शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

करवीर तालुक्यातील सात हजार कुटुंबांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:16 IST

वाहतूक, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा विस्कळीत लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : करवीर तालुक्यात गेल्या २४ तासांत झालेल्या उच्चांकी पावसाने ८० ...

वाहतूक, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपार्डे : करवीर तालुक्यात गेल्या २४ तासांत झालेल्या उच्चांकी पावसाने ८० गावे प्रभावित झाली आहेत. अनेक गावांतील नागरी वस्तीत महापुराचे पाणी शिरल्याने जवळपास सात हजार कुटुंबांना स्थलांतरित करावे लागले आहे. महापुराने रस्ते वाहतूक, वीज, पिण्याचे पाणी प्रभावित झाले आहे.

करवीर तालुक्यांत गेल्या २४ तासांत ३३१ मिलिमीटर उच्चांकी पावसाची नोंद झाला आहे. सरासरी पावसाच्या आकडेवारीतही २०२० च्या तुलनेत यावर्षी आजअखेर ५५७ मिलिमीटर जास्त पाऊस झाल्याने मुसळधार पावसाची तीव्रता समोर येत आहे.

करवीरच्या पश्चिमेला असणाऱ्या ३० गावांचा संपूर्ण संपर्क तुटला आहे. अनेक गावांतील नागरी वस्तीत पाणी शिरले आहे. जवळपास ८० गावांतील पाच हजारांवर कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली आहेत. चिखली आंबेवाडी, शिंगणापूर, नागदेववाडी, हणमंतवाडी, वरणगे, पाडळी गावात गंभीर परिस्थिती आहे. सहा-सात गावांतील दोन अडीच हजार कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.

करवीर तालुक्यातील कोल्हापूर - गगनबावडा, कोल्हापूर -रत्नागिरी, कोल्हापूर - राधानगरी या महामार्गासह वहातुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व महत्त्वाच्या मार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

चौकट १) दूध उत्पादकांना मोठा फटका - करवीर तालुक्यातून गोकुळ व इतर दूधसंघांना साडेचार लाख लिटर दूध पुरवठा केला जातो. पण आज सर्वच मार्गावर पाणी आल्याने वहातूक बंद झाल्याने दूध संकलन बंद झाले आहे. यामुळे दूध उत्पादकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे. याशिवाय नदीकाठच्या ऊस पिकाचे महापुरामुळे मोठे नुकसान होणार आहे

फोटो 1) वाकरे (ता. करवीर) येथे नागरी वस्तीत पाणी शिरले 2) पुरामुळे जनावरांसह स्थलांतरित होताना चिखली येथील ग्रामस्थ.