शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

मराठा आरक्षण मोर्चा बंदोबस्ताची जय्यत तयारी

By admin | Updated: September 24, 2016 01:09 IST

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्ताचे काटेकोर नियोजन

कोल्हापूर : कोपर्डीतील बलात्काराच्या घटनेचा निषेध, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी, यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापुरात दि. १५ आॅक्टोबरला सकल मराठा समाजातर्फे मराठा क्रांती मूक मोर्चा निघणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्ताचे काटेकोर नियोजन होत आहे. मेळाव्यात सहभागी होणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी वाहनांची पार्किंग व्यवस्था, वाहनांना प्रवेश बंदी, आदी नियोजनाची तयारी सुरू आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी शुक्रवारी दिली. मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात राज्यभर मराठा क्रांती मूक मोर्चे निघत आहेत. त्यामध्ये मराठा समाज सहभागी होऊन रस्त्यावर उतरत आहे. कोल्हापुरातही असा भव्य मोर्चा १५ आॅक्टोबरला निघत आहे. मोर्चामध्ये आयोजकांनी सुमारे १५ लाख नागरिक उपस्थित राहतील, असा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने मोर्चाच्या बंदोबस्ताच्या नियोजनाची तयारी केली आहे. शिस्तबद्ध नियोजन व्हावे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेच्या नियोजनाची तयारी सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी सांगितले.