शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

‘झेंडू’-‘भेंडी’ मिश्र शेतीतून रोगावर मात

By admin | Updated: January 12, 2016 00:44 IST

नांगनूरच्या शेतकऱ्याचा प्रयोग : प्लास्टिक मल्चिंग रेजबेडचा वापर; लाखोंचा फायदा

नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील तरुण पदवीधर प्रगतशील शेतकरी राघवेंद्र सुबराव मोकाशी यांनी झेंडू आणि भेंडी यांची मिश्र पीक शेती करून युवकांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. व्यापारी पद्धतीने शेती केल्यास अपुरा पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे पडणाऱ्या रोगावर मात करून अपेक्षित उत्पन्न मिळविता येते हेच दाखवून दिले आहे.त्यांनी प्लास्टिक मल्चिंग रेजबेडचा वापर करून दोन फूट अंतरावरती झिगजॅग पद्धतीने झेंडू आणि भेंडी या मिश्र पिकांची ६० गुंठे क्षेत्रावर लागवड केली आहे. भेंडी आणि झेंडू यांच्या दोन सरीतील आंतर पाच फूट ठेवले आहे. झेंडूची रोपे ट्रेमध्ये तयार केली. ३५ दिवसांनंतर रेजबेडवर रोपांची लावणी केली. ड्रीपमधून विद्राव्य खतांच्या मात्रा दिल्या. त्यांनी १२:६१:००, १३:४०:१३ व ००.००.५० या खतांचा वापर केला. गरजेनुसार आठवड्यातून एकदा औषध फवारणी केली. २५ नोेव्हेंबरपासून फूल तोडणी सुरू केली. आतापर्यंत बियाणे, खते, औषध फवारणीसाठी ३० हजार रुपये खर्च आला आहे. झेंडू फुले विक्रीतून एक लाख रुपये मिळाले असून, झेंडूचा हंगाम किमान आणखी एक महिना चालेल. सध्या ४० क्विंटल फुलांची विक्री झाली आहे.झेंडू शेजारच्या रेजबेडवर भेंडीच्या बियाणाची १६ आॅक्टोबरला टोकण केले. १ डिसेंबरपासून भेंडी काढणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ७५० किलो भेंडी मिळाली आहे. आठवड्यातून तीनवेळा भेंडीची तोडणी करावी लागते. भेंडीचे उत्पादन अजून दोन महिने मिळू शकेल. प्राथमिक अवस्थेत त्यांना भेंडीपासून २० हजार उत्पन्न मिळाले आहे. झेंडूचा भाव स्थिर नसतो त्यामुळे भेंडीचे मिश्र पीक घेतले आहे. झेंडूने शेतातील वातावरण चांगले राहते व बुरशी सूत्रक्रुमीचा नायनाट होतो. त्याचा फायदा भेंडीला होतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यापारी पद्धतीने केल्यास शेतीतून अपेक्षित उत्पन्न घेता येते, असे मोकाशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.हरितक्रांतीमध्ये कृषी संस्थांचा सहभागभारतातील हरितक्रांतीमध्ये अन्नधान्याच्या वाढत्या उत्पादनाबरोबरच त्याच्या जोडीला दुग्ध उत्पादनामध्येही दखल घेण्याइतकी मजल मारली. यामध्ये केंद्र, राज्य सरकारने स्थापन केलेल्या कृषी संशोधन, प्रशिक्षण संस्था यांचे फार मोठे योगदान आहे. जगाच्या बरोबरीने किंबहुना एक पाऊल पुढे टाकण्यासाठी या संस्था मैलाच्या दगड ठरल्या आहेत. खास शेतकऱ्यांसाठी या संस्थांचा परिचय या आठवड्यापासून...भारताने औद्योगिकीरणाच्या पातळीवर चांगली प्रगती केली असली तरी त्याचा पाया हा इथल्या शेतीवरच आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन ऋतू इथल्या शेतीवर परिणाम करतात. या ऋतूनुसारच पिकांची निवड, क्रमवारी, जाती, उत्पादनाची क्षमता ठरते. एकाच वेळी वेगवेगळे वातावरण असणाऱ्या या देशात हरित क्रांती झाल्यानंतर पारंपरिक शेती मागे पडली आणि त्यात आधुनिक तंत्रज्ञान, बियाणे, खते, औषधांचा वापर होऊ लागला. लोकसंख्या वाढली तरी आपल्याला पुरवून निर्यात करता येईल इतके अन्न धान्य, फळे आपण पिकवू शकलो. कृषी संशोधन व प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिला आहे. राज्यात अहमदनगर जिल्ह्यात राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, परभणीचे मराठवाडा कृषी विद्यापीठ, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीचे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अशी चार कृषी विद्यापीठे आहेत. या चारही विद्यापीठांमध्ये संशोधनबरोबरच पदवी व पदविका अभ्यासक्रम शिकवितात. या चारही विद्यापीठांमध्ये समन्वय साधण्याचे काम महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद करीत असते.