शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
3
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
5
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
6
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
7
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
8
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
10
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
11
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
12
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
13
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
15
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
16
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
17
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
18
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
19
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
20
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

खच्चीकरण होऊनही मराठ्यांनी संस्कृती जपली

By admin | Updated: October 8, 2016 01:24 IST

संदीप पाटील यांचे मत

कोल्हापूर : कालौघात बहुतांश भूमिहीन झालेला मराठा शेतकरी, शिकूनही अपेक्षित नोकरी व योग्य संधी मिळत नसल्याने खचलेला विशेषत: ग्रामीण भागातील तरुण अशी सद्य:स्थिती नेतृत्व करणाऱ्या मराठा समाजाची आहे. यामुळे काहीअंशी पिचलेल्या या समाजाचे मानसिक व शारीरिक खच्चीकरण झाल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. असे असले तरी त्यांनी गुणसूत्रां (जीन्स)मुळे आपला लढवय्या स्वभाव व संस्कृती सोडलेली नाही, असे मत मराठा चळवळीतील कार्यकर्ते डॉ. संदीप पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.डॉ. संदीप पाटील म्हणाले, मराठा समाजातील मूठभर लोक पुढे गेले आहेत, हेच चित्र आतापर्यंत रंगविण्यात आले आहे; परंतु ते अर्धसत्य आहे. या समाजाची व्याप्ती फार मोठी असून, त्यातील मोठ्या प्रमाणातील संख्या हलाखीच्या लोकांची आहे. या समाजाची पार्श्वभूमी शेतीव्यवस्थेची आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच या लढवय्या मराठा समाजाकडे नेतृत्वगुण दिसताहेत. त्यांनी सर्व बारा बलुतेदारांसह अन्य जातींचे नेतृत्व करून नेहमीच मोठ्या भावाची भूमिका बजावली आहे. या समाजाने नेहमीच इतरांना मोठ्या मनाने केवळ देण्याचेच काम केले आहे; परंतु आता ती स्थिती राहिलेली नाही. त्यांच्यावरही आता काहीतरी मागण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात या समाजाला प्रथम अडचणींना सामोरे जावे लागले. दिवसेंदिवस त्याची वाटचाल भूमिहीनतेकडे होत गेली. ते पुढे म्हणाले, फक्त भूमिहीन होण्यामुळेच हा समाज मागे पडत गेला असे नाही; तर जागतिकीकरणात व्यापारी पेठा काबीज करता येऊ न शकल्याने व त्याच्या हातात काहीच न राहिल्याने तो खऱ्या अर्थाने मागे पडला. सध्या तर अडचणींची परिसीमाच गाठली आहे. नोकरीत कुठेही संधी मिळत नसल्याने मराठा तरुण अस्वस्थ आहे.ज्यांच्याकडे जमिनी आहेत त्या शेतकऱ्यांवरही आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. माणूस आत्महत्येसारखा विचार का करतो, तर त्याची मानसिकता तशी झालेली असते. मोठ्या प्रमाणात मराठा शेतकरी या दुष्टचक्रातून जात आहेत. सध्या माहिती तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत आहे; परंतु त्यामध्ये आपला समाज म्हणावा असा पुढे गेलेला दिसत नाही. याला प्रमुख कारण म्हणजे उत्पन्नाचा स्रोत नसल्याने दर्जेदार शिक्षणाकडे त्यांना जाता येत नाही. या क्षेत्रात ज्यांना संधी निर्माण झाली, त्यामध्ये काही प्रमाणातच मराठा तरुण गेले; परंतु त्यांनाही पायाभूत सुविधा मिळाल्या नाहीत. गुणवत्ता व लढवय्येपणा अजूनही कायम आहे.मोर्चानंतर पुढे काय?मराठा मोर्चानंतरही हा समाज एकत्र राहण्यासाठी जिल्हास्तरावर ‘सकल मराठा प्रबोधन मंच’ निर्माण केला पाहिजे. यामध्ये मराठा समाजातील विचारवंत, डॉक्टर्स, वकील, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा समावेश करावा. या माध्यमातून तालुकापातळीवर वेळोवेळी संपर्क साधून समाजाशी संवाद साधला जावा.तरुण घेताहेत मोर्चातून भविष्याचा वेध या मोर्चाच्या निमित्ताने सर्व मराठा बांधव एकत्र आले आहेत. त्या माध्यमातून मनोधैर्य आले आहे. मोर्चाच्या माध्यमातून मराठ्यांची विशेषत: तरुणांची खदखद बाहेर पडत आहे. हा समाज शांतपणे आपल्या मागण्यांसाठी पुढे येत आहे. यातून तरुणांचे नेतृत्व बाहेर पडत असून, ते या माध्यमातून भविष्याचा वेध घेत आहेत. हा मोर्चा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पाऊलवाट ठरेल.