शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

वित्त आयोगाच्या २१ कोटींच्या निधीकडे सदस्यांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:29 IST

कोल्हापूर : जिल्हा परिषद सदस्यांचे लक्ष आता पंधराव्या वित्त आयोगाच्या २१ कोटी रुपयांच्या वितरणाकडे लागले आहे. शुक्रवारी ग्रामविकासमंत्री हसन ...

कोल्हापूर : जिल्हा परिषद सदस्यांचे लक्ष आता पंधराव्या वित्त आयोगाच्या २१ कोटी रुपयांच्या वितरणाकडे लागले आहे. शुक्रवारी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांना याद्या दाखवून त्याला अंतिम स्वरूप दिले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतरच सदस्यांना किती लाखांची कामे सुचवायची याचे निरोप दिले जातील. २४ ऑगस्ट रोजी सर्वसाधारण सभा असल्याने त्याआधी हा विषय संपविणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सध्या अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी आणि अन्य पदाधिकारी आणि समन्वयक हे याच याद्यांवर शेवटचा हात फिरविण्याच्या कामात आहेत. गेल्या वर्षी याच निधी वाटपावरून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी निधीमध्ये मनमानी केल्याचा आरोप करीत माजी महिला आणि बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम या उच्च न्यायालयात गेल्या होत्या. यावर न्यायालयाने शासकीय नियमानुसार वितरण होईपर्यंत निधी वाटपावर बंदी आणली होती.

ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांच्याच जिल्ह्यातून वित्त आयोगाच्या निधीबाबत याचिका दाखल झाल्याने मुश्रीफदेखील नाराज झाले होते. अखेर मगदूम आणि इतर विरोधी सदस्यांशी चर्चा करून ही याचिका मागे घेतल्यानंतर निधी वितरणाचा मार्ग मोकळा झाला होता. यानंतर आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे विरोधी सदस्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. अशातच मुश्रीफ यांचीही भूमिका विरोधकांना सोबत घेऊन त्यांनाही चांगला निधी देण्याची आहे. विरोधी सदस्य म्हणजे बाहेरचे नसून जिल्ह्यातीलच कोणत्या तरी गावात हा निधी खर्च होणार असल्याने सत्तारूढ आणि विरोधक असा फार भेदभाव ठेवू नका अशा सूचना त्यांनी जाहीर भाषणातून केल्या आहेत. आता त्या वास्तवात येतात का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

जिल्हा परिषद सदस्यांचे या सभागृहातील शेवटचे चार महिने शिल्लक आहेत. यामध्ये विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. त्यामुळेच निधी वाटप लवकर करून कामे लवकर मार्गी लावण्याची गरज व्यक्त होत आहे.

चौकट

सत्तारूढ सदस्यांमध्ये दोन गटजिल्हा परिषदेचे अध्यक्ष समन्वयातून निधी वाटपाची प्रक्रिया पार पाडण्याच्या प्रयत्नात आहेत; परंतु काही समन्वयक म्हणजे महिला सदस्यांचे पती हे विरोधकांना कमीत कमी निधी देण्याच्या विचाराचे आहेत. त्यांना पुन्हा न्यायालयात जायला लावू नका, असा इशारा भाजपचे सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी दिला आहे. त्यामुळे या निधी वाटपाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.