे वाहनमालक ऊसतोड मजुरांचा पुरवठादार मुकादमाला प्रति कोयता अ‍ॅडव्हान्स देतात. यात प्रति कोयता (एक पुरुष व स्त्री अशी जोडी) ७० ते ८० हजार उचल मागितली जाते. एका ट्रक अथवा ट्रॅक्टरसाठी किमान सात ते आठ लाख रुपये बिगर हंगामात उचल मागितली जाते. मजुरांच्या कमतरतेमुळे वाहनमालक ती देतात. बिगर हंगामातील या रकमेचे व्याज वाहनमालकच सोसतो. हंगाम सुरू होताना मात्र अलीकडे अनेक मुकादमांकडून मजूर देण्यात गुंगारा तर दिलाच जातो; पण सात ते आठ लाख रुपयेही बुडविले जात आहेत. जिल्ह्यात हंगाम २०१४/१५ मध्ये अशी ऊसवाहतूक वाहनमालकांची २५ कोटींच्यावर फसवणूक झाल्याचे सत्य समोर आले आहे. तक्रारी करूनही या बुडव्या मुकादमांवर आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. याउलट या बुडव्या मुकादमांना शोधून फसवणूक झालेल्या वाहनमालकांनी जाब विचारल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे फसवणूक झाल्याने कर्जबाजारी झालेल्या जिल्ह्यातील आजपर्यंत आत्महत्या केलेल्या वाहनमालकांची संख्या आठ ते दहांवर पोहोचली आहे. जिल्ह्यात ऊसतोडीसाठी येणारे बहुतांश मजूर हे बीड, उस्मानाबाद, अकोला, पंढरपूर या भागातून येतात. अलीकडे या ऊसतोड मजूर पुरवठ्यासाठी वाहनमालकांकडून अ‍ॅडव्हान्स उचलून पसार होणाऱ्या मुकादमांची संख्या वाढत आहे. या फसवणूक झालेल्या वाहनमालकांना कोणतेच कायदेशीर संरक्षण नसल्याने त्यांची कुचंबणा झाली आहे.माझीच ऊसतोड मजूर मुकादमाकडून दहा लाखांची फसवणूक झाली आहे. मी न्यायालयात दाद मागितली आहे. गेली चार ते पाच वर्षे हा खटला गारगोटी न्यायालयात आहे. हा मुकादम न्यायालयात एकाही तारखेला हजर नाही. अलीकडे एका वाहनमालकाला बुडव्या मुकादमाला जाब विचारल्याबद्दल कोठडीची हवा खावी लागली आहे. ऊस वाहतूक करणारे सर्व वाहनमालक हे फक्त शेतकरी आहेत. यात एकही उद्योगपती नाही.- गणपती देसाई, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र ऊस वाहतूकदार ट्रक, ट्रॅक्टरमालक.