शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

‘मार्केटिंग’मध्ये मराठा समाज मागे

By admin | Updated: August 15, 2014 00:22 IST

नीतेश राणे : मराठा समाजातील मान्यवरांचा सन्मान सोहळा

कोल्हापूर : जिद्द, कष्ट, प्रामाणिकपणा, साहस असे अनेक गुण मराठा समाजात आहेत; परंतु इतर समाजांप्रमाणे स्वत:चे ‘मार्केटिंग’ करण्यात हा समाज कमी पडतो, असे सांगून आरक्षणाचा लाभ घेऊन व्यापार-उद्योग क्षेत्रांत मराठा समाजातील युवकांनी पुढे जावे, असे आवाहन स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांनी आज, गुरुवारी येथे केले.राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सह्याद्री फौंडेशन व चव्हाण ग्रुप आॅफ कंपनीज्तर्फे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणाऱ्या मान्यवरांचा महासन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते. जिल्हा परिषदेचे सदस्य धैर्यशील माने, सम्राट महाडिक, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी कुलगुरू पवार यांच्या हस्ते स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे, संभाजी ब्रिगेडचे सरचिटणीस शांताराम कुंजीर, ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांचा सत्कार करण्यात आला. राणे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय मंत्री नारायण राणे यांनी घेतला आहे, त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. मराठा समाजाला आता आरक्षण मिळाले आहे. याचा फायदा उठवीत समाजातील युवकांनी भविष्याकडे वाटचाल करावी. सहसा मराठा समाजात एकजूट पाहायला मिळत नाही; परंतु या ठिकाणी मराठा समाज एकत्र आल्याचे पाहून आनंद वाटत आहे. हे गुण आजच्या युवकांनी आत्मसात करून एकमेकांना हात देण्याचे काम केले पाहिजे.कुलगुरू पवार म्हणाले, सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी शिक्षण हे माध्यम आहे. यामध्ये समाज मागे पडला तर उन्नती होत नाही. मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचा निश्चित फायदा आताच्या पिढीला मिळेल. त्याचा त्यांनी लाभ घेण्याची गरज आहे.यावेळी धैर्यशील माने यांचेही भाषण झाले. चव्हाण ग्रुप आॅफ कंपनीज व सह्याद्री फौंडेशन (पुणे)चे अध्यक्ष सतीश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. गुरुबाळ माळी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)