शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
3
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
4
किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
5
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
6
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
7
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
8
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
9
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
10
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
11
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
12
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
13
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
14
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
15
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
16
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
17
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या
18
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
19
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
20
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप

‘कदाचित’... नेटका प्रयोग--राज्य नाट्य स्पर्धा

By admin | Updated: December 2, 2015 00:37 IST

यमराज, रेडा आणि मृत्यूची सतत भीती बाळगून जिवंत मरण झेलणारा मानव हे खुमासदार पद्घतीने मांडून, प्रयोग रटाळ होऊ न देता त्याची रंगत सतत ठेवून ‘रंगयात्रा’ एक सुविहित प्रयोग देण्यात यशस्वी

तांत्रिक गोष्टींचे फारसे अवडंबर न माजविता निवडलेल्या नाटकाशी प्रामाणिक राहिले तर दिग्दर्शकाच्या वाट्याला सहसा निराशा येत नाही. ‘रंगयात्रा’चे तंत्रज्ञ-कलाकार मुळात दिग्दर्शकाशी प्रामाणिक राहिल्याने एक सुविहित प्रयोग पाहिल्याचे समाधान लाभले. तेंडुलकरांचे ‘सरी गं सरी’, वसंत सबनीसांचे ‘विच्छा माझी पुरी करा’ तसेच हे सुनंदा पालवणकरांचे ‘कदचित’ नाटक! वगनाट्याचा फॉर्म वापरून बेतलेलीआणि आपापल्या काळात साहित्य आणि प्रयोगमूल्याच्या दृष्टीने यशस्वी झालेली ही नाटके.‘रंगयात्रा’च्या या नाटकात संगीताची बाजू आणि त्यावर घेतलेली मेहनत प्रयोगातील मेळ राखण्यासाठी वादातीत उपयोगी ठरली; तर उपलब्ध साहित्यात नीटस मांडणी केलेली वेशभूषा व रंगभूषा कलाकारांना छान मोकळीक देत होती. नेपथ्य व प्रकाश योजनेकडे रंगमंचावरील रचनेपुरते केवळ लक्ष दिल्यास ते करून, न करून फारसे काही हाताला लागत नाही. नेपथ्याच्या रचनेपेक्षा त्याची शिस्तबद्घ मांडणी अशा नाटकांना गरजेची असते, याचे भान दिग्दर्शकाला हवे होते. म्हणजे विंगेतील वर्दळ प्रेक्षकांना पाहायला लागून त्यांचा होणारा रसभंग टाळता आला असता. बऱ्याचदा नको इतका आत्मविश्वास दिग्दर्शक नि कलाकाराला नडतो तो असा. डेडो अगर लेव्हल्सना काळी फडकी गुंडाळणे म्हणजे मास्किंग नव्हे. संपूर्ण स्टेजचा गोल्डन पॉइंट लक्षात न घेतल्यामुळे कलाकारांना नको एवढा प्रवास करून वावरावे लागत होते. अशा काही किरकोळ गोष्टी, तंत्र आणि अभिनयातील अतिरेक टाळता येण्यास भरपूर संधी आहे. तुषार कुडाळकर आणि धनश्री गुरव या कलाकारांना असा अतिरेक टाळण्यास भरपूर वाव आहे. अनिरुद्घ दांडेकर, तनुजा मिराशी नाटकाची गती आणि रंगत ठेवण्यास उपयोगी ठरतात; पण तो वेग ज्योतिकिरण माने (यमी), अरुण दळवी (मावशी), अशोक तेलगी (भिकारी) का पकडू शकत नाहीत?सर्वच ग्रुप्सना, बनचुके कलाकारांना गेल्या १५-२० वर्षांत तोंड द्यावे लागत आहे. ऐनवेळी नाटक सोडून जाणे, पाठांतराची ऐशी-तैशी करून सुग्रास अन्नात माती कालविणे हे प्रकार तर भल्याभल्यांनी सोसले आहेतच. या सर्वांवर मात करून ग्रुपचा सूत्रधार म्हणून दिग्दर्शक खटाटोप करीत असतो. ‘रंगयात्रा’चे दिग्दर्शक नक्कीच तावून-सुलाखून आजवर प्रयोग सादर करीत आले आहेत, हे या प्रयोगातूनच दिसते. तथापि, अधिक नीटनेटके आणि वेग सांभाळत हे नाटक सादर केल्यास भविष्यातील यश फार दूर नाही. मिलिंद दांडेकरांचा शाहीर खालच्या पट्टीत असूनही सुरेल होता. त्याला मिळणारी कोरसची साथही नेटकी होती. यमराज, रेडा आणि मृत्यूची सतत भीती बाळगून जिवंत मरण झेलणारा मानव हे खुमासदार पद्घतीने मांडून, प्रयोग रटाळ होऊ न देता त्याची रंगत सतत ठेवून ‘रंगयात्रा’ एक सुविहित प्रयोग देण्यात यशस्वी झाली आहे.प्रसन्न जी. कुलकर्णी