शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

शासनाच्या दप्तर दिरंगाईने अनेक शेतकरी देशोधडीला

By admin | Updated: April 6, 2017 00:49 IST

उपसा सिंचन योजना कधी सुरू होणार : हजारो हेक्टर जमीन पाण्यापासून वंचित

शिवाजी सावंत ल्ल गारगोटीशासनाच्या दप्तर दिरंगाईने गेली १८ वर्षे १९ गावांतील हजारो हेक्टर क्षेत्र पाण्यापासून वंचित ठेवले गेले असून, ‘पांढरा पट्टा’ समजला जाणारा हा भाग ‘हरित पट्टा’ कधी होणार? लोकप्रतिनिधी आणि शासनाच्या वेळकाढूपणामुळे हजारो शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे, तर अतिशय कमी खर्चात होऊ शकणारी उपसा सिंचन योजना कधी सुरू होणार आहे, याकडे या भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.भुदरगड तालुक्यातील मिणचे खोरी व टिक्केवाडी, पंडिवरे, परिसरातील १९ गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीला बसूदेव-भुजाई जल उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळण्यासाठी आणि या भागातील हरितक्रांतीचे स्पप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून मंजुरीची आवश्यकता आहे. ही योजना अमलात आल्यास १९ गावांतील ५८३८ हेक्टर शेतीचे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. जमीन ओलिताखाली येऊन पडीक जमिनीचा विकास होण्यास वाव मिळणार आहे. तर या भागातील शेतकरी फळबागा, ऊस लागवड, द्राक्षे, चहा, कॉफीचे मळे फुलविण्यास उत्सुकतेने वाट पाहत आहे. भुदरगडचे भूमिपुत्र असलेले पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या दूरदृष्टीतून बसुदेव-भुजाई जलसिंचन योजना कार्यान्वित व्हावी, ही शेतकऱ्यांची इच्छा आहे.तालुक्यातील १९ गावे नदीपात्र, नैसर्गिक जलस्रोत, कालव्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. पाटगाव, फये, काळम्मावाडी धरणाच्या डाव्या-उजव्या कालव्यातूनही या गावांना पाणी मिळत नसल्याने विहीर किंवा बोअरवेलवर अवलंबून राहावे लागत आहे; परंतु भूजल पातळी कमालीची खालावल्याने खडकाळ भागातील जमिनीला पाणी मिळत नाही. या भागातील शेतकरी पावसाच्या पाण्यावरच आपली शेती पिकवीत आहेत. इथला शेतकरी तालुक्यातील इतर भागापेक्षा अधिक दैवाधीन आहे. आजूबाजूच्या कालव्याशेजारील गावे सुजलाम् सुफलाम् झाली आहेत; पण अजूनही बसुदेव भुजाई पठार पाण्यापासून वषार्नुवर्षे वंचितच आहे.बसुदेव-भुजाई जलसिंचन योजनेचा आराखडा शासनाला १९९८ ला मंजुरीसाठी पाठविला आहे. या योजनेचा सर्व्हे होऊन १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजनेसाठी काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्यापासून कासारपुतळे-धामणवाडी हद्दीतून उपसा सिंचन योजनेची सुरुवात करण्याचा प्रस्ताव असून, तीन टप्प्यांत याची विभागणी करण्यात आली आहे. (पूर्वार्ध)भिजणारे क्षेत्र : येणारा खर्च फारच कमीया उपसा जलसिंचन योजनेतून पहिल्या टप्प्यात ७२ मीटर उंचीवर व २७० मीटर लांबीवर पाणी उपसा करून तेथून पुढे ७२० मीटर पाटाने पाणी आणावयाचे आहे. दुसऱ्या टप्प्यात १०५ मीटर उंचीवर ४२० मीटर इतक्या लांबीवर पाणी उपसा करून ६२0 मीटर पाटाने पाणी न्यावयाचे आहे. तिसऱ्या टप्प्यात ४५ मीटर उंचीवर ३२० मीटर लांबीवर पाणी उपसा करावयाचा आहे. एकूण २३५० मीटर लांबीमध्ये १३४० मीटर इतक्या लांबीने पाटाने पाणी वाहणार आहे. त्यामुळे योजनेचा खर्च कमी असून, भिजणारे क्षेत्र व येणारा खर्च हा तुलनेने फारच कमी आहे. यामध्ये ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.लोटेवाडी, पंडिवरे, मोरस्करवाडी, अप्पाचीवाडी, बोंगार्डेवाडी, उंदरवाडी, धामणवाडी, मिणचे बुद्रुक, पाचवडे, नाधवडे, कूर, भुजाई पठार, देसाईवाडी, न्हाव्याचीवाडी, सरवडे ही गावे पाण्यापासून वंचित आहेत.