शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

एम.कॉम.च्या विद्यार्थ्यांना भुर्दंड ?

By admin | Updated: May 29, 2015 00:19 IST

चुकीचा आराखडा : शिवाजी विद्यापीठाकडे तक्रार; बैठक बोलाविण्याची ‘अभाविप’ची मागणी

संदीप आडनाईक -कोल्हापूर -शिवाजी विद्यापीठाने ५ मे २0१५ रोजी घेतलेल्या एम. कॉम. (भाग एक) च्या दुसऱ्या सत्रातील मे २0१५च्या परीक्षेतील अ‍ॅडव्हान्स अकौंटन्सी विषयातील टॅक्सेशन (पेपर क्रमांक चार) पेपरच्या चुकीच्या आराखड्याचा भुर्दंड या विषयाच्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. शिवाजी विद्यापीठाने २0१४ च्या प्रथम सत्राच्या प्रश्नपत्रिकेचा जो मूळ आराखडा दिला होता, तो आराखडा आणि ५ मे रोजी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा पूर्णता वेगळा असल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. या प्रश्नपत्रिकेत पेपर सेटिंग करणाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिला जाणारा सहावा प्रश्नच गायब केला आहे. यासंदर्भात काही विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दिवशीच परीक्षा विभागाच्या समन्वयकांकडे तक्रार केली होती; परंतु तोंडी तक्रारीला विद्यापीठाने उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, यासंदर्भात शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने एम.कॉम.च्या संबंधित विषयाच्या चुकीच्या प्रश्नपत्रिकेबाबत वाणिज्य विषयाच्या विभागप्रमुखांना कळविल्याचे सांगितले आहे. याबाबत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे. घोषित आराखड्यानुसार एकूण प्रत्येकी १६ गुणांचे ६ प्रश्न विचारले जाणे अपेक्षित आहे. त्यातील प्रश्न क्रमांक १ आणि २ हे अपरिहार्य आहेत. असे एकूण सहापैकी पाच प्रश्न सोडविणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पर्याय उपलब्ध असतो. ५ मे रोजी झालेल्या परीक्षेदरम्यान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रत्यक्षात पाच प्रश्नच विचारले गेले आणि हे सर्वच्या सर्वच प्रश्न अपरिहार्य होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकही पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे अशा प्रकारच्या पेपरसेटिंग्जचा या विद्यार्थ्यांना फटका बसलेला आहे.‘अभाविप’च्या मागण्याविद्यार्थ्यांनी लिहिलेल्या एकूण प्रश्नापैकी अधिक गुणाचे चार प्रश्न निवडून एकूण ८0 ऐवजी ६४ गुणांपैकीच मूल्यांकन करावे६४ पैकी गुणांचे मूल्यांकन करून त्या गुणांचे रूपांतर ८0 पैकी करून अंतिम गुण निश्चित करावेतसंबंधित पेपर सेंटरची चौकशी करून त्याच्यावरील कारवाईची माहिती तक्रारदार म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला लेखी कळवावे ४वाणिज्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी ‘अभाविप’च्या शिष्टमंडळाची थेट बैठक आयोजित करावी, अशा मागण्या विद्यार्थी परिषदेने केल्या आहेत.शिवाजी विद्यापीठाने विद्यार्थी केंद्रित आपली भूमिका सिद्ध करण्यासाठी त्वरित या विषयात विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थी हिताची पावले उचलावीत. संबंधित विद्यार्थ्यांना न्याय्य मिळवून द्यावा.पंकज पाटील, महानगर मंत्री, अभाविप.