शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

‘कदाचित’... नेटका प्रयोग--राज्य नाट्य स्पर्धा

By admin | Updated: December 2, 2015 00:37 IST

यमराज, रेडा आणि मृत्यूची सतत भीती बाळगून जिवंत मरण झेलणारा मानव हे खुमासदार पद्घतीने मांडून, प्रयोग रटाळ होऊ न देता त्याची रंगत सतत ठेवून ‘रंगयात्रा’ एक सुविहित प्रयोग देण्यात यशस्वी

तांत्रिक गोष्टींचे फारसे अवडंबर न माजविता निवडलेल्या नाटकाशी प्रामाणिक राहिले तर दिग्दर्शकाच्या वाट्याला सहसा निराशा येत नाही. ‘रंगयात्रा’चे तंत्रज्ञ-कलाकार मुळात दिग्दर्शकाशी प्रामाणिक राहिल्याने एक सुविहित प्रयोग पाहिल्याचे समाधान लाभले. तेंडुलकरांचे ‘सरी गं सरी’, वसंत सबनीसांचे ‘विच्छा माझी पुरी करा’ तसेच हे सुनंदा पालवणकरांचे ‘कदचित’ नाटक! वगनाट्याचा फॉर्म वापरून बेतलेलीआणि आपापल्या काळात साहित्य आणि प्रयोगमूल्याच्या दृष्टीने यशस्वी झालेली ही नाटके.‘रंगयात्रा’च्या या नाटकात संगीताची बाजू आणि त्यावर घेतलेली मेहनत प्रयोगातील मेळ राखण्यासाठी वादातीत उपयोगी ठरली; तर उपलब्ध साहित्यात नीटस मांडणी केलेली वेशभूषा व रंगभूषा कलाकारांना छान मोकळीक देत होती. नेपथ्य व प्रकाश योजनेकडे रंगमंचावरील रचनेपुरते केवळ लक्ष दिल्यास ते करून, न करून फारसे काही हाताला लागत नाही. नेपथ्याच्या रचनेपेक्षा त्याची शिस्तबद्घ मांडणी अशा नाटकांना गरजेची असते, याचे भान दिग्दर्शकाला हवे होते. म्हणजे विंगेतील वर्दळ प्रेक्षकांना पाहायला लागून त्यांचा होणारा रसभंग टाळता आला असता. बऱ्याचदा नको इतका आत्मविश्वास दिग्दर्शक नि कलाकाराला नडतो तो असा. डेडो अगर लेव्हल्सना काळी फडकी गुंडाळणे म्हणजे मास्किंग नव्हे. संपूर्ण स्टेजचा गोल्डन पॉइंट लक्षात न घेतल्यामुळे कलाकारांना नको एवढा प्रवास करून वावरावे लागत होते. अशा काही किरकोळ गोष्टी, तंत्र आणि अभिनयातील अतिरेक टाळता येण्यास भरपूर संधी आहे. तुषार कुडाळकर आणि धनश्री गुरव या कलाकारांना असा अतिरेक टाळण्यास भरपूर वाव आहे. अनिरुद्घ दांडेकर, तनुजा मिराशी नाटकाची गती आणि रंगत ठेवण्यास उपयोगी ठरतात; पण तो वेग ज्योतिकिरण माने (यमी), अरुण दळवी (मावशी), अशोक तेलगी (भिकारी) का पकडू शकत नाहीत?सर्वच ग्रुप्सना, बनचुके कलाकारांना गेल्या १५-२० वर्षांत तोंड द्यावे लागत आहे. ऐनवेळी नाटक सोडून जाणे, पाठांतराची ऐशी-तैशी करून सुग्रास अन्नात माती कालविणे हे प्रकार तर भल्याभल्यांनी सोसले आहेतच. या सर्वांवर मात करून ग्रुपचा सूत्रधार म्हणून दिग्दर्शक खटाटोप करीत असतो. ‘रंगयात्रा’चे दिग्दर्शक नक्कीच तावून-सुलाखून आजवर प्रयोग सादर करीत आले आहेत, हे या प्रयोगातूनच दिसते. तथापि, अधिक नीटनेटके आणि वेग सांभाळत हे नाटक सादर केल्यास भविष्यातील यश फार दूर नाही. मिलिंद दांडेकरांचा शाहीर खालच्या पट्टीत असूनही सुरेल होता. त्याला मिळणारी कोरसची साथही नेटकी होती. यमराज, रेडा आणि मृत्यूची सतत भीती बाळगून जिवंत मरण झेलणारा मानव हे खुमासदार पद्घतीने मांडून, प्रयोग रटाळ होऊ न देता त्याची रंगत सतत ठेवून ‘रंगयात्रा’ एक सुविहित प्रयोग देण्यात यशस्वी झाली आहे.प्रसन्न जी. कुलकर्णी