शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या दप्तर दिरंगाईने अनेक शेतकरी देशोधडीला

By admin | Updated: April 6, 2017 00:49 IST

उपसा सिंचन योजना कधी सुरू होणार : हजारो हेक्टर जमीन पाण्यापासून वंचित

शिवाजी सावंत ल्ल गारगोटीशासनाच्या दप्तर दिरंगाईने गेली १८ वर्षे १९ गावांतील हजारो हेक्टर क्षेत्र पाण्यापासून वंचित ठेवले गेले असून, ‘पांढरा पट्टा’ समजला जाणारा हा भाग ‘हरित पट्टा’ कधी होणार? लोकप्रतिनिधी आणि शासनाच्या वेळकाढूपणामुळे हजारो शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे, तर अतिशय कमी खर्चात होऊ शकणारी उपसा सिंचन योजना कधी सुरू होणार आहे, याकडे या भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.भुदरगड तालुक्यातील मिणचे खोरी व टिक्केवाडी, पंडिवरे, परिसरातील १९ गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीला बसूदेव-भुजाई जल उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळण्यासाठी आणि या भागातील हरितक्रांतीचे स्पप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून मंजुरीची आवश्यकता आहे. ही योजना अमलात आल्यास १९ गावांतील ५८३८ हेक्टर शेतीचे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. जमीन ओलिताखाली येऊन पडीक जमिनीचा विकास होण्यास वाव मिळणार आहे. तर या भागातील शेतकरी फळबागा, ऊस लागवड, द्राक्षे, चहा, कॉफीचे मळे फुलविण्यास उत्सुकतेने वाट पाहत आहे. भुदरगडचे भूमिपुत्र असलेले पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या दूरदृष्टीतून बसुदेव-भुजाई जलसिंचन योजना कार्यान्वित व्हावी, ही शेतकऱ्यांची इच्छा आहे.तालुक्यातील १९ गावे नदीपात्र, नैसर्गिक जलस्रोत, कालव्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. पाटगाव, फये, काळम्मावाडी धरणाच्या डाव्या-उजव्या कालव्यातूनही या गावांना पाणी मिळत नसल्याने विहीर किंवा बोअरवेलवर अवलंबून राहावे लागत आहे; परंतु भूजल पातळी कमालीची खालावल्याने खडकाळ भागातील जमिनीला पाणी मिळत नाही. या भागातील शेतकरी पावसाच्या पाण्यावरच आपली शेती पिकवीत आहेत. इथला शेतकरी तालुक्यातील इतर भागापेक्षा अधिक दैवाधीन आहे. आजूबाजूच्या कालव्याशेजारील गावे सुजलाम् सुफलाम् झाली आहेत; पण अजूनही बसुदेव भुजाई पठार पाण्यापासून वषार्नुवर्षे वंचितच आहे.बसुदेव-भुजाई जलसिंचन योजनेचा आराखडा शासनाला १९९८ ला मंजुरीसाठी पाठविला आहे. या योजनेचा सर्व्हे होऊन १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजनेसाठी काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्यापासून कासारपुतळे-धामणवाडी हद्दीतून उपसा सिंचन योजनेची सुरुवात करण्याचा प्रस्ताव असून, तीन टप्प्यांत याची विभागणी करण्यात आली आहे. (पूर्वार्ध)भिजणारे क्षेत्र : येणारा खर्च फारच कमीया उपसा जलसिंचन योजनेतून पहिल्या टप्प्यात ७२ मीटर उंचीवर व २७० मीटर लांबीवर पाणी उपसा करून तेथून पुढे ७२० मीटर पाटाने पाणी आणावयाचे आहे. दुसऱ्या टप्प्यात १०५ मीटर उंचीवर ४२० मीटर इतक्या लांबीवर पाणी उपसा करून ६२0 मीटर पाटाने पाणी न्यावयाचे आहे. तिसऱ्या टप्प्यात ४५ मीटर उंचीवर ३२० मीटर लांबीवर पाणी उपसा करावयाचा आहे. एकूण २३५० मीटर लांबीमध्ये १३४० मीटर इतक्या लांबीने पाटाने पाणी वाहणार आहे. त्यामुळे योजनेचा खर्च कमी असून, भिजणारे क्षेत्र व येणारा खर्च हा तुलनेने फारच कमी आहे. यामध्ये ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.लोटेवाडी, पंडिवरे, मोरस्करवाडी, अप्पाचीवाडी, बोंगार्डेवाडी, उंदरवाडी, धामणवाडी, मिणचे बुद्रुक, पाचवडे, नाधवडे, कूर, भुजाई पठार, देसाईवाडी, न्हाव्याचीवाडी, सरवडे ही गावे पाण्यापासून वंचित आहेत.