शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

‘माणुसकी’च्या दातृत्वाने गहिवरल्या ‘भिंती’

By admin | Updated: October 28, 2016 23:47 IST

देणाऱ्यांचे हात हजारो : दुसऱ्या दिवशीही करवीरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अनेकांच्या चेहऱ्यावर कपडे मिळाल्याचा आनंद

कोल्हापूर : एका दिलाची व एका विचाराची माणसे एकत्र येऊन चांगला उपक्रम राबवू शकतात, हे ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाने सिद्ध केले आहे. सामाजिक दायित्व हरवत चाललेल्या या काळात अजूनही काही चांगल्या मनाची व सामाजिक भान असलेली माणसे आहेत, याची साक्ष पटवून देत शहरातील सीपीआर चौक, कसबा गेट परिसरातील भिंती ‘माणुसकी’च्या दातृत्वाने गहिवरल्या. शहरातील या उपक्रमाला करवीरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जुने-नवे कपडे, ड्रेस, स्वेटर्स, ब्लेझर्स, पॅँट्स, कुर्ते, जीन्स, लहान मुलांचे कपडे, साड्या, कानटोपी, स्कार्फ, शूज, मोजे, चप्पल, स्लिपर्स ‘माणुसकीच्या भिंती’वर आणून ठेवल्या. गुरुवार (दि. २७) पासून सुरू असलेल्या या उपक्रमात ‘देणाऱ्याचे हात हजारो’ याची प्रचिती येत आहे. हजारो कपड्यांचे जोड या ठिकाणी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आणून दिले आहेत. सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत अनेकजण इथून कपडे घेऊनही जात आहेत. या ठिकाणी गरजू, गरीब लोकांना आपल्याला हवे ते कपडे, हवे तितके घेऊन जाण्याची मुभा असल्याने गर्दी होत आहे. आपल्यासह आपल्या कुटुंबीयांसाठी कपडे घेऊन जाण्यासाठी अनेक ांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. मनाजोगे कपडे मिळाल्याच्या आनंदाने त्यांचे चेहरे खुलत आहेत. फक्त जुनेच कपडे न देता अनेक दानशूर नागरिकांनी नवे कपडेदेखील या उपक्रमासाठी दान केले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान व आनंद पाहणे हा खूप आल्हाददायक क्षण असल्याचे मत या उपक्रमात सहभाग घेणाऱ्यांनी व्यक्त केले.कसबा गेट येथे कसबा तरुण मंडळ, कॉर्नर मित्रमंडळाचे कार्यकर्ते तसेच ‘स्वाभिमान’चे जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर यांनीही ‘माणुसकीची भिंत’ उभारली आहे. या ठिकाणीही दातृत्वाचे अनेक हात समोर आले असून, ड्रेस, खेळणी, शूज, साड्या, जीन्स, आबालवृद्धांसाठीचे कपड्यांचे ढीग लागले आहेत. या उपक्रमासाठी प्रशांत पाटील, महेश कोठावळे, रसिक पेटकर, शिवानंद तोडकर, उदय नार्वेकर, राजन डोंगरसाने, अभिजित तोडकर, गायत्री राऊत, रवींद्र पेटकर हे स्वयंसेवक म्हणून काम पाहत आहेत. हा उपक्रम मंगळवार (दि. १) पर्यंत सुरू राहणार आहे. (प्रतिनिधी)आपले योगदान अमूल्य आहेआपल्या घरी अनेक वस्तू, कपडे जे आपण वापरत नसतो; किंबहुना वाढत्या वयाप्रमाणे त्याची मापे बदलतात, असे ड्रेस, कपडे पडून राहतात. लहान मुलांची खेळणी, वस्तूही अशाच मुले मोठी झाली की अडगळीत टाकल्या जातात. अशा वस्तू, कपडे आपण या ‘माणुसकीच्या भिंती’वर आणून दिल्यास आनंदाच्या क्षणापासून वंचित असलेल्या गोरगरिबांच्या मुलांना त्या उपयोगी पडतील. इतके योगदान आपण नक्कीच देऊ शकतो.