शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पोलीस अधीक्षक कार्यालयात आज व्यापाऱ्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:18 IST

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात लॉकडाऊन कायम ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला, तर आक्रमक झालेल्या व्यापाऱ्यांनी सर्वच दुकाने ...

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात लॉकडाऊन कायम ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला, तर आक्रमक झालेल्या व्यापाऱ्यांनी सर्वच दुकाने उघडणार असल्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू नये यासाठी चर्चा करण्यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शहरातील सर्वच व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. सकाळी १०.३० वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात ही बैठक होत आहे.

गेले अडीच महिने जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवसाय बंद राहिले. त्यामुळे सर्वच उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी मेटाकुटीला आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील आदेश येईपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आक्रमक झालेले उद्योजक, व्यापारी, व्यावसायिकांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या नेतृत्वाखाली आज, सोमवारपासून सरसकट दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला. पण शासनाचे निर्बंध पाळणे बंधनकारक आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांनी संयमाची भूमिका घेऊन सहकार्य करावे, त्यासाठी आज, सोमवारी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्ससह सर्वच व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी बोलावली आहे.