शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

बैलगाडी शर्यतीबाबत आज मंत्रालयात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:27 IST

कुरुंदवाड : राज्यातील बैलगाडी शर्यतीबाबत आज, मंगळवारी दुपारी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, पालकमंत्री सतेज पाटील, मंत्री जयंत पाटील ...

कुरुंदवाड : राज्यातील बैलगाडी शर्यतीबाबत आज, मंगळवारी दुपारी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, पालकमंत्री सतेज पाटील, मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई मंत्रालयात बैठक होत आहे. या बैठकीला बैलगाडी चालक-मालक असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे बैठकीत कोणता निर्णय होतो, शर्यती पुन्हा सुरू होणार का, याची उत्सुकता शर्यतशौकीनांना लागली आहे.

राज्यात बैलगाडी शर्यतीला खूप महत्त्व आहे.

ग्रामीण भागासह शहरी भागात शर्यतशौकीनांची संख्या मोठी आहे. शर्यतीला होणारी गर्दी, त्याला मिळालेले लोकोत्सव यामुळे राजकीय नेत्यांनाही आकर्षून घेतल्याने बैलगाडी शर्यतीचे आयोजन राजकीय नेतेमंडळी करत असल्याने पाच-दहा हजारांची बक्षिसाची रक्कम पाच लाखांवर गेली आहे. त्यामुळे बैलांच्या किमतीही पंधरा लाखांपर्यंत गेल्या होत्या.

ग्रामीण भागात यात्रा, जत्रा, उत्सवाची सांगता बैलगाडी शर्यतीनेच होत असते. मात्र, शर्यती जिंकण्याच्या आमिषाने बैलगाडी मालक-चालक बैलाला अमानुषपणे मारहाण, मोटारसायकलींचे करंट देऊन छळ करत असल्याने ॲनिमल संघटनेने (पेठा) न्यायालयात गेल्याने तसेच केंद्र सरकारने बैलांचे वर्गीकरण जंगली प्राण्यात केल्याने २०११ पासून राज्यातील बैलगाडी शर्यतीला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील यात्रा, जत्रेतील उत्साहच गेला आहे.

शर्यतीवरील बंदी उठवावी या मागणीसाठी राज्यातील विविध बैलगाडी चालक-मालक संघटना गेल्या दहा वर्षांपासून वेगवेगळी आंदोलने करीत आहेत. आंदोलनात राजकीय नेते, आमदार, खासदारही सहभागी होत असल्याने आंदोलनाचे राजकीय वजनही वाढले असून, शासनही सकारात्मक भूमिकेत आहे. या बैठकीला कोल्हापूर जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्र बैलगाडी असोसिएशन पदाधिकारी बाळासाहेब पाटील, तर सांगलीतून ॲड. विक्रम भोसले उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या निर्णयाकडे संपूर्ण राज्यातील बैलगाडी शर्यतशौकिनांचे लक्ष लागून राहिले आहे.

..............

कोणताही कायदा करत असताना समाजमन व वस्तुस्थितीचा विचार होणे गरजेचे आहे. ज्यामुळे कायद्याचे पालन होणे कठीण होईल. उदा. हेल्मेट सक्तीचा कायदा कितपत पाळला जातो. यावर कारवाई करणे शक्य होत नाही. तशीच परिस्थिती बैलगाडी शर्यतीबाबत होऊ शकते. त्यामुळे शासनाने ही गोष्ट गांभीर्याने घेऊन शर्यतीला परवानगी द्यावी.

- अनिल यादव, अध्यक्ष राजर्षी शाहू पश्चिम महाराष्ट्र बैलगाडी रेसिंग असोसिएशन

..........

कोट -

बैलगाडी शर्यतीवर न्यायालयाने बंदी घातली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान ठेवत शर्यतीत बैलांवर अत्याचार करणाऱ्यांबाबत कडक नियम करावेत. खिलारी गाय, बैल जातीची पैदास नष्ट होऊ नये, त्यावर उपजीविका चालविणाऱ्यांची उपासमार होऊ नये यासाठी राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आमचा आग्रह राहणार आहे.

- ॲड. विक्रम भोसले, पश्चिम महाराष्ट्र खिलार गाय बचाव समिती प्रमुख