शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

प्रसुती सुरक्षेचे आले भान

By admin | Updated: July 10, 2014 00:54 IST

माता मृत्यू प्रमाण घटतेय : वर्षभरात ४१ हजार प्रसुतीमध्ये १५ मातांचा मृत्यू

राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूरआरोग्य विभागाने शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केल्याने कोल्हापूर जिल्ह्यात माता मृत्यूचे प्रमाण घटत चालले आहे. रक्तक्षयामुळे माता मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने गेली दोन वर्षे जिल्हा आरोग्य विभागाने त्याकडे कटाक्षाने लक्ष केंद्रीत केल्याचे फलित दिसू लागले आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण अल्प असून प्रबोधनातून गरोदर मातांमध्ये जागृतीची मोहीम आरोग्य विभागाने हातात घेतली आहे. एवढ्या अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध असताना राज्यात माता मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते. ही बाब निश्चितच चिंताजनक असल्याने शासनाने गरोदर मातांसाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत पण त्याचा प्रसार व प्रचार व्यवस्थित होत नसल्याने अनेक जिल्ह्यांत हे उपक्रम केवळ कागदावरच दिसतात. पण कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गेल्या दोन वर्षांत माता मृत्यू नियंत्रित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. एकूण माता मृत्यूपैकी २५ टक्के मातांचे मृत्यू हे रक्तक्षयानेच होतात. गरोदर मातेच्या अंगात रक्ताचे प्रमाण कमी असल्याने प्रसुतीवेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन माता दगावण्याची शक्यता अधिक असते. ग्रामीण महिलांमध्ये रक्ताचे प्रमाण फारच कमी आढळते. यासाठी आरोग्य विभागाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचे परिणाम सध्या दिसत असून गेल्या वर्षभरात शासकीय दवाखान्यात ४१ हजार १३५ प्रसुती झाल्या, यामध्ये १५ मातांचे मृत्यू झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी ३९ हजार प्रसुतीमध्ये ३७ मातांचे मृत्यू झाले होते. दोन वर्षांत माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. काय आहे ‘जननी सुरक्षा’राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य विभागाच्यावतीने जननी सुरक्षा कार्यक्रम राबविला जातो. त्यामध्ये दारिद्र्यरेषेखालील ग्रामीण महिलेची शासकीय दवाखान्यांत प्रसुती झाल्यानंतर त्या मातेला ७०० रुपये तर शहरी मातेला ६०० रुपये अनुदान दिले जाते. घरी प्रसुती झाली तर पाचशे रुपये दिले जातात. त्याचबरोबर जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमातंर्गत गरोदर मातेला घरापासून दवाखान्यापर्यंत आणले जाते. प्रसुतीनंतर तीन दिवस पोषक आहार मातेला दिला जातो. १०० टक्के मोफत तपासण्या व औषधोपचार केला जातो.