शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
3
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
4
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
5
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
6
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
7
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
9
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
10
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
11
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
12
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
13
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
14
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
15
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
16
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
17
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
18
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
19
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
20
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा

महाविकास आघाडीमुळेच मराठा आरक्षण गमावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. त्याला राज्य सरकार जबाबदार आहे. आरक्षण ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. त्याला राज्य सरकार जबाबदार आहे. आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजातील युवकाच्या जीवनात अंधार निर्माण झाला आहे. त्यांना काय सवलत देता येईल. यासाठी राज्य सरकारने तातडीने विधानसभेचे अधिवेशन बोलवावे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

आमदार पाटील म्हणाले, आमचे सरकार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण मराठा समाजाला दिले. त्यातून मराठा समाजातील युवकाना नोकऱ्या मिळाल्या. उच्च न्यायालयातही आरक्षण तत्कालीन सरकारने टिकवून दाखविले. सर्वोच्च न्यायालयात या आरक्षणाला आव्हान दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारने या सुनावणीबद्दल कोणत्याही प्रकारची गंभीर दखल घेतली नाही. न्यायालयात सरकार नीट माहिती देत नाही, अशी टिप्पणी वारंवार सर्वोच्च न्यायालयातील वकिलांनी केली. मराठा आरक्षण कसे न्याय आहे हे न्यायालयात सिद्ध करण्यास राज्य सरकारला अपयश आले आहे. त्याचाच परिणाम म्हणून हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही आणि बुधवारी ते रद्द झाले. एखाद्या जातीला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने स्पष्ट केले होते. त्यामुळे केंद्र सरकारची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट होती. मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे अनेक युवकांच्या आयुष्यात अंधार झाला आहे. त्यांच्यासाठी शासन काय उपाययोजना करू शकते. यासह वाढत्या कोरोना संसर्गासंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ विशेष अधिवेशन बोलवावे