शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

सामना काँग्रेसशीच

By admin | Updated: August 11, 2015 01:36 IST

महापालिका रणांगण : शिवसेना-भाजपची ताकद ५-६ जागाच : मुश्रीफ

कोल्हापूर : लोकशाहीमध्ये शत्रूंना कमी समजायचे नसते, तरीही गेले दहा वर्षांत केलेल्या कामाच्या शिदोरीवर आम्ही सामोरे जात आहोत. आम्ही दलालांच्या माध्यमातून राजकारण करत नसून थेट जनतेत जाऊन करतो, असा निशाणा आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांवर साधला. आमचा सामना काँग्रेसशीच असून पुरोगामी शहरात शिवसेना-भाजप ला जनता स्वीकारणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार मुश्रीफ म्हणाले, विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी आश्वासनांची नुसती खैरात केली. एलबीटी माफ करतो म्हटले ती १०० टक्के केली नाही. शंभर दिवसांत टोलमुक्त करण्याची घोषणा केली, त्याचे काय झाले हे जनता बघते आहे. कोल्हापूर खंडपीठाबाबत तर वकिलांच्या चांगुलपणाचा फायदा घेतला. गेले आठ महिन्यांत भाजप नेत्यांचा बुरखा फाटला आहे. जनतेला दिलेले आश्वासन ते पाळू शकले नाही. शाहू महाराजांच्या या शहरात शिवसेना-भाजपचे विचार जनता खपवून घेणार नाही. गतवेळी त्यांनी ताकद बघितली आहे, ५ ते ६ जागा एवढीच त्यांची ताकद. आमची खरी लढाई ही काँग्रेससोबत आहे. आचारसंहितेपूर्वी कोल्हापूरची टोलमाफी करण्याचे पालकमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्याचे स्वागत करतो पण महापालिकेने केलेला करार व न्यायालयीन प्रक्रियाही महत्त्वाची आहे. महापालिकेवर कर्जाचा बोजा न पडता टोलमाफी व्हावी, अशी कृती समितीची मागणी आहे, त्याला आमचा पाठिंबा असल्याचेही आमदार मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर, सरचिटणीस अनिल साळोखे उपस्थित होते. (प्रतिनिधी)गैरव्यवहारात अडकलेल्यांना उमेदवारी नाहीनिवडून येण्याचे निकष असले तरी चारित्र्यसंपन्न, गोरगरिबांवर प्रेम करणाऱ्या इच्छुकालाच उमेदवारी दिली जाईल. जे गैरव्यवहारात अडकले आहेत, त्यांना कोणत्याही परिस्थितीत स्थान दिले जाणार नसल्याचे आमदार मुश्रीफ यांनी जाहीर केले. आम्ही दलालांच्या माध्यमातून नव्हे, थेट जनतेत जाऊन राजकारण करतो. - हसन मुश्रीफ, आमदारदोन दिवसांत बैठकराष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीची जागावाटपाबाबत प्राथमिक बैठक दोन दिवसांत होणार आहे. माजी मंत्री विनय कोरे व आपण याबाबत बसणार असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.