शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ग्रेज्युएशन डिग्रीशी संबंधित माहितीचा खुलासा होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
4
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
5
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
6
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
7
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
8
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
9
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
10
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
11
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
12
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
13
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
14
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
15
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
16
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
17
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
18
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
19
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
20
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा

‘झेंडू’-‘भेंडी’ मिश्र शेतीतून रोगावर मात

By admin | Updated: January 12, 2016 00:44 IST

नांगनूरच्या शेतकऱ्याचा प्रयोग : प्लास्टिक मल्चिंग रेजबेडचा वापर; लाखोंचा फायदा

नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील तरुण पदवीधर प्रगतशील शेतकरी राघवेंद्र सुबराव मोकाशी यांनी झेंडू आणि भेंडी यांची मिश्र पीक शेती करून युवकांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. व्यापारी पद्धतीने शेती केल्यास अपुरा पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे पडणाऱ्या रोगावर मात करून अपेक्षित उत्पन्न मिळविता येते हेच दाखवून दिले आहे.त्यांनी प्लास्टिक मल्चिंग रेजबेडचा वापर करून दोन फूट अंतरावरती झिगजॅग पद्धतीने झेंडू आणि भेंडी या मिश्र पिकांची ६० गुंठे क्षेत्रावर लागवड केली आहे. भेंडी आणि झेंडू यांच्या दोन सरीतील आंतर पाच फूट ठेवले आहे. झेंडूची रोपे ट्रेमध्ये तयार केली. ३५ दिवसांनंतर रेजबेडवर रोपांची लावणी केली. ड्रीपमधून विद्राव्य खतांच्या मात्रा दिल्या. त्यांनी १२:६१:००, १३:४०:१३ व ००.००.५० या खतांचा वापर केला. गरजेनुसार आठवड्यातून एकदा औषध फवारणी केली. २५ नोेव्हेंबरपासून फूल तोडणी सुरू केली. आतापर्यंत बियाणे, खते, औषध फवारणीसाठी ३० हजार रुपये खर्च आला आहे. झेंडू फुले विक्रीतून एक लाख रुपये मिळाले असून, झेंडूचा हंगाम किमान आणखी एक महिना चालेल. सध्या ४० क्विंटल फुलांची विक्री झाली आहे.झेंडू शेजारच्या रेजबेडवर भेंडीच्या बियाणाची १६ आॅक्टोबरला टोकण केले. १ डिसेंबरपासून भेंडी काढणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ७५० किलो भेंडी मिळाली आहे. आठवड्यातून तीनवेळा भेंडीची तोडणी करावी लागते. भेंडीचे उत्पादन अजून दोन महिने मिळू शकेल. प्राथमिक अवस्थेत त्यांना भेंडीपासून २० हजार उत्पन्न मिळाले आहे. झेंडूचा भाव स्थिर नसतो त्यामुळे भेंडीचे मिश्र पीक घेतले आहे. झेंडूने शेतातील वातावरण चांगले राहते व बुरशी सूत्रक्रुमीचा नायनाट होतो. त्याचा फायदा भेंडीला होतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यापारी पद्धतीने केल्यास शेतीतून अपेक्षित उत्पन्न घेता येते, असे मोकाशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.हरितक्रांतीमध्ये कृषी संस्थांचा सहभागभारतातील हरितक्रांतीमध्ये अन्नधान्याच्या वाढत्या उत्पादनाबरोबरच त्याच्या जोडीला दुग्ध उत्पादनामध्येही दखल घेण्याइतकी मजल मारली. यामध्ये केंद्र, राज्य सरकारने स्थापन केलेल्या कृषी संशोधन, प्रशिक्षण संस्था यांचे फार मोठे योगदान आहे. जगाच्या बरोबरीने किंबहुना एक पाऊल पुढे टाकण्यासाठी या संस्था मैलाच्या दगड ठरल्या आहेत. खास शेतकऱ्यांसाठी या संस्थांचा परिचय या आठवड्यापासून...भारताने औद्योगिकीरणाच्या पातळीवर चांगली प्रगती केली असली तरी त्याचा पाया हा इथल्या शेतीवरच आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन ऋतू इथल्या शेतीवर परिणाम करतात. या ऋतूनुसारच पिकांची निवड, क्रमवारी, जाती, उत्पादनाची क्षमता ठरते. एकाच वेळी वेगवेगळे वातावरण असणाऱ्या या देशात हरित क्रांती झाल्यानंतर पारंपरिक शेती मागे पडली आणि त्यात आधुनिक तंत्रज्ञान, बियाणे, खते, औषधांचा वापर होऊ लागला. लोकसंख्या वाढली तरी आपल्याला पुरवून निर्यात करता येईल इतके अन्न धान्य, फळे आपण पिकवू शकलो. कृषी संशोधन व प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिला आहे. राज्यात अहमदनगर जिल्ह्यात राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, परभणीचे मराठवाडा कृषी विद्यापीठ, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीचे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अशी चार कृषी विद्यापीठे आहेत. या चारही विद्यापीठांमध्ये संशोधनबरोबरच पदवी व पदविका अभ्यासक्रम शिकवितात. या चारही विद्यापीठांमध्ये समन्वय साधण्याचे काम महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद करीत असते.