शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

शासनाच्या दप्तर दिरंगाईने अनेक शेतकरी देशोधडीला

By admin | Updated: April 6, 2017 00:49 IST

उपसा सिंचन योजना कधी सुरू होणार : हजारो हेक्टर जमीन पाण्यापासून वंचित

शिवाजी सावंत ल्ल गारगोटीशासनाच्या दप्तर दिरंगाईने गेली १८ वर्षे १९ गावांतील हजारो हेक्टर क्षेत्र पाण्यापासून वंचित ठेवले गेले असून, ‘पांढरा पट्टा’ समजला जाणारा हा भाग ‘हरित पट्टा’ कधी होणार? लोकप्रतिनिधी आणि शासनाच्या वेळकाढूपणामुळे हजारो शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे, तर अतिशय कमी खर्चात होऊ शकणारी उपसा सिंचन योजना कधी सुरू होणार आहे, याकडे या भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.भुदरगड तालुक्यातील मिणचे खोरी व टिक्केवाडी, पंडिवरे, परिसरातील १९ गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीला बसूदेव-भुजाई जल उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळण्यासाठी आणि या भागातील हरितक्रांतीचे स्पप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून मंजुरीची आवश्यकता आहे. ही योजना अमलात आल्यास १९ गावांतील ५८३८ हेक्टर शेतीचे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. जमीन ओलिताखाली येऊन पडीक जमिनीचा विकास होण्यास वाव मिळणार आहे. तर या भागातील शेतकरी फळबागा, ऊस लागवड, द्राक्षे, चहा, कॉफीचे मळे फुलविण्यास उत्सुकतेने वाट पाहत आहे. भुदरगडचे भूमिपुत्र असलेले पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या दूरदृष्टीतून बसुदेव-भुजाई जलसिंचन योजना कार्यान्वित व्हावी, ही शेतकऱ्यांची इच्छा आहे.तालुक्यातील १९ गावे नदीपात्र, नैसर्गिक जलस्रोत, कालव्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. पाटगाव, फये, काळम्मावाडी धरणाच्या डाव्या-उजव्या कालव्यातूनही या गावांना पाणी मिळत नसल्याने विहीर किंवा बोअरवेलवर अवलंबून राहावे लागत आहे; परंतु भूजल पातळी कमालीची खालावल्याने खडकाळ भागातील जमिनीला पाणी मिळत नाही. या भागातील शेतकरी पावसाच्या पाण्यावरच आपली शेती पिकवीत आहेत. इथला शेतकरी तालुक्यातील इतर भागापेक्षा अधिक दैवाधीन आहे. आजूबाजूच्या कालव्याशेजारील गावे सुजलाम् सुफलाम् झाली आहेत; पण अजूनही बसुदेव भुजाई पठार पाण्यापासून वषार्नुवर्षे वंचितच आहे.बसुदेव-भुजाई जलसिंचन योजनेचा आराखडा शासनाला १९९८ ला मंजुरीसाठी पाठविला आहे. या योजनेचा सर्व्हे होऊन १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजनेसाठी काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्यापासून कासारपुतळे-धामणवाडी हद्दीतून उपसा सिंचन योजनेची सुरुवात करण्याचा प्रस्ताव असून, तीन टप्प्यांत याची विभागणी करण्यात आली आहे. (पूर्वार्ध)भिजणारे क्षेत्र : येणारा खर्च फारच कमीया उपसा जलसिंचन योजनेतून पहिल्या टप्प्यात ७२ मीटर उंचीवर व २७० मीटर लांबीवर पाणी उपसा करून तेथून पुढे ७२० मीटर पाटाने पाणी आणावयाचे आहे. दुसऱ्या टप्प्यात १०५ मीटर उंचीवर ४२० मीटर इतक्या लांबीवर पाणी उपसा करून ६२0 मीटर पाटाने पाणी न्यावयाचे आहे. तिसऱ्या टप्प्यात ४५ मीटर उंचीवर ३२० मीटर लांबीवर पाणी उपसा करावयाचा आहे. एकूण २३५० मीटर लांबीमध्ये १३४० मीटर इतक्या लांबीने पाटाने पाणी वाहणार आहे. त्यामुळे योजनेचा खर्च कमी असून, भिजणारे क्षेत्र व येणारा खर्च हा तुलनेने फारच कमी आहे. यामध्ये ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.लोटेवाडी, पंडिवरे, मोरस्करवाडी, अप्पाचीवाडी, बोंगार्डेवाडी, उंदरवाडी, धामणवाडी, मिणचे बुद्रुक, पाचवडे, नाधवडे, कूर, भुजाई पठार, देसाईवाडी, न्हाव्याचीवाडी, सरवडे ही गावे पाण्यापासून वंचित आहेत.