शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

ऊसदराबाबत उद्या साखर संकुलात बैठक

By admin | Updated: November 18, 2015 00:13 IST

‘एफआरपी’चा प्रश्न : चंद्रकांतदादांची उपस्थिती

कोल्हापूर : यंदाच्या साखर हंगामातील एकरकमी ‘एफआरपी’बाबत निर्णय घेण्यासाठी उद्या, गुरुवारी साखर संकुलात सकाळी ११ वाजता महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. राज्य साखर संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व खासगी साखर कारखानदारांचे प्रतिनिधी यांना बैठकीस निमंत्रित करण्यात आले आहे. सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. राज्यातील साखर उद्योगाचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. यंदाच्या हंगामात एकरकमी ‘एफआरपी’वरून पेच निर्माण झाला आहे. साखरेचे बाजारातील दर आजच्या घडीला २४५० पर्यंत आहेत व त्यामुळे बॅँकांची उचल पाहता एकरकमी पैसे देणे अशक्य असल्याची भूमिका कारखानदारांनी घेतल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. एफआरपी एकरकमीच मिळायला हवी, अशी संघटनेची भूमिका आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस परिषदेत तशी मागणी करून राज्य सरकारला महिन्याची समयसीमा दिली आहे. तोपर्यंत सरकारने यात तोडगा न काढल्यास सुरू असलेले कारखाने बंद पाडण्याचा इशारा ‘स्वाभिमानी’ने दिला आहे. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार राजू शेट्टी यांना हा प्रश्न चर्चेतून सामोपचाराने सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनीच सूचना केल्यानुसार चर्चा करण्यासाठी ही पहिली बैठक होत आहे. या बैठकीला कारखानदारांचे प्रतिनिधी म्हणून राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे व उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, पश्चिम भारत खासगी साखर कारखाना असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, उपाध्यक्ष रोहित पवार व शेतकरी संघटनांचे नेते खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील यांना चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. साखर आयुक्त विपीन शर्मा बैठकीस उपस्थित असतील. (प्रतिनिधी)एकरकमी एफआरपी साखर कारखानदारीस आता नव्याने काही पॅकेज देण्याच्या मन:स्थितीत राज्य अथवा केंद्र सरकार नाही आणि या दोन्ही सरकारनी काहीतरी मदत केल्याशिवाय सद्य:स्थितीत एकरकमी एफआरपी देणेही अडचणीचे आहे. अशा स्थितीत सरकार या अडचणीतून काय मार्ग काढते, यावरच यंदाची ऊसबिले कशी मिळणार हे ठरणार आहे. त्यामुळे सरकारच्या निर्णयाकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यंदा ऊसदरासाठी साखर कारखाने बंद न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्यातील साखर उद्योगाने यंदा चांगलाच वेग घेतला आहे.