शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

ऊसतोडणी दराबाबत बुधवारी होणार बैठक

By admin | Updated: November 17, 2014 00:36 IST

सकारात्मक चर्चा झाली तर ठीक, अन्यथा कोयता बंद

कोल्हापूर : राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक दराबाबत राज्य शासन व ऊस तोडणी-वाहतूक संघटना यांच्यात बुधवारी (दि. १९) महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत तोडणी व वाहतूक दरासह इतर मागण्यांबाबत चर्चा होणार असून, सकारात्मक चर्चा झाली, तर ठीक अन्यथा २५ नोव्हेंबरपासून ‘कोयता बंद’ करण्याची तयारी संघटनेने केली आहे. ऊस तोडणी व वाहतूक दराबाबत तीन वर्षांपूर्वी करार झालेला आहे. त्याची मुदत संपल्याने गेल्या सहा महिन्यांपासून ऊसतोडणी व वाहतूक संघटनेच्यावतीने शासन दरबारी प्रयत्न सुरू केले होते. आघाडी सरकारने यासंबंधी दोन बैठका घेऊन चर्चा सुरू केली होती; पण तोपर्यंत राज्यात सरकार बदलल्याने पुन्हा हा प्रश्न भिजत राहिला आहे. नवीन सरकार आल्यानंतर ऊसतोडणी व वाहतूकदारांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी संघटनेच्या प्रतिनिधींनी चर्चा केली. सरकारवरील अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर चर्चा करण्याचे आश्वासन सरकारच्यावतीने देण्यात आले. २४ नोव्हेंबरपर्यंत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली नाही, तर २५ नोव्हेंबरपासून कोेयता बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. बुधवारी बैठकीचे आयोजन केले आहे. यामध्ये ऊसतोडणी व वाहतूक दर, ऊसतोडणी मजुरांचे कल्याणकारी मंडळ, अपघात विमा, आदी प्रश्नांवर चर्चा होणार आहे. बैठकीचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. सरकारने बुधवारी यासंबंधी बैठक बोलविल्याचे समजते. यामध्ये सकारात्मक चर्चा होईल, अशी आशा आहे. मागण्या मान्य नाही झाल्या, तर नाईलास्तव पुन्हा आंदोलन करावे लागेल. - डॉ. सुभाष जाधव (सरचिटणीस, राज्य ऊसतोडणी व वाहतूक संघटना)