शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

‘झेंडू’-‘भेंडी’ मिश्र शेतीतून रोगावर मात

By admin | Updated: January 12, 2016 00:44 IST

नांगनूरच्या शेतकऱ्याचा प्रयोग : प्लास्टिक मल्चिंग रेजबेडचा वापर; लाखोंचा फायदा

नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील तरुण पदवीधर प्रगतशील शेतकरी राघवेंद्र सुबराव मोकाशी यांनी झेंडू आणि भेंडी यांची मिश्र पीक शेती करून युवकांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. व्यापारी पद्धतीने शेती केल्यास अपुरा पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे पडणाऱ्या रोगावर मात करून अपेक्षित उत्पन्न मिळविता येते हेच दाखवून दिले आहे.त्यांनी प्लास्टिक मल्चिंग रेजबेडचा वापर करून दोन फूट अंतरावरती झिगजॅग पद्धतीने झेंडू आणि भेंडी या मिश्र पिकांची ६० गुंठे क्षेत्रावर लागवड केली आहे. भेंडी आणि झेंडू यांच्या दोन सरीतील आंतर पाच फूट ठेवले आहे. झेंडूची रोपे ट्रेमध्ये तयार केली. ३५ दिवसांनंतर रेजबेडवर रोपांची लावणी केली. ड्रीपमधून विद्राव्य खतांच्या मात्रा दिल्या. त्यांनी १२:६१:००, १३:४०:१३ व ००.००.५० या खतांचा वापर केला. गरजेनुसार आठवड्यातून एकदा औषध फवारणी केली. २५ नोेव्हेंबरपासून फूल तोडणी सुरू केली. आतापर्यंत बियाणे, खते, औषध फवारणीसाठी ३० हजार रुपये खर्च आला आहे. झेंडू फुले विक्रीतून एक लाख रुपये मिळाले असून, झेंडूचा हंगाम किमान आणखी एक महिना चालेल. सध्या ४० क्विंटल फुलांची विक्री झाली आहे.झेंडू शेजारच्या रेजबेडवर भेंडीच्या बियाणाची १६ आॅक्टोबरला टोकण केले. १ डिसेंबरपासून भेंडी काढणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ७५० किलो भेंडी मिळाली आहे. आठवड्यातून तीनवेळा भेंडीची तोडणी करावी लागते. भेंडीचे उत्पादन अजून दोन महिने मिळू शकेल. प्राथमिक अवस्थेत त्यांना भेंडीपासून २० हजार उत्पन्न मिळाले आहे. झेंडूचा भाव स्थिर नसतो त्यामुळे भेंडीचे मिश्र पीक घेतले आहे. झेंडूने शेतातील वातावरण चांगले राहते व बुरशी सूत्रक्रुमीचा नायनाट होतो. त्याचा फायदा भेंडीला होतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यापारी पद्धतीने केल्यास शेतीतून अपेक्षित उत्पन्न घेता येते, असे मोकाशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.हरितक्रांतीमध्ये कृषी संस्थांचा सहभागभारतातील हरितक्रांतीमध्ये अन्नधान्याच्या वाढत्या उत्पादनाबरोबरच त्याच्या जोडीला दुग्ध उत्पादनामध्येही दखल घेण्याइतकी मजल मारली. यामध्ये केंद्र, राज्य सरकारने स्थापन केलेल्या कृषी संशोधन, प्रशिक्षण संस्था यांचे फार मोठे योगदान आहे. जगाच्या बरोबरीने किंबहुना एक पाऊल पुढे टाकण्यासाठी या संस्था मैलाच्या दगड ठरल्या आहेत. खास शेतकऱ्यांसाठी या संस्थांचा परिचय या आठवड्यापासून...भारताने औद्योगिकीरणाच्या पातळीवर चांगली प्रगती केली असली तरी त्याचा पाया हा इथल्या शेतीवरच आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन ऋतू इथल्या शेतीवर परिणाम करतात. या ऋतूनुसारच पिकांची निवड, क्रमवारी, जाती, उत्पादनाची क्षमता ठरते. एकाच वेळी वेगवेगळे वातावरण असणाऱ्या या देशात हरित क्रांती झाल्यानंतर पारंपरिक शेती मागे पडली आणि त्यात आधुनिक तंत्रज्ञान, बियाणे, खते, औषधांचा वापर होऊ लागला. लोकसंख्या वाढली तरी आपल्याला पुरवून निर्यात करता येईल इतके अन्न धान्य, फळे आपण पिकवू शकलो. कृषी संशोधन व प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिला आहे. राज्यात अहमदनगर जिल्ह्यात राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, परभणीचे मराठवाडा कृषी विद्यापीठ, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीचे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अशी चार कृषी विद्यापीठे आहेत. या चारही विद्यापीठांमध्ये संशोधनबरोबरच पदवी व पदविका अभ्यासक्रम शिकवितात. या चारही विद्यापीठांमध्ये समन्वय साधण्याचे काम महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद करीत असते.