शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
3
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
4
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
5
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
6
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
7
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
8
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
9
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
10
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
11
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
12
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
13
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
14
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
15
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
16
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
17
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
18
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
20
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!

खच्चीकरण होऊनही मराठ्यांनी संस्कृती जपली

By admin | Updated: October 8, 2016 01:24 IST

संदीप पाटील यांचे मत

कोल्हापूर : कालौघात बहुतांश भूमिहीन झालेला मराठा शेतकरी, शिकूनही अपेक्षित नोकरी व योग्य संधी मिळत नसल्याने खचलेला विशेषत: ग्रामीण भागातील तरुण अशी सद्य:स्थिती नेतृत्व करणाऱ्या मराठा समाजाची आहे. यामुळे काहीअंशी पिचलेल्या या समाजाचे मानसिक व शारीरिक खच्चीकरण झाल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. असे असले तरी त्यांनी गुणसूत्रां (जीन्स)मुळे आपला लढवय्या स्वभाव व संस्कृती सोडलेली नाही, असे मत मराठा चळवळीतील कार्यकर्ते डॉ. संदीप पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.डॉ. संदीप पाटील म्हणाले, मराठा समाजातील मूठभर लोक पुढे गेले आहेत, हेच चित्र आतापर्यंत रंगविण्यात आले आहे; परंतु ते अर्धसत्य आहे. या समाजाची व्याप्ती फार मोठी असून, त्यातील मोठ्या प्रमाणातील संख्या हलाखीच्या लोकांची आहे. या समाजाची पार्श्वभूमी शेतीव्यवस्थेची आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच या लढवय्या मराठा समाजाकडे नेतृत्वगुण दिसताहेत. त्यांनी सर्व बारा बलुतेदारांसह अन्य जातींचे नेतृत्व करून नेहमीच मोठ्या भावाची भूमिका बजावली आहे. या समाजाने नेहमीच इतरांना मोठ्या मनाने केवळ देण्याचेच काम केले आहे; परंतु आता ती स्थिती राहिलेली नाही. त्यांच्यावरही आता काहीतरी मागण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात या समाजाला प्रथम अडचणींना सामोरे जावे लागले. दिवसेंदिवस त्याची वाटचाल भूमिहीनतेकडे होत गेली. ते पुढे म्हणाले, फक्त भूमिहीन होण्यामुळेच हा समाज मागे पडत गेला असे नाही; तर जागतिकीकरणात व्यापारी पेठा काबीज करता येऊ न शकल्याने व त्याच्या हातात काहीच न राहिल्याने तो खऱ्या अर्थाने मागे पडला. सध्या तर अडचणींची परिसीमाच गाठली आहे. नोकरीत कुठेही संधी मिळत नसल्याने मराठा तरुण अस्वस्थ आहे.ज्यांच्याकडे जमिनी आहेत त्या शेतकऱ्यांवरही आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. माणूस आत्महत्येसारखा विचार का करतो, तर त्याची मानसिकता तशी झालेली असते. मोठ्या प्रमाणात मराठा शेतकरी या दुष्टचक्रातून जात आहेत. सध्या माहिती तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत आहे; परंतु त्यामध्ये आपला समाज म्हणावा असा पुढे गेलेला दिसत नाही. याला प्रमुख कारण म्हणजे उत्पन्नाचा स्रोत नसल्याने दर्जेदार शिक्षणाकडे त्यांना जाता येत नाही. या क्षेत्रात ज्यांना संधी निर्माण झाली, त्यामध्ये काही प्रमाणातच मराठा तरुण गेले; परंतु त्यांनाही पायाभूत सुविधा मिळाल्या नाहीत. गुणवत्ता व लढवय्येपणा अजूनही कायम आहे.मोर्चानंतर पुढे काय?मराठा मोर्चानंतरही हा समाज एकत्र राहण्यासाठी जिल्हास्तरावर ‘सकल मराठा प्रबोधन मंच’ निर्माण केला पाहिजे. यामध्ये मराठा समाजातील विचारवंत, डॉक्टर्स, वकील, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा समावेश करावा. या माध्यमातून तालुकापातळीवर वेळोवेळी संपर्क साधून समाजाशी संवाद साधला जावा.तरुण घेताहेत मोर्चातून भविष्याचा वेध या मोर्चाच्या निमित्ताने सर्व मराठा बांधव एकत्र आले आहेत. त्या माध्यमातून मनोधैर्य आले आहे. मोर्चाच्या माध्यमातून मराठ्यांची विशेषत: तरुणांची खदखद बाहेर पडत आहे. हा समाज शांतपणे आपल्या मागण्यांसाठी पुढे येत आहे. यातून तरुणांचे नेतृत्व बाहेर पडत असून, ते या माध्यमातून भविष्याचा वेध घेत आहेत. हा मोर्चा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पाऊलवाट ठरेल.