शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

एम.कॉम.च्या विद्यार्थ्यांना भुर्दंड ?

By admin | Updated: May 29, 2015 00:19 IST

चुकीचा आराखडा : शिवाजी विद्यापीठाकडे तक्रार; बैठक बोलाविण्याची ‘अभाविप’ची मागणी

संदीप आडनाईक -कोल्हापूर -शिवाजी विद्यापीठाने ५ मे २0१५ रोजी घेतलेल्या एम. कॉम. (भाग एक) च्या दुसऱ्या सत्रातील मे २0१५च्या परीक्षेतील अ‍ॅडव्हान्स अकौंटन्सी विषयातील टॅक्सेशन (पेपर क्रमांक चार) पेपरच्या चुकीच्या आराखड्याचा भुर्दंड या विषयाच्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. शिवाजी विद्यापीठाने २0१४ च्या प्रथम सत्राच्या प्रश्नपत्रिकेचा जो मूळ आराखडा दिला होता, तो आराखडा आणि ५ मे रोजी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा पूर्णता वेगळा असल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. या प्रश्नपत्रिकेत पेपर सेटिंग करणाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिला जाणारा सहावा प्रश्नच गायब केला आहे. यासंदर्भात काही विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दिवशीच परीक्षा विभागाच्या समन्वयकांकडे तक्रार केली होती; परंतु तोंडी तक्रारीला विद्यापीठाने उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, यासंदर्भात शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने एम.कॉम.च्या संबंधित विषयाच्या चुकीच्या प्रश्नपत्रिकेबाबत वाणिज्य विषयाच्या विभागप्रमुखांना कळविल्याचे सांगितले आहे. याबाबत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे. घोषित आराखड्यानुसार एकूण प्रत्येकी १६ गुणांचे ६ प्रश्न विचारले जाणे अपेक्षित आहे. त्यातील प्रश्न क्रमांक १ आणि २ हे अपरिहार्य आहेत. असे एकूण सहापैकी पाच प्रश्न सोडविणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पर्याय उपलब्ध असतो. ५ मे रोजी झालेल्या परीक्षेदरम्यान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रत्यक्षात पाच प्रश्नच विचारले गेले आणि हे सर्वच्या सर्वच प्रश्न अपरिहार्य होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकही पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे अशा प्रकारच्या पेपरसेटिंग्जचा या विद्यार्थ्यांना फटका बसलेला आहे.‘अभाविप’च्या मागण्याविद्यार्थ्यांनी लिहिलेल्या एकूण प्रश्नापैकी अधिक गुणाचे चार प्रश्न निवडून एकूण ८0 ऐवजी ६४ गुणांपैकीच मूल्यांकन करावे६४ पैकी गुणांचे मूल्यांकन करून त्या गुणांचे रूपांतर ८0 पैकी करून अंतिम गुण निश्चित करावेतसंबंधित पेपर सेंटरची चौकशी करून त्याच्यावरील कारवाईची माहिती तक्रारदार म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला लेखी कळवावे ४वाणिज्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी ‘अभाविप’च्या शिष्टमंडळाची थेट बैठक आयोजित करावी, अशा मागण्या विद्यार्थी परिषदेने केल्या आहेत.शिवाजी विद्यापीठाने विद्यार्थी केंद्रित आपली भूमिका सिद्ध करण्यासाठी त्वरित या विषयात विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थी हिताची पावले उचलावीत. संबंधित विद्यार्थ्यांना न्याय्य मिळवून द्यावा.पंकज पाटील, महानगर मंत्री, अभाविप.