कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत विचारविनिमय करण्यासाठी सकल मराठा शौर्यपीठतर्फे आज, सोमवारी बैठक आयोजित केल्याची माहिती समन्वयक प्रसाद जाधव यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण विधेयक रद्द केल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे.
विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगारांना याचा गंभीर परिणाम भोगायला लागणार आहे. राज्य व केंद्र सरकारने वेळीच लक्ष घालून घटनापीठाकडून शैक्षणिक व नोकरीमध्ये तत्काळ आरक्षण मिळवून देणेकरीता प्रयत्न करावा. तोपर्यंत नोकरभरती करू नये. होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलती द्याव्यात. या मागण्यांसाठी आज, सोमवारी पावणेबारा वाजता मराठा शौर्यपीठतर्फे बारा बलुतेदारांना सोबत घेऊन एल्गार पुकारण्यात येणार आहे. यासाठी आझाद गल्ली विठ्ठल मंदिर जामदार मंडप बिंदू चौक येथे बैठक आयोजित केली असून यामध्ये खासदार संभाजीराजे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती प्रसाद जाधव यांनी दिली.