शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

‘कदाचित’... नेटका प्रयोग--राज्य नाट्य स्पर्धा

By admin | Updated: December 2, 2015 00:37 IST

यमराज, रेडा आणि मृत्यूची सतत भीती बाळगून जिवंत मरण झेलणारा मानव हे खुमासदार पद्घतीने मांडून, प्रयोग रटाळ होऊ न देता त्याची रंगत सतत ठेवून ‘रंगयात्रा’ एक सुविहित प्रयोग देण्यात यशस्वी

तांत्रिक गोष्टींचे फारसे अवडंबर न माजविता निवडलेल्या नाटकाशी प्रामाणिक राहिले तर दिग्दर्शकाच्या वाट्याला सहसा निराशा येत नाही. ‘रंगयात्रा’चे तंत्रज्ञ-कलाकार मुळात दिग्दर्शकाशी प्रामाणिक राहिल्याने एक सुविहित प्रयोग पाहिल्याचे समाधान लाभले. तेंडुलकरांचे ‘सरी गं सरी’, वसंत सबनीसांचे ‘विच्छा माझी पुरी करा’ तसेच हे सुनंदा पालवणकरांचे ‘कदचित’ नाटक! वगनाट्याचा फॉर्म वापरून बेतलेलीआणि आपापल्या काळात साहित्य आणि प्रयोगमूल्याच्या दृष्टीने यशस्वी झालेली ही नाटके.‘रंगयात्रा’च्या या नाटकात संगीताची बाजू आणि त्यावर घेतलेली मेहनत प्रयोगातील मेळ राखण्यासाठी वादातीत उपयोगी ठरली; तर उपलब्ध साहित्यात नीटस मांडणी केलेली वेशभूषा व रंगभूषा कलाकारांना छान मोकळीक देत होती. नेपथ्य व प्रकाश योजनेकडे रंगमंचावरील रचनेपुरते केवळ लक्ष दिल्यास ते करून, न करून फारसे काही हाताला लागत नाही. नेपथ्याच्या रचनेपेक्षा त्याची शिस्तबद्घ मांडणी अशा नाटकांना गरजेची असते, याचे भान दिग्दर्शकाला हवे होते. म्हणजे विंगेतील वर्दळ प्रेक्षकांना पाहायला लागून त्यांचा होणारा रसभंग टाळता आला असता. बऱ्याचदा नको इतका आत्मविश्वास दिग्दर्शक नि कलाकाराला नडतो तो असा. डेडो अगर लेव्हल्सना काळी फडकी गुंडाळणे म्हणजे मास्किंग नव्हे. संपूर्ण स्टेजचा गोल्डन पॉइंट लक्षात न घेतल्यामुळे कलाकारांना नको एवढा प्रवास करून वावरावे लागत होते. अशा काही किरकोळ गोष्टी, तंत्र आणि अभिनयातील अतिरेक टाळता येण्यास भरपूर संधी आहे. तुषार कुडाळकर आणि धनश्री गुरव या कलाकारांना असा अतिरेक टाळण्यास भरपूर वाव आहे. अनिरुद्घ दांडेकर, तनुजा मिराशी नाटकाची गती आणि रंगत ठेवण्यास उपयोगी ठरतात; पण तो वेग ज्योतिकिरण माने (यमी), अरुण दळवी (मावशी), अशोक तेलगी (भिकारी) का पकडू शकत नाहीत?सर्वच ग्रुप्सना, बनचुके कलाकारांना गेल्या १५-२० वर्षांत तोंड द्यावे लागत आहे. ऐनवेळी नाटक सोडून जाणे, पाठांतराची ऐशी-तैशी करून सुग्रास अन्नात माती कालविणे हे प्रकार तर भल्याभल्यांनी सोसले आहेतच. या सर्वांवर मात करून ग्रुपचा सूत्रधार म्हणून दिग्दर्शक खटाटोप करीत असतो. ‘रंगयात्रा’चे दिग्दर्शक नक्कीच तावून-सुलाखून आजवर प्रयोग सादर करीत आले आहेत, हे या प्रयोगातूनच दिसते. तथापि, अधिक नीटनेटके आणि वेग सांभाळत हे नाटक सादर केल्यास भविष्यातील यश फार दूर नाही. मिलिंद दांडेकरांचा शाहीर खालच्या पट्टीत असूनही सुरेल होता. त्याला मिळणारी कोरसची साथही नेटकी होती. यमराज, रेडा आणि मृत्यूची सतत भीती बाळगून जिवंत मरण झेलणारा मानव हे खुमासदार पद्घतीने मांडून, प्रयोग रटाळ होऊ न देता त्याची रंगत सतत ठेवून ‘रंगयात्रा’ एक सुविहित प्रयोग देण्यात यशस्वी झाली आहे.प्रसन्न जी. कुलकर्णी