शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

लाख लिटर दूध संकलन ठप्प

By admin | Updated: June 3, 2017 00:57 IST

लाख लिटर दूध संकलन ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा थेट फटका जिल्ह्यातील दूध संघांना बसला आहे. ‘गोकुळ’, ‘वारणा’सह ‘स्वाभिमानी’ दूध संघाच्या रोजच्या संकलनात तब्बल एक लाख लिटरहून अधिक घट झाली आहे. भाजीपाल्याच्या दरात कमालीची वाढ झाली असून बाजार समितीमध्ये शुक्रवारी केवळ तीन ट्रक कांदा व तेवढीच बटाट्याची आवक झाल्याने शनिवारपासून या मार्केटबरोबरच भाजीपाला मार्केट कोलमडणार हे निश्चित आहे. शेतकऱ्यांचा सात/बारा कोरा करा, शेतीमालाला हमीभाव द्या, यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी गुरुवारपासून संपावर गेले आहेत शेतीमाल बाजारात घेऊन आणायचा नाही, त्याचबरोबर पुणे, मुंबईला जाणारे दूध वाहतूक रोखण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतल्याने राज्यांत अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. कोल्हापुरात हिंसक आंदोलन नसले तरी शेतकऱ्यांनी स्वत:हून भाजीपाला मार्केटला पाठविणे बंद केले आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील फळे व भाजीपाला मार्केटला शुक्रवारी सुटी होती. त्यामुळे भाज्यांची आवक होण्याचा प्रश्नच नव्हता. शनिवारी मार्केट चालू राहणार असले तरी ५ टक्केही भाज्यांची आवक होईल का? याबाबत खरेदीदारांबरोबरच बाजार समिती प्रशासन संदिग्ध आहे. समितीमध्ये रोज निपाणी, शिरोळ, सांगली, विजापूर येथून १५०० ते २ हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक होते; पण आज १०० ते १५० क्विंटल आवकही होण्याची शक्यता कमी आहे. बाजार समितीमध्ये रोज ३५ ते ४० ट्रक कांदा-बटाट्याच्या गाड्यांची आवक होते पण शुक्रवारी केवळ तीन ट्रक कांदा व तेवढाच बटाट्याची आवक झाल्याने येथून पुढे कांदा-बटाटा मार्केटवर त्याचा परिणाम होणार आहे. भाजीपाल्याप्रमाणेच दूध खरेदी व विक्रीवर संपाचा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी स्वत:हून संघास दूध पाठविण्यास बंद केल्याने जिल्ह्णातील प्रमुख दूध संघाच्या संकलनात लाख लिटरपेक्षा अधिक घट झाली आहे.‘गोकुळ’चे रोज सरासरी दहा लाख लिटर संकलन होते; पण शुक्रवारी ३५ ते ४० हजार लिटर दूध संकलनात घट झाली आहे. सर्वाधिक फटका चंदगड तालुक्यात बसला आहे. पोलीस बंदोबस्तात मुंबई, पुणे येथे दूध वाहतूक सुरू असल्याने विक्रीवर फारसा परिणाम झालेला नाही. वारणा दूध संघाच्या संकलनात शुक्रवारी २५ हजार लिटरची घट झाली आहे. कार्यक्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात शेतकऱ्यांनी दूध घालणे बंद केले आहे पण पुणे येथे दूध वाहतुकीस अडचण आल्याने सुमारे १५ हजार लिटर दूध विक्रीचा फटका बसला आहे. ‘स्वाभिमानी’ दूध संघाचे सलग दुसऱ्या दिवशी संकलन बंद राहिले आहे. रोज ६५ हजार लिटर दूध संकलन बंद असल्याने विक्री पूर्णपणे थंडावली आहे. ‘स्वाभिमानी’चे रोज १२ हजार लिटर दूध मुंबई मार्केटला जाते; पण गेले दोन दिवस एक थेंबही बाजारात पोहोचलेले नाही. संपाच्या दुसऱ्या दिवशी बाजारपेठेवर हळूहळू परिणाम दिसू लागले असून संप आणखी वाढला तर संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडणार आहे. पै-पाहुणे, शेजाऱ्यांना दुधाचे वाटपशेतकऱ्यांनी संघास दूध घालणे बंद केल्याने हे दूध पै-पाहुणे, शेजाऱ्यांना वाटप केले जात आहे. हातकणंगले व शिरोळ तालुक्यात हे चित्र पाहावयास मिळत आहे. सांगरूळमध्ये संकलन आज बंदशेतकरी संपास पाठिंबा म्हणून सांगरूळ (ता. करवीर) येथील सहा दूध संस्थांनी आज, शनिवारी दूध संकलन न करण्याचा निर्णय उस्फूर्तपणे घेतला आहे. या गावांतील दोन वेळांचे तब्बल साडेसहा हजार लिटर दूध गोकुळ दूध संघाकडे जाते. गावात शुक्रवारी हरहर महादेव, दत्त, खंडोबा, महालक्ष्मी महिला, ज्योतिर्लिंग आणि विश्वास नारायण पाटील सहकारी दूध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली व त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. असा सामूहिक निर्णय घेऊन लढ्यास पाठबळ देणारे सांगरूळ हे जिल्ह्णातील पहिले गाव ठरले आहे.—————————————‘गोकुळ’ने दूध बंद ठेवून पाठिंबा द्यावा : गावडेराज्यात सध्या सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपास सगळीकडून उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ (गोकुळ) हा शेतकऱ्यांचा संघ आहे. त्यामुळे संघाने एक दिवस प्रातिनिधिक स्वरूपात मुंबईला दूधपुरवठा बंद करून या संपास पाठिंबा द्यावा, अशी मागणी कम्युनिस्ट पक्षाचे नेते नामदेव गावडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.