शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी कोल्हापुरातील मराठा समाज नेटाने लढा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मराठा समाज सध्या शांत आहे. हा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हक्काचे आरक्षण ...

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मराठा समाज सध्या शांत आहे. हा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हक्काचे आरक्षण मिळविण्यासाठी पुन्हा नेटाने लढा देण्याचा निर्धार शिवाजी पेठेतील बैठकीत कोल्हापुरातील मराठा समाजाने शुक्रवारी केला. या लढ्यासाठी शिवाजी पेठ, मंगळवार पेठ एकत्र आली आहे. शहरातील अन्य पेठांमधील तालीम संस्थांनादेखील लवकरच संघटित केले जाणार असल्याचे शिवाजी तरुण मंडळ तथा निमंत्रक मराठा समाज अन्यायविरोधी संघर्ष समितीचे समन्वयक सुजित चव्हाण यांनी सांगितले.

शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात या संघर्ष समितीतर्फे बैठक घेण्यात आली. आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाज शांत झाला आहे, असे कोणी समजू नये. वाढता कोरोना आणि त्याला रोखण्याबाबत राज्य सरकारने केलेल्या आवाहनामुळे मराठा समाजाने सध्या शांततेची भूमिका घेतली आहे. आरक्षण मिळविल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे सुजित चव्हाण यांनी सांगितले. केंद्र सरकार हे मराठा आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा. काहीही करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी निवास साळोखे यांनी केली. आरक्षण देण्यासाठी मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये सरकारने समावेश करावा. राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल करावी, असे बाबा इंदुलकर यांनी सांगितले. आरक्षणासाठी सर्वांनी एकत्रित येऊन ताकदीने लढा देऊया. मराठा समाजातील आमदार, खासदार यांनी आरक्षण मिळवून द्यावे, अशी मागणी महेश जाधव यांनी केली. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत फेरविचार याचिका दाखल केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानण्यात आले. यावेळी अजित राऊत, बाबा पार्टे, बाबा महाडिक, रविकिरण इंगवले, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, अशोकराव जाधव, चंद्रकांत साळोखे, शिवाजीराव जाधव, प्रतीश गायकवाड, पृथ्वीराज जगताप, अजिंक्य चव्हाण, अजित खराडे, सुरेश गायकवाड, प्रताप देसाई, श्रीकांत भोसले, राजू सावंत, मंजित माने, आदी उपस्थित होते. सुरेश जरग यांनी सूत्रसंचालन केले.

कोण, काय म्हणाले?

बाबा पार्टे : ९५ टक्के नेते मराठा समाजाचे आहेत. त्यांनी आरक्षणाचा मुद्दा मनावर घ्यावा. पुढील मोर्चे हे मूक स्वरूपातील असू नयेत.

जयकुमार शिंदे : शहरातील प्रत्येक तालीम संस्था, तरुण मंडळांना एकत्रित करून आरक्षणाचा लढा तीव्र केला जाईल.

राजू सावंत : टिकणारे आरक्षण मिळविण्यासाठी अभ्यास समिती नेमावी. मराठा समाजाने आंदोलन सुरूच ठेवावे.

कल्याणी माणगावे : मराठा समाज कसा मागास आहे ते राज्य सरकारने योग्य पद्धतीने मांडावे. सनदशीर मार्गाने लढा देणे आवश्यक आहे.

महादेवराव जाधव : आरक्षणासाठी भव्य मोर्चे काढण्यात यावेत. त्यात मराठा समाजबांधवांनी सहभागी व्हावे.