शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

मराठा मोर्चाला सामोरे जाणार नाही

By admin | Updated: October 13, 2016 02:08 IST

चंद्रकांतदादांची भूमिका : कोअर कमिटीचा निर्णय मान्य; मोर्चातील सहभागाबाबत मौन

कोल्हापूर : कोल्हापुरात शनिवारी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चावेळी निवेदनाविषयी कोअर कमिटी जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, मोर्चाला मी सामोरे जाणार नसल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांनी निवेदन स्वीकारण्यावरून सुरु झालेल्या वादावर पडदा पडला.शनिवारी कोल्हापुरात निघणाऱ्या सकल मराठा क्रांती मोर्चावेळी शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देताना आपण उपस्थित राहणार असल्याची भूमिका पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतली होती; पण पालकमंत्र्यांच्या या भूमिकेला सकल मराठा समाज कोअर कमिटीने आक्षेप घेतला होता. त्यांनी निवेदन स्वीकारण्याचा हट्ट धरल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे फिरकणार नाही व मोर्चाचेही विसर्जन करणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्याची दखल घेत पालकमंत्र्यांनीच स्वत:हून एक पाऊल मागे घेत समन्वयाची भूमिका घेतली. त्यासंबंधीची भूमिका ‘लोकमत’कडे मांडताना पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘राज्यभर सकल मराठा समाजाचे मोर्चे निघत असताना कोल्हापुरातील मोर्चावेळी राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी संवाद सुरू ठेवण्याबाबत भूमिका घेतली होती; पण मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्यास त्यासाठी माझी काहीही हरकत नाही. मोर्चाच्यावतीने कोअर कमिटी जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे. राज्यात इतर जिल्ह्यांत ज्याप्रमाणे मोर्चा निघाला, त्या मोर्चाच्या शिष्टमंडळातील मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्याप्रमाणे कोल्हापुरातही मुलींनी निवेदन द्यावे. प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारून ते पुन्हा सरकारकडेच म्हणजे माझ्याकडेच देणार होते. त्यामुळे मी सरकार म्हणून हे निवेदन स्वीकारणार होतो. मोर्चातील प्रतिनिधी आणि सरकार यांच्यात संवाद सुरू होणे आवश्यक होते पण कोअर कमिटी जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे, त्यामुळे मी मोर्चाला सामोरे जाणार नाही.’माझी भूमिका सकारात्मकराज्यभर लाखोंच्या संख्येने निघणाऱ्या सकल मराठा क्रांती मोर्चाची कोंडी फोडण्याची जबाबदारी आपल्यावर शासनाने दिलेली आहे काय? या प्रश्नावर पालकमंत्री पाटील यांनी, माझी राज्य शासन म्हणून सकारात्मक भूमिका होती इतकेच उत्तर त्यांनी दिले; तसेच मोर्चातील सहभागाबाबत मात्र त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.मागण्या मान्य करण्यास कटिबद्धराज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून सकल मराठा समाजाच्या सर्व मागण्या लवकरात लवकर मान्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहूंच्या कार्याचा मी सच्चा पाईक आहे. समाजाच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन, अशीही ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.