शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

सामना काँग्रेसशीच

By admin | Updated: August 11, 2015 01:36 IST

महापालिका रणांगण : शिवसेना-भाजपची ताकद ५-६ जागाच : मुश्रीफ

कोल्हापूर : लोकशाहीमध्ये शत्रूंना कमी समजायचे नसते, तरीही गेले दहा वर्षांत केलेल्या कामाच्या शिदोरीवर आम्ही सामोरे जात आहोत. आम्ही दलालांच्या माध्यमातून राजकारण करत नसून थेट जनतेत जाऊन करतो, असा निशाणा आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांवर साधला. आमचा सामना काँग्रेसशीच असून पुरोगामी शहरात शिवसेना-भाजप ला जनता स्वीकारणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार मुश्रीफ म्हणाले, विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी आश्वासनांची नुसती खैरात केली. एलबीटी माफ करतो म्हटले ती १०० टक्के केली नाही. शंभर दिवसांत टोलमुक्त करण्याची घोषणा केली, त्याचे काय झाले हे जनता बघते आहे. कोल्हापूर खंडपीठाबाबत तर वकिलांच्या चांगुलपणाचा फायदा घेतला. गेले आठ महिन्यांत भाजप नेत्यांचा बुरखा फाटला आहे. जनतेला दिलेले आश्वासन ते पाळू शकले नाही. शाहू महाराजांच्या या शहरात शिवसेना-भाजपचे विचार जनता खपवून घेणार नाही. गतवेळी त्यांनी ताकद बघितली आहे, ५ ते ६ जागा एवढीच त्यांची ताकद. आमची खरी लढाई ही काँग्रेससोबत आहे. आचारसंहितेपूर्वी कोल्हापूरची टोलमाफी करण्याचे पालकमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्याचे स्वागत करतो पण महापालिकेने केलेला करार व न्यायालयीन प्रक्रियाही महत्त्वाची आहे. महापालिकेवर कर्जाचा बोजा न पडता टोलमाफी व्हावी, अशी कृती समितीची मागणी आहे, त्याला आमचा पाठिंबा असल्याचेही आमदार मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर, सरचिटणीस अनिल साळोखे उपस्थित होते. (प्रतिनिधी)गैरव्यवहारात अडकलेल्यांना उमेदवारी नाहीनिवडून येण्याचे निकष असले तरी चारित्र्यसंपन्न, गोरगरिबांवर प्रेम करणाऱ्या इच्छुकालाच उमेदवारी दिली जाईल. जे गैरव्यवहारात अडकले आहेत, त्यांना कोणत्याही परिस्थितीत स्थान दिले जाणार नसल्याचे आमदार मुश्रीफ यांनी जाहीर केले. आम्ही दलालांच्या माध्यमातून नव्हे, थेट जनतेत जाऊन राजकारण करतो. - हसन मुश्रीफ, आमदारदोन दिवसांत बैठकराष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीची जागावाटपाबाबत प्राथमिक बैठक दोन दिवसांत होणार आहे. माजी मंत्री विनय कोरे व आपण याबाबत बसणार असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.