शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

दिवाळीसाठी बाजारपेठा फुलल्या

By admin | Updated: October 21, 2014 23:41 IST

वस्त्रनगरी सज्ज : चायना मालाचे वर्चस्व, करोडो रुपयांची उलाढाल अपेक्षित

इचलकरंजी : येथील वस्त्रनगरी दिवाळीसाठी सज्ज झाली आहे. बाजारपेठेत रंगीबेरंगी आकाशकंदील, शोभेच्या वस्तू, रांगोळी, कपडे यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. बाजारपेठेत सरासरी वीस टक्क्यांनी महागाईमध्ये वाढ दिसत असून, ७५ टक्के चायना मालाने बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण केले आहे. निवडणूक निकालानंतर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी दिसत आहे. तर दिवाळीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती.इचलकरंजी शहरातील मेन रोडसह जनता चौक, गांधी पुतळा चौक, डेक्कन चौक या परिसरात स्टॉल उभारण्यात आले आहेत. यामध्ये आकर्षक आकाशकंदील, रांगोळी, शोभेच्या वस्तू, पणत्या, मेणबत्या, रंगीबेरंगी हार, लहान मुलांसाठी खेळणी, किल्ल्यावरचे साहित्य, तयार किल्ले, सैनिक यांसह कपड्यांचे स्टॉल यांचा समावेश आहे. कापड मार्केट, बीजेपी मार्केट या परिसरातही कपड्यांची दुकाने सजली आहेत. बाजारपेठेमधील वस्तूंमध्ये सुमारे ७५ टक्के वस्तू चायना मेड आहे. स्थानिक तयार झालेल्या वस्तूंपेक्षा या वस्तूंची किंमत तुलनात्मकरीत्या खूपच कमी असल्याने ग्राहकही त्याकडे आकर्षित होत आहेत. बाजारपेठेमध्ये वीस ते पंचवीस टक्क्यांनी सर्व वस्तूंमध्ये वाढ झाली आहे. वस्त्रनगरीमध्ये मालक व कामगार असे दोन मुख्य वर्ग असल्याने बोनस वाटपानंतरच खऱ्या अर्थाने खरेदीला सुरुवात होते. गत चार दिवसांपासून बोनस वाटप झाल्यामुळे बाजारपेठेत गर्दी फुलू लागली आहे. दरवर्षी दिवाळीला वस्त्रनगरीत करोडो रुपयांची उलाढाल होते. त्या पार्श्वभूमीवर दुकानदारांनी व स्टॉलधारकांनी मोठ्या प्रमाणात माल भरला आहे. (प्रतिनिधी)आजरा बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दीआजरा : पावसाने लावलेली समाधानकारक हजेरी, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुका याचा परिणाम आजरा तालुक्यात दिवाळीच्या खरेदीवर दिसत असून, बाजारात मोठी गर्दी दिसत आहे. प्राधान्याने कपडे, आकाशकंदील, सोन्याचे जिन्नस, खरेदीकरिता मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे. बहुतांशी सहकारी संस्थांनी सानुग्रह अनुदान व बोनस स्वरूपात कर्मचारी वर्गास दिवाळी भेट दिल्याचा परिणाम बाजारात जाणवत आहे. व्हॉटस अ‍ॅप, फेसबुकवरून खरेदीचा संदेशदेशामधील चायनाची गुंतवणूक कमी व्हावी. त्याचबरोबर देशाला आर्थिक बळकटी मिळावी, यासाठी चायना वस्तू वापरापासून दूर राहा व स्वदेशी वस्तू वापरा आणि पणत्या व दिवाळी शोभेसाठी लागणारे काही साहित्य, फळे या वस्तू रस्त्याकडेला बसलेल्या गरीब व गरजूंकडून खरेदी करा. मोठ्या व्यापारी व दुकानांतून खरेदी करणे टाळून गरजूंना आर्थिक लाभ होईल यासाठी प्रयत्न करा, असे सामाजिक संदेश आजकाल व्हॉटस अ‍ॅप व फेसबुक या सोशल मीडियावरून फिरत आहेत. त्याला काही प्रमाणात प्रतिसादही मिळत असल्याचे दिसत आहे.